शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

महावितरणच्या खुल्या डीपींमुळे अपघातांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 22:48 IST

शहरातील पदपथांवरील खुल्या डीपींच्या दुरुस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नवी मुंबई : शहरातील पदपथांवरील खुल्या डीपींच्या दुरुस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे सतत दुर्घटना होत असून, त्यामध्ये अनेकांचे प्राणही गेले आहेत, तर पदपथांवरील या डीपींमुळे पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे.

महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. सर्वाधिक गैरसोय खुल्या केबल्स व पदपथांवरील डीपी यांच्यामुळे होत शॉक लागून आजवर अनेकांचा मृत्यूही झालेला आहे. तर कित्येक जण जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न बाळगता महावितरणची कामे केली जात आहेत. अशाच प्रकारातून नुकतेच कोपरखैरणेत रस्त्यावरील वायरचा स्फोट होऊन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली होती. तर घणसोलीत एका घरासमोर वीज वाहिनी पेटल्याने तिथे खेळणारी लहान मुलगी जखमी झाली होती.अशा अनेक घटना मागील काही वर्षांत घडल्या आहेत. यामुळे पदपथांवरील खुल्या डीपी तसेच निष्काळजी पणे रस्त्यावर व इतरत्र पडलेल्या वीजवाहिन्या जीवघेण्या ठरत आहेत. सद्यस्थितीला शहरातील प्रत्येक नोडमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे.

पुढील चार महिन्यांत महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींकडून प्रभागातील रस्ते, पदपथ, गटारे आदीच्या दुरुस्तीकामावर जोर दिला आहे. या कामांमध्येही महावितरणच्या वायरींचा अडथळा ठरत आहे. गटारांमधून वायरी टाकलेल्या असल्याने गटारांचे खोदकाम करताना वायर तुटल्यास कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.

प्रत्येक खोदकामा वेळी वीज वाहिन्या तुटण्याचे प्रकार घडून सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी बैठ्या चाळीतील अथवा रो-हाउसच्या दारातच या विद्युत डीपी बसवण्यात आल्या आहेत. यामुळे घरासमोर खेळणाºया लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत; परंतु नागरिकांच्या समस्या सोडवण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

शॉर्ट सर्किट होण्याचे प्रकार वाढले

महावितरणमुळे भेडसावणाºया या समस्यांमध्ये भविष्यात अधिकच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. दाब वाढल्याने अथवा खोदकामात वीजवाहिन्या तुटल्यास त्या ठिकाणी जोड लावून महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे. मात्र, काही ठिकाणी सातत्याने वाहिन्या तुटल्याचे प्रकार घडत असल्याने अवघ्या ५० ते १०० मीटरच्या वाहिनीला तीनपेक्षा जास्त जोड लावण्यात आले आहेत. हे जोड उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवण्यात आलेले असल्याने त्यामध्ये पाणी जाऊन अथवा उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्या ठिकाणी आग लागण्याचेही प्रकार घडत आहेत. यानंतरही महावितरणकडून संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य घेतले जात नसल्याचे सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजNavi Mumbaiनवी मुंबई