शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील रस्ते गेले खड्ड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 00:58 IST

एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

नवी मुंबई : एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे बहुतांश ठिकाणच्या रस्त्यांची गेली अनेक वर्षांपासून दुरुस्ती होऊ न शकल्याने संपूर्ण रस्तेच खड्ड्यात गेले आहेत. त्या ठिकाणी सांडपाणीही साचत असल्याने जागोजागी तळे तयार झाल्याचे दृश्य नजरेस पडत आहे.अशिया खंडातील सर्वाधिक मोठा औद्योगिक पट्टा सुविधांच्या बाबतीत अद्यापही दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, मागील काही वर्षांत अनेक कंपन्या नवी मुंबईबाहेर स्थलांतरितही झाल्या आहेत. अशातच उर्वरित कंपन्यांच्या कामगारांनाही असुविधांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये रस्त्याची समस्या सर्वाधिक डोकेदुखीची ठरताना दिसून येत आहे. असेच भीषण दृश्य रबाळे एमआयडीसी परिसरात पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणच्या ए २२७ क्रमांकाच्या प्लॉट लगतचा रहदारीचा रस्ताच पूर्णपणे खड्ड्यात गेलेला आहे. यामुळे छोट्या वाहनांची त्या ठिकाणची रहदारीही बंद झालेली आहे. मात्र, मोठ्या वाहनांना पर्यायी त्याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे. यामध्ये रस्ता अधिक खचला जाऊन त्यावरील खड्ड्यांचा आकार दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याची भावना परिसरातून ये-जा करणाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.अशातच काही कंपन्यांकडून त्यांचे सांडपाणी रस्त्यावरच सोडले जात आहे. तर काही ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या फुटल्या असून, त्यामधील दूषित पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. हे सांडपाणी खड्ड्यांमध्येच साचून राहत असल्याने त्या ठिकाणी डासांची पैदास होत आहे. यामुळे परिसरातील कंपन्यांमध्ये काम करणाºया कामगारांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.मालाच्या वाहतुकीमुळे एमआयडीसी परिसरात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यांचा भार पेलू शकतील, अशा दर्जाचे रस्ते एमआयडीसी परिसरात बनवले जाणे गरजेचे आहे. तशा प्रयत्नातून काही वर्षांपूर्वी पालिकेकडून तसेच एमआयडीसी प्रशासनाकडून रस्त्यांचे काँक्रीटीकरणही करण्यात आले होते. तर काही ठिकाणी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून टिकावू रस्ते बनवण्याचाही प्रयत्न झाला होता. यानंतरही ते रस्ते खड्डेमय होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, दुरुस्तीच्या बाबतीत केवळ प्रमुख रस्त्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. परिणामी, कंपन्यांसमोरील जोडरस्त्यांची डागडुजी दुर्लक्षितच राहिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेले रस्तेच पूर्णपणे खड्ड्यात गेले आहेत; परंतु या रस्त्यांची डागडुजी नेमकी करणार कोण, असा प्रश्न सर्वसामान्य कामगारवर्गाला पडला आहे.>सुविधांची मागणीऔद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांकडून महापालिका कर वसूल करत असल्याने पालिकेनेच तिथे सुविधा पुरवाव्यात, अशी उद्योजकांची मागणी होती. त्यावरून पालिका आणि उद्योजक यांच्यात अनेक वर्षे वादही सुरू होता.कालांतराने पालिकेने तिथल्या रस्त्यांची व गटारांची कामेही हाती घेतली होती; परंतु मागील काही वर्षांपासून पुन्हा एमआयडीसीतील रस्ते दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे.>काही कामानिमित्ताने एमआयडीसी परिसरात जायचे झाल्यास रस्त्यांवरील खड्ड्यांची भीती वाटत आहे. खड्ड्यांमधून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात वाहने आदळून नुकसान होत आहे. तर रात्रीच्या वेळी खड्डे दिसून येत नसल्याने अपघातांचीही भीती सतावत आहे. तर काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये दूषित पाणी साचल्याने रस्त्यांचे रूपांतर तळ्यांमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. या समस्येकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज भासत आहे.- अशोक काटे, नागरिक