शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

कारच्या धडकेने रिक्षाचालक ठार, म् रिक्षासह एटीएम सेंटरचेही नुकसान; कारचालकास अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:42 IST

वाशी-कोपरखैरणे रोडवर गुरुवारी रात्री २ वाजता वेगाने जाणाºया कारने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक जनार्दन कमल यादवचे निधन झाले आहे. अपघातामध्ये रिक्षासह एटीएम सेंटरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पोलिसांनी आरोपी चालकास अटक केली आहे.

नवी मुंबई : वाशी-कोपरखैरणे रोडवर गुरुवारी रात्री २ वाजता वेगाने जाणाºया कारने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक जनार्दन कमल यादवचे निधन झाले आहे. अपघातामध्ये रिक्षासह एटीएम सेंटरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पोलिसांनी आरोपी चालकास अटक केली आहे.जुहूगाव सेक्टर-११मध्ये राहात असलेला जनार्दन कमल यादव हा १५ वर्षांपासून रिक्षाचालक म्हणून काम करत आहे. मूळ उत्तरप्रदेशमधील रहिवासी असून, पत्नी व तीन मुलांसह तो येथे वास्तव्य करत आहे. वृद्ध आई मूळ गावी राहते. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे एमएच ४३ एसी ९५२९ ही रिक्षा घेऊन तो वाशी सेक्टर-१७मधील अभ्युदय चौकीजवळील स्टँडवर उभा राहिला होता. रात्री २ वाजण्याच्या सुमारास नेरुळमधील रहिवासी असलेला अमोल नंदा कुंभार हा ३३ वर्षांचा तरुण एमएच ४३ बीई ८१५३ वेगाने चालवत निघाला होता. त्याचा कारवरील ताबा सुटल्याने त्याने रिक्षाला जोरदार धडक दिली. कार पदपथ ओलांडून समोरील एटीएम सेंटरमध्ये घुसली. महेंद्रा कोटक कंपनीचे एटीएम व येथील सिग्नलच्या पोलचेही नुकसान झाले आहे. भीषण अपघातामध्ये रिक्षाचालक जनार्दन यादव गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये नेण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कारचालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाला असून, त्याला सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी चालक अतिवेगाने कार चालवत होता. त्याने मद्यपान केल्याचे व येथील एका बारमधील कर्मचाºयांबरोबर त्याचे अपघातापूर्वी भांडण झाल्याचे सांगितले जात आहे; परंतु या गोष्टीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मृत यादव हा मूळ उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. पत्नी व लहान मुले असा परिवार असून, घरातील एकटाच कमविणारा होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. परिचितांनी दिवसभर रुग्णालयात जाऊन शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली.या प्रकरणी आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याने मद्यपान केले असण्याची शक्यता असल्याने त्याची वैद्यकीय चाचणी करून गुन्ह्यामध्ये मद्यपानाच्या कलमांचाही उल्लेख करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.मद्यपान केल्याचा संशयवाशीमध्ये मध्यरात्री अमोल नंदा कुंभार याने वेगाने कार चालवून रिक्षाचालकाचा बळी घेतला. वास्तविक अंतर्गत रोडवर एवढ्या वेगाने कार चालविण्याची गरज नव्हती; परंतु चालकाने मद्यपान केले असल्याचे व येथीलच एका बारमध्ये त्याचे भांडणही झाले असल्याचे बोलले जात आहे. या वृत्ताला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी आरोपीची वैद्यकीय चाचणी घेऊन त्याने मद्यपान केल्याचे आढळल्यास तसा उल्लेख एफआयआरमध्ये करावा व त्याच्यावर फक्त अपघाताऐवजी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृताच्या परिचितांनी केली आहे.गरीब चालकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावाकारचालकाच्या निष्काळजीपणामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. १५ वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाºया यादवच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्याची आई गावी असून, पत्नी व तीन मुले जुहूगावमध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा आधारच गेला आहे. ज्या कारचालकामुळे हा प्रकार झाला, त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. पोलीस नक्की काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Accidentअपघात