शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेला रस्त्याच्या कामांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:38 IST

बँका, खाजगी सेवांसह सरकारी कामकाजावर परिणाम

सिकंदर अनवारेदासगाव : भारत संचार निगम लिमिटेडची दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा गेल्या पाच वर्षांपासून कोलमडलेलीच आहे. सर्वांत गतीने मिळणारे बीएसएनएलचे इंटरनेट विविध रस्त्यांच्या कामात सातत्याने तोडल्या जाणाऱ्या केबलमुळे बंद पडत आहे. यामुळे बँका, खाजगी सेवा पुरवणाऱ्या संस्था, सरकारी कार्यालयांतील व्यवहार वारंवार ठप्प होत आहेत. याबाबत कोणताही राजकीय लोकप्रतिनिधी आजतागायत बीएसएनएल किंवा महामार्ग विभागाला जाब विचारण्यास पुढे आलेला नाही.

महाडसह संपूर्ण देशभरात भारत संचार निगम लिमिटेडकडून दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरवली जाते. भारत संचार निगमची इंटरनेट सेवा अत्यंत गतीने चालणारी सेवा आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून या सेवेचा चांगलाच बोजवारा उडाला आहे. मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्याने बीएसएनएल मोबाइलधारक कमालीचे संतापले आहेत. बहुतांश ग्रामीण भागात भारत संचार निगमचे मोबाइल ग्राहक आहेत. पूर्वी असलेले घरगुती दूरध्वनी जवळपास ९० टक्के बंद पडले आहेत. त्याऐवजी बीएसएनएलचा मोबाइल वापर सुरू झाला. मात्र, भारत संचार निगमच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागात या सेवेवरदेखील नाराजी व्यक्त झाली. गेल्या अनेक वर्षांपासून बीएसएनएलची सेवा सातत्याने खंडित होत असल्याने महाड शहरातील खाजगी आणि सरकारी बँकांतून सर्व कारभार ठप्प होत आहे. शिवाय सरकारी कार्यालयातील कारभारदेखील मंदावला आहे. याचा फटका व्यापारी, उद्योजक, कारखाने, खाजगी बँका आदींना बसला आहे. महामार्ग चौपदरीकरण आणि महाबळेश्वर घाटात रस्त्याचे सुरू असलेले काम यामुळे लाइन तोडली जात आहे. मात्र यावर अद्याप ठोस उपाय किंवा कार्यवाही झालेली नाही. यामुळे सातत्याने बी.एस.एन.एल.ची लाइन तुटत आहे. सदर लाइन कोणीतरी तोडत असल्याचा संशयदेखील व्यक्त केला जात आहे.

शासकीय कार्यालयातील इंटरनेट सेवा ठप्प असल्याने विविध कामांचा खोळंबा झाला आहे. गेले काही दिवस नोंदणी कार्यालयातदेखील खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदी होत नसल्याने नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. हीच अवस्था भारतीय विमा निगम कार्यालयातदेखील कायम आहे. एल.आय.सी.ची कोणतीच कामे होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. खाजगी सेवा पुरविणाऱ्या संस्थांमध्येदेखील हीच अवस्था आहे. यामुळे बीएसएनएलच्या सेवेवर नाराजी व्यक्त होत आहे.

महाड मंडळ कार्यालयात केवळ ११ कर्मचारीमहाड शहरात छोट्यामोठ्या अशा जवळपास ३५ ते ४० बँका, पतसंस्था आहेत. या बँकांमधून बीएसएनएलची इंटरनेट सेवा कार्यरत आहे. शिवाय सर्व सरकारी कार्यालये, दुकाने, खाजगी कार्यालये यातूनदेखील बीएसएनएलचेच इंटरनेट वापरले जाते. मात्र सातत्याने खंडित होत असलेल्या या सेवेमुळे ग्राहक वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. महाडमधील २१ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. यामध्ये महाड मंडळ कार्यालयातील ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर संपूर्ण रायगडमध्ये जवळपास २०० च्या वर कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. याचा फटकादेखील बसला असून महाड शहरातील एका कार्यालयाला वर्षापूर्वी टाळे लागले आहे. यामुळे बिल भरणा, मोबाइल रिचार्ज आदी सुविधादेखील पुरविल्या जात नाहीत.

खाजगी कंपन्यांचीदेखील हीच स्थितीबीएसएनएल वगळता अन्य खाजगी कंपन्यांचीदेखील हीच बोंब आहे. गेले काही दिवस या खाजगी कंपन्यांचेदेखील नेट मिळत नसल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत. मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरी भागात इंटरनेट आणि इतर सुविधा सुरळीत आहेत, मात्र ग्रामीण भागातील ग्राहक तितकेच पैसे मोजूनदेखील वारंवार खंडित सेवेला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBSNLबीएसएनएल