शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत; उमरोलीचा संपर्क पुन्हा तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:04 IST

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल परिसरात हाहाकार माजवला आहे

- मयुर तांबडेपनवेल : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल परिसरात हाहाकार माजवला आहे. सगळीकडे पाणीच पाणी झालेले असून नागरिकाना २००५ च्या पूराची आठवण झाली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत.पाऊस विश्रांती घेत नसल्याने पनवेल शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे. टपाल नाका, मुसलमान नाका, रोहिदास वाडा, महावितरण परिसर, कापड बाजार, पडघे, कोळवडी यासह ग्रामीण भागात कित्येक तास पुराचा वेढा होता.शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तालुक्यातील चिपळे येथील पूलाला पाणी लागायला काही ईंच पाण्याची गरज होती तर शांतिवन येथील पूलावरून आठवड्यात दोन वेळा पाणी गेल्याने हा पूल धोकादायक बनला असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेचा या पूलाला चिरा गेल्या असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहतूक करणारे प्रवासी यांच्या मनात धडकीच भरली आहे. पोलिसांनी व ग्रामस्थांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. पूलावरून पाणी गेल्याने डांबर निघून गेले आहे. पूलावरून वाहतुकीस बंदी आणल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. वाहने अलीकडेच थांबवून त्यांना चालत घर गाठावे लागले. याच पूलाशेजारील काही भाग खचला आहे. त्यामुळे याची डागडुजीकरणाची मागणी करण्यात येत आहे.पनवेल व परिसरात पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेलीच नाही. त्याचा फटका नागरिक व शेतकऱ्यांना बसत आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. सलग न थांबता कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वाधिक संपर्क तुटण्याचा फटका यावर्षी तालुक्यातील उमरोली या गावाला बसला आहे. तब्बल २० हून अधिक वेळा या गावाचा संपर्क तुटल्याने त्यांना रविवारी देखील घरीच बसावे लागले.उमरोली गावासाठी बांधण्यात येत असलेल्या नवीन पूलाला पावसाचे पाणी लागले होते. ग्रामीण भागातील काही रस्त्यांवर फुटभर पाणी साचलेले पाहावयास मिळाले. नेरे, हरिग्राम या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना काहींच्या वाहनांमध्ये पाणी गेल्याने वाहने बंद पडली. त्यांना ढकलत वाहने बाहेर काढावी लागली. गाढी नदीला महापूर आल्याने गाढी नदीचे पात्रही दुधडी भरून वाहत होते. पावसामुळे सकाळी कामावर जाणा?्या चाकरमान्यांचेही हाल झाले. मुसळधार पावसाने पनवेलला झोडपुन काढले आहे. अनेक बैठ्या घरात तसेच झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. त्यामुळे रहिवाशांना सामानाची हलवाहलवी करावी लागली. काहींच्या स्वयंपाक घरापर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे येथील कुटुंबीयांची त्रेधातिरपिट उडाली. संसार भिजू नये यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. त्यामुळे पनवेलमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. मध्येमध्ये पाऊस उसंत घेत असल्याने पाणी निचरत असले तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले.