शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
5
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
6
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
7
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
8
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
9
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
10
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
11
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
12
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
13
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
14
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
15
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
16
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
17
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
18
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
19
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
20
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेला रस्त्याच्या कामांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:38 IST

बँका, खाजगी सेवांसह सरकारी कामकाजावर परिणाम

सिकंदर अनवारेदासगाव : भारत संचार निगम लिमिटेडची दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा गेल्या पाच वर्षांपासून कोलमडलेलीच आहे. सर्वांत गतीने मिळणारे बीएसएनएलचे इंटरनेट विविध रस्त्यांच्या कामात सातत्याने तोडल्या जाणाऱ्या केबलमुळे बंद पडत आहे. यामुळे बँका, खाजगी सेवा पुरवणाऱ्या संस्था, सरकारी कार्यालयांतील व्यवहार वारंवार ठप्प होत आहेत. याबाबत कोणताही राजकीय लोकप्रतिनिधी आजतागायत बीएसएनएल किंवा महामार्ग विभागाला जाब विचारण्यास पुढे आलेला नाही.

महाडसह संपूर्ण देशभरात भारत संचार निगम लिमिटेडकडून दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरवली जाते. भारत संचार निगमची इंटरनेट सेवा अत्यंत गतीने चालणारी सेवा आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून या सेवेचा चांगलाच बोजवारा उडाला आहे. मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्याने बीएसएनएल मोबाइलधारक कमालीचे संतापले आहेत. बहुतांश ग्रामीण भागात भारत संचार निगमचे मोबाइल ग्राहक आहेत. पूर्वी असलेले घरगुती दूरध्वनी जवळपास ९० टक्के बंद पडले आहेत. त्याऐवजी बीएसएनएलचा मोबाइल वापर सुरू झाला. मात्र, भारत संचार निगमच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागात या सेवेवरदेखील नाराजी व्यक्त झाली. गेल्या अनेक वर्षांपासून बीएसएनएलची सेवा सातत्याने खंडित होत असल्याने महाड शहरातील खाजगी आणि सरकारी बँकांतून सर्व कारभार ठप्प होत आहे. शिवाय सरकारी कार्यालयातील कारभारदेखील मंदावला आहे. याचा फटका व्यापारी, उद्योजक, कारखाने, खाजगी बँका आदींना बसला आहे. महामार्ग चौपदरीकरण आणि महाबळेश्वर घाटात रस्त्याचे सुरू असलेले काम यामुळे लाइन तोडली जात आहे. मात्र यावर अद्याप ठोस उपाय किंवा कार्यवाही झालेली नाही. यामुळे सातत्याने बी.एस.एन.एल.ची लाइन तुटत आहे. सदर लाइन कोणीतरी तोडत असल्याचा संशयदेखील व्यक्त केला जात आहे.

शासकीय कार्यालयातील इंटरनेट सेवा ठप्प असल्याने विविध कामांचा खोळंबा झाला आहे. गेले काही दिवस नोंदणी कार्यालयातदेखील खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदी होत नसल्याने नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. हीच अवस्था भारतीय विमा निगम कार्यालयातदेखील कायम आहे. एल.आय.सी.ची कोणतीच कामे होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. खाजगी सेवा पुरविणाऱ्या संस्थांमध्येदेखील हीच अवस्था आहे. यामुळे बीएसएनएलच्या सेवेवर नाराजी व्यक्त होत आहे.

महाड मंडळ कार्यालयात केवळ ११ कर्मचारीमहाड शहरात छोट्यामोठ्या अशा जवळपास ३५ ते ४० बँका, पतसंस्था आहेत. या बँकांमधून बीएसएनएलची इंटरनेट सेवा कार्यरत आहे. शिवाय सर्व सरकारी कार्यालये, दुकाने, खाजगी कार्यालये यातूनदेखील बीएसएनएलचेच इंटरनेट वापरले जाते. मात्र सातत्याने खंडित होत असलेल्या या सेवेमुळे ग्राहक वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. महाडमधील २१ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. यामध्ये महाड मंडळ कार्यालयातील ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर संपूर्ण रायगडमध्ये जवळपास २०० च्या वर कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. याचा फटकादेखील बसला असून महाड शहरातील एका कार्यालयाला वर्षापूर्वी टाळे लागले आहे. यामुळे बिल भरणा, मोबाइल रिचार्ज आदी सुविधादेखील पुरविल्या जात नाहीत.

खाजगी कंपन्यांचीदेखील हीच स्थितीबीएसएनएल वगळता अन्य खाजगी कंपन्यांचीदेखील हीच बोंब आहे. गेले काही दिवस या खाजगी कंपन्यांचेदेखील नेट मिळत नसल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत. मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरी भागात इंटरनेट आणि इतर सुविधा सुरळीत आहेत, मात्र ग्रामीण भागातील ग्राहक तितकेच पैसे मोजूनदेखील वारंवार खंडित सेवेला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBSNLबीएसएनएल