शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात हेमंत नगराळे यांना सहआरोपी करा- आनंद बिद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 05:16 IST

पनवेल : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाला एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी २८ डिसेंबर रोजी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

पनवेल : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाला एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी २८ डिसेंबर रोजी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात आम्ही सप्टेंबर २०१६ रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली होती. या भेटीत आम्हाला काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तसेच कोणतेही सहकार्य न करता उलट आम्हालाच भीती दाखविण्याचा प्रयत्न नगराळे यांनी केला. ‘या प्रकरणात तुमच्या जिवाला धोका आहे. तुम्ही सावध राहा,’ असे आयुक्तांनी आम्हाला सांगितले. पोलिसांकडे या प्रकरणात कुरुं दकर आरोपी असल्याबाबत आॅडिओ-व्हिडीओ उपलब्ध असतानाही या प्रकरणी पोलिसांनी कुरुंदकरविरोधी गुन्हा दाखल केला नव्हता. पोलीस सहकार्य करीत नसल्याने आॅक्टोबर २०१६ रोजी आम्ही न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात तपासाला गती दिली. त्यानंतर साहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर ३१ जानेवारी २०१७ रोजी अश्विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.या प्रकरणात काहीच बाहेर येत नसल्याने आम्ही १६ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसार माध्यमांच्या समोर हा विषय मांडल्यानंतर तपासाला गती मिळाली. आम्ही ज्या वेळी पोलीस आयुक्तांना पुराव्याचे दाखले देत कुरुं दकर यांना अटक करण्याची मागणी केली, तेव्हा ते पुरावे सबळ नसल्याचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. मात्र, याच प्रकरणी जेव्हा आम्ही न्यायालयात धाव घेतली तेव्हा या पुराव्यांच्या आधारावर आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे आनंद बिद्रे यांनी सांगितले.>तपास योग्य दिशेने सुरूअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाचा तपास अधिकारी मी नाही. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड करीत आहेत. पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनानुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी वेळोवेळी या प्रकरणाच्या तपासाची माहिती उच्च न्यायालयाला दिली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्ही डीएनए रिपोर्टची वाट पाहत आहोत, त्यानंतर या प्रकरणावर प्रकाश पडेल. हा विषय न्यायालयात असल्याने तपासातील भाग उघड करता येणार नाही, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.