शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

प्रवेश अर्जाच्या नावाखाली पालकांची लूट

By admin | Updated: July 17, 2017 01:29 IST

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाला सुरुवात झाली. यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांकडून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाला सुरुवात झाली. यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांकडून नेरुळमधील तेरणा कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रवेश अर्जाकरिता हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याने पालकांनी तक्रार केली आहे. इतर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश अर्ज शुल्कासाठी घेतली जाणारी रक्कम निम्म्याहून कमी असल्याने पालकांची लुबाडणूक का केली जात आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. परिसरातील समाजसेवकांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता संस्था विनाअनुदानित असल्याने ही शुल्कआकारणी योग्य असल्याचा दावा केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके यांनी दिली. यावेळी शाळा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसंदर्भातील माहिती देण्यास नाकारण्यात आल्याचेही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्देशानुसार शुल्क नियंत्रण पूर्वपरवानगीशिवाय कुठल्याही विनाअनुदानित शाळांना शुल्क वाढ करता येत नसल्याचेही परंतु प्रवेश अर्ज शुल्क याद्वारे बेकायदेशीर शुल्कवसुली केली जात असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. शिक्षण विभाग व शासनाच्या वतीने सर्व महाविद्यालयात प्रवेश अर्ज शुल्काची किंमत एकसारखीच करण्यासाठी गांभीर्याने विचार व प्रयत्न करून पालकांची व विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होणार याकडे गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. इतर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश अर्ज शुल्कासाठी ५० ते ५००रूपये विद्यार्थ्यांना मोजावे लागत असून तेरणा कनिष्ठ महाविद्यालयाकडून मात्र दुपटीने शुल्क आकारले जात असल्याचा असंतोष पालकांनी व्यक्त केला आहे.