शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

रस्त्याच्या मालकी हक्काचा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 23:41 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटच्या बाहेरील रस्त्याच्या मालकीवरून एपीएमसी व महापालिकेमध्ये मतभिन्नता आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटच्या बाहेरील रस्त्याच्या मालकीवरून एपीएमसी व महापालिकेमध्ये मतभिन्नता आहे. रस्त्याची देखभाल व संरक्षण कोणी करायची, यावरून जबाबदारी टाळली जात असून याचा गैरफायदा फेरीवाल्यांनी घेतला आहे. रस्त्यावरच मार्केट सुरू केले असून त्याचा त्रास व्यापारी, कामगारांसह वाहतूक पोलिसांनाही होऊ लागला आहे.मुंबईमधील घाऊक बाजारपेठ नवी मुंबईत स्थलांतर करताना बाजार समितीला ७२ हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली आहे.

मार्केटच्या आतमधील रस्ता व इतर सुविधा देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. संरक्षण भिंतीच्या बाहेरील जबाबदारी महापालिकेची आहे. मसाला, भाजी, फळ व धान्य मार्केटच्या पूर्व बाजूला सिडकोने मुख्य रस्त्याला लागून सर्व्हिस रोड तयार केला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की पार्किंगसाठी, हे अद्याप निश्चित केलेले नाही. या रस्त्याची मालकी महापालिकेकडे आहे की एपीएमसीकडे, हेही अद्याप निश्चित झालेले नाही. मसाला मार्केटच्या बाहेरील रस्त्यावर पाच वर्षांपासून अनधिकृतपणे मार्केट सुरू झाले आहे. भाजी व फळ मार्केटमधून काही विक्रेते जमिनीवर पडलेला माल उचलून तो या ठिकाणी पदपथ व रस्त्यावर विकू लागले आहेत. पूर्वी या ठिकाणी २० ते २५ विक्रेते होते. सद्यस्थितीमध्ये १०० पेक्षा जास्त फेरीवाले येथे व्यापार करू लागले आहेत.>पार्किंगसाठी भूखंडएपीएमसीच्या चार मार्केटच्या पूर्वेला असलेला सर्व्हिस रोड हा पार्किंगसाठी असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका व एपीएमसी प्रशासनाने सविस्तर सर्वेक्षण केले, तर या ठिकाणी व्यापारी व खरेदीदारांची वाहने उभी करणे शक्य होणार आहे. या ठिकाणी कुंपण टाकून फेरीवाल्यांना अटकाव करावा, अशी मागणी केली जात आहे. सर्व्हिस रोडला कुंपण टाकल्यास तेथे होणारे अतिक्रमण थांबेल व पार्किंगचा प्रश्नही सुटेल, असे मत व्यक्त केले जात आहे.>फेरीवाल्यांमुळे होत आहे वाहतूककोंडीमुंबई बाजार समिती देशातील प्रमुख बाजारपेठेपैकी एक आहे. या ठिकाणी देश, विदेशातील शिष्टमंडळ मार्केट पाहण्यासाठी येत असतात. मार्केटमध्ये जाण्यासाठीच्या रोडवरील या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे एपीएमसीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट या प्रतिमेलाही धक्का बसू लागला आहे.याशिवाय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीहोऊ लागली आहे. बाजार समितीमधील व्यापारी, कामगार, शहरातील दक्ष नागरिक सर्वांनी या फेरीवाल्यांविषयी तक्रार केली आहे. तुर्भे विभाग कार्यालयाने अनेक वेळा फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे; कारवाई केली की, दुसºया दिवशी पुन्हा जैसे थे स्थिती राहत आहे.यापूर्वी कारवाई करणाºया पथकावर हल्ला करण्यात आला होता. येथील मालाचा दर्जाही चांगला नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बाजार समितीने माथाडी भवनच्या बाजूला असलेल्या रोडवर तारेचे कुंपण घातले आहे; परंतु दुसºया बाजूला अद्याप कुंपण घातलेले नाही.मालकी महापालिकेची की एपीएमसीची, हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे हा प्रश्न रखडला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पालिका व एपीएमसीच्या वरिष्ठ अधिकाºयांना एकत्र चर्चा करून हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.