शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

प्लॅस्टिकच्या पुनर्प्रक्रियेतून शहरात रस्त्यांची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 23:26 IST

प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने पालिकेकडून रस्त्यांच्या कामात प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने पालिकेकडून रस्त्यांच्या कामात प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे. राज्यात प्रथमच नवी मुंबईत हा उपक्रम राबवण्यात आल्यानंतर इतर महापालिकांनीही त्यात पुढाकार घेतला आहे, यामुळे डांबरीकरणाच्या खर्चात दहा टक्क्यांची बचत होत असून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे.प्लॅस्टिकचे सहज विघटन होत नसल्याने पुनर्वापर हाच त्यावर उपयुक्त पर्याय ठरत आहे. मात्र, यामुळेही प्लॅस्टिक दैनंदिन वापरात राहणार असल्याने त्याचा पर्यावरणाला धोका कायम राहणार आहे. त्यावर पर्याय म्हणून नवी मुंबई महापालिकेने राज्यात प्रथमच रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापरकरण्याचा उपक्रम हाती घेतला.त्यानुसार तळवली येथे पहिल्यांदा त्या संकल्पनेतून रस्ता तयार करण्यात आला होता, यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक नोडमध्ये अशा प्रकारे रस्ते बनवण्याचे काम हाती घेण्यात आले.पालिका क्षेत्रात जमा होणारा दररोजचा अनेक टन कचरा तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडवर जमा केला जातो, त्यामध्ये प्लॅस्टिक कचºयाचेही प्रमाण अधिक असायचे. प्लॅस्टिकचा कचरा प्रक्रिया करून रस्त्यांच्या डांबरीकरणात वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये महापे डेपोसमोरील मार्ग, घणसोली-कोपरखैरणे दरम्यानच्या उड्डाणपुलाचा कोपरखैरणेकडील भाग, गोठीवली गावातील मार्ग आदीचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांश रस्ते मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी बनवण्यात आले असून, अद्यापही ते सुस्थितीत आहेत. यावरून डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याने रस्ते दीर्घकाळ टिकताना दिसत आहेत. परिणामी, प्रतिवर्षी पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या डागडुजीवर होणाºया खर्चाला कात्री बसली आहे.>पर्यावरणाचा समतोलप्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याकरिता त्याचा रस्त्याच्या डांबरीकरणात वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात प्रथमच नवी मुंबई महापालिकेने हा उपक्रम हाती घेऊन मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचºयाचा पुनर्वापर केला.डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याने पर्यावरणाचीही हानी टळत आहे. प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या रसायनाचा डांबरात वापर होऊ लागल्याने डांबरीकरणावर होणाºया खर्चात दहा टक्क्यांची बचत झाली. दोन वर्षांपूर्वी बनवलेले प्लॅस्टिकचे रस्ते अद्यापही सुस्थितीत.>शहरातील वाढत्या प्लॅस्टिकच्या कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न भेडसावत होता, त्यावर पर्याय म्हणून रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला. यामुळे एकूण कामाच्या खर्चात दहा टक्क्यांची बचतही होत आहे. त्यानुसार प्रत्येक नोडमध्ये अशा प्रकारचे रस्ते बनवण्यात आले असून, यापुढेही काही रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत.- संजय देसाई, कार्यकारी अभियंता,नवी मुंबई महापालिका.>जुन्या-नव्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी होतोय वापरप्लॅस्टिकच्या साठ्यावर प्रक्रिया करून तयार झालेले रसायन प्रत्यक्षात रस्त्याच्या डांबरीकरणा वेळी डांबरात मिसळले जाते, त्यामुळे प्लॅस्टिकच्या कचºयाची विल्हेवाट लावणे शक्य झाले आहे. शिवाय, डांबरीकरणाच्या कामावर होणाºया एकूण खर्चातही सुमारे दहा टक्क्यांची बचतही होऊ लागली आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांत महापालिका क्षेत्रात १५ पेक्षा अधिक ठिकाणी डांबरात प्लॅस्टिकचा वापर करून नवे रस्ते अथवा जुन्या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे.