शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

पनवेल शहरासह ग्रामीण भागात बत्ती गुल

By admin | Updated: June 23, 2016 03:36 IST

मंगळवारी पावसाला सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता पनवेल शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला तो दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला

पनवेल : मंगळवारी पावसाला सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता पनवेल शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला तो दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे पहिल्याच पावसात पनवेल तालुक्यातील बत्ती गुल झाली होती. अद्याप पावसाला नीटशी सुरुवात देखील झाली नाही तर वीज गायब होऊ लागली आहे. ऐन पावसाळ्यात वीजपुरवठा कसा सुरळीत राहणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.पनवेल तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणकडून पाठवण्यात आलेल्या विजेच्या बिलाचा आकडा दिवसेंदिवस फुगत असून नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे. त्यात सुरळीत वीज पुरवठा करण्यात महावितरण प्रशासनाला मात्र अपयश आल्याचे वाढत्या पॉवर कट्समुळे दिसून येत आहेत. वर्षानुवर्षे जुन्या असलेल्या विजेच्या तारांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अशा वेळी अवेळी पॉवर कट्च्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पनवेल शहरात देखील विजेचा लपंडाव सुरूच आहे. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता गायब झालेली वीज पहाटे ३ वाजता आली, त्यामुळे नागरिक हैराण झाले.ग्रामीण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरु आहे. बहुतेकदा दिवसाची सुरु वात ही विजेविना होत असताना आता रात्री-अपरात्री विजेचा लपंडाव सुरु असल्याने नागरिकांची झोप खराब होत आहे. कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, कधी विजेच्या तारा तुटणे अशा अनेक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत महावितरणला संपर्क साधत तक्र ार दिली असता लाइनमन पाठवतो, आमच्याकडे माणसं कमी आहेत, अशी उत्तरे दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुपारच्या वेळी वीज जात असल्याने उकाड्याने नागरिक हैराण होत असून तक्र ार केल्यानंतर तासाभराच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत होतो मात्र त्यानंतरही विजेचा लपंडाव सुरु राहतो. प्रत्यक्षात वीजवाहिन्यांची देखभाल दुरु स्ती करणे आवश्यक असताना महावितरणकडून या कामात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)