शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

खदाणी ठरताहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:28 IST

खारघर परिसरात पावसाळ्यात निर्माण झालेली डबकी धोकादायक ठरू लागली आहेत.

वैभव गायकरपनवेल : खारघर परिसरात पावसाळ्यात निर्माण झालेली डबकी धोकादायक ठरू लागली आहेत. पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेली ही खदाणी (डबकी) पर्यटकांना भुरळ घालत आहेत. मागील तीन दिवसांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत चार जणांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे. असे असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रविवारी खारघर येथील तळोजा कारागृहाच्या समोर असलेल्या डबक्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला, तर सोमवारी सेक्टर ३६ येथे एका बांधकाम व्यावसायिकाने खोदलेल्या खड्ड्यात बुडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे खारघर परिसरातील पावसाळी खड्डे जीवघेणे ठरू लागले आहेत. खारघर हा सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पारसिक डोंगराच्या सान्निध्यात उभारलेल्या या शहराला विपुल निसर्गसौंदर्य लाभले आहे. पावसाळ्यात येथील पांडवकडा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव पांडवकड्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि रायगडमधून येणाऱ्या हौशी पर्यटकांचा हिरमोड होत आहे. धबधब्याची मौज घेण्यासाठी दुरून आलेल्या पर्यटकांना खारघरमध्ये पावसाच्या पाण्याने तयार झालेली डबकी आकर्षित करू लागली आहेत. याच आकर्षणातून चार निष्पाप जणांचे बळी गेले आहेत.खारघरमध्ये सध्या मोठ्याप्रमणात विकासकामे सुरू आहेत. काही प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून सुरू आहेत, तर काही खासगी विकासकांचे आहेत. या विकास प्रकल्पाच्या कामासाठी मोठमोठे खड्डे खोदले आहेत. परंतु पावसामुळे या खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून संबंधित विकासकाने या ठिकाणी धोक्याचे फलक लावणे गरजेचे आहे. पाण्यात कोणी उतरू नये, यादृष्टीने डबक्याभोवती संरक्षण कुंपण लावण्याचीही गरज आहे. परंतु अनेक डबकी बेवारस असल्याने पर्यटकांना ते नैसर्गिक वाटू लागली आहेत. त्यामुळेच पांडवकडा नाही, तर या डबक्यात पोहण्याचा आनंद घेवू या भावनेतून पर्यटक त्यात उड्या मारत आहेत. हे प्रकार दरवर्षी घडत असल्याने त्यात अनेकांचे नाहक बळी जात आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने कठोर उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.पावसाच्या पाण्यामुळे खारघर परिसरात ठिकठिकाणी पाणथळे निर्माण झाली आहेत. ही पाणथळे सुध्दा धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.बिल्डरांवर अंकुश ठेवण्याची गरजखारघर शहरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याकरिता अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आलेले आहेत. या खड्ड्यांमुळे काही अपघात होणार नाहीत, याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची आहे. परंतु अनेक विकासकाकडून या नियमाला हरताळ फासला जात आहे. अशा बेजबाबदार विकासकांवर अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.