शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

खदाणी ठरताहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:28 IST

खारघर परिसरात पावसाळ्यात निर्माण झालेली डबकी धोकादायक ठरू लागली आहेत.

वैभव गायकरपनवेल : खारघर परिसरात पावसाळ्यात निर्माण झालेली डबकी धोकादायक ठरू लागली आहेत. पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेली ही खदाणी (डबकी) पर्यटकांना भुरळ घालत आहेत. मागील तीन दिवसांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत चार जणांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे. असे असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रविवारी खारघर येथील तळोजा कारागृहाच्या समोर असलेल्या डबक्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला, तर सोमवारी सेक्टर ३६ येथे एका बांधकाम व्यावसायिकाने खोदलेल्या खड्ड्यात बुडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे खारघर परिसरातील पावसाळी खड्डे जीवघेणे ठरू लागले आहेत. खारघर हा सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पारसिक डोंगराच्या सान्निध्यात उभारलेल्या या शहराला विपुल निसर्गसौंदर्य लाभले आहे. पावसाळ्यात येथील पांडवकडा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव पांडवकड्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि रायगडमधून येणाऱ्या हौशी पर्यटकांचा हिरमोड होत आहे. धबधब्याची मौज घेण्यासाठी दुरून आलेल्या पर्यटकांना खारघरमध्ये पावसाच्या पाण्याने तयार झालेली डबकी आकर्षित करू लागली आहेत. याच आकर्षणातून चार निष्पाप जणांचे बळी गेले आहेत.खारघरमध्ये सध्या मोठ्याप्रमणात विकासकामे सुरू आहेत. काही प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून सुरू आहेत, तर काही खासगी विकासकांचे आहेत. या विकास प्रकल्पाच्या कामासाठी मोठमोठे खड्डे खोदले आहेत. परंतु पावसामुळे या खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून संबंधित विकासकाने या ठिकाणी धोक्याचे फलक लावणे गरजेचे आहे. पाण्यात कोणी उतरू नये, यादृष्टीने डबक्याभोवती संरक्षण कुंपण लावण्याचीही गरज आहे. परंतु अनेक डबकी बेवारस असल्याने पर्यटकांना ते नैसर्गिक वाटू लागली आहेत. त्यामुळेच पांडवकडा नाही, तर या डबक्यात पोहण्याचा आनंद घेवू या भावनेतून पर्यटक त्यात उड्या मारत आहेत. हे प्रकार दरवर्षी घडत असल्याने त्यात अनेकांचे नाहक बळी जात आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने कठोर उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.पावसाच्या पाण्यामुळे खारघर परिसरात ठिकठिकाणी पाणथळे निर्माण झाली आहेत. ही पाणथळे सुध्दा धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.बिल्डरांवर अंकुश ठेवण्याची गरजखारघर शहरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याकरिता अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आलेले आहेत. या खड्ड्यांमुळे काही अपघात होणार नाहीत, याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची आहे. परंतु अनेक विकासकाकडून या नियमाला हरताळ फासला जात आहे. अशा बेजबाबदार विकासकांवर अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.