शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

कारवाईनंतरही रिक्षाचालकांची मुजोरी; सातत्याने मोहीम राबवूनही बेशिस्तीला लगाम नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 00:28 IST

आरटीओकडून ६९६ जणांवर कारवाई

नवी मुंबई : रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याचे चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे. मागील नऊ महिन्यात आरटीओकडून ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर देखील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक व सिग्नल तोडणे असे प्रकार रिक्षाचालकांमद्ये पहायला मिळत आहेत.

रिक्षांचे परमीट खुले केल्यापासून शहरातील रिक्षांमध्ये मागील दोन वर्षात प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक व खासगी वाहनांपेक्षा रिक्षाच सर्वाधिक धावताना दिसत आहेत. त्यापैकी बहुतांश रिक्षाचालकांकडून वाहतुकीच्या तसेच आरटीओच्या नियमांचे उघडपने उल्लंघन होत आहे. मीटरप्रमाणे मागणी करणारे प्रवासी भाडे नाकारुन शेअर भाडे मिळवले जात आहेत. त्यामध्ये चार किंवा पाच प्रवासी रिक्षात कोंबले जात आहेत. शेअर भाड्याच्या एका फेरीत मीटरच्या भाड्यापेक्षा जास्त नफा असल्याने त्यांच्याकडून हा पर्याय निवडला जात आहे. याकरिता एनएमएमटीचे बस थांबे, महत्वाचे चौक तसेच ठिकाणी अवैध थांबे तयार करण्यात आले आहेत. त्याठिकाणी रस्त्यांवरच रिक्षा थांबवून प्रवासी भरले जात आहेत. याचा फटका महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला बसत असून, अशा ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा होत आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

परंतु अनेकदा कारवाई करुन देखील रिक्षाचालकांना शिस्त लागत नसल्याचेही पहायला मिळत आहे. वाढत्या तक्रारीमुळे आरटीओडून गतवर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. तर वाहतुक पोलिसांकडून देखिल सातत्याने कारवाईचा धडाका सुरूच असतो. यानंतरही रिक्षाचालकांना वाहतुकीचे नियम अंगवळणी पडत नसल्याचे दिसून येत आहे. आरटीओ तसेच वाहतुक पोलिसांच्या कारवाईला न जुमता त्यांच्याकडून तिन पेक्षा जास्त प्रवासी रिक्षात भरले जात आहेत. तर अती वेगात रिक्षा पळवत असताना सिग्नलही तोडले जात आहेत. यामध्ये अपघाताचा धोका असून प्रवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण होत आहे. त्यामुळे सातत्याने नियमांची पायमल्ली करणारया रिक्षाचालकांचे परवाने कायमचे रद्द करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे. परंतु आरटीओकडून ठोस कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढतच चालली आहे. काही संघटना देखील अशा रिक्षाचालकांना पाठीशी घालत असल्याने त्यांच्यापुढे आरटीओ अधिकारयांनीही हात टेकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनावर तसेच प्रवाशांमध्ये संघटनेचा दबदबा वाढवण्यासाठी अशा प्रवृत्तींना थारा दिला जात आहे. त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून घेतला जात आहे. त्यांच्याकडून रात्री अपरात्री मद्यपान अथवा इतर नशा करुन रिक्षा चालवल्या जात आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी एकट्या महिलांमध्ये रिक्षातून प्रवास करताना असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे.बेशिस्त रिक्षाचालकांना आळा घालण्यासाठी त्यांचे परवाने कायमचे रद्द केले पाहिजेत. त्याकरिता वाहतूक पोलिसांऐवजी आरटीओकडून कारवाईवर जोर दिला जाणे आवश्यक आहे, परंतु मुजोर रिक्षाचालकांवर ठोस कारवाई होत नसल्याने अप्रत्यक्षरीत्या त्यांना पाठबळ मिळत असल्याचा संशय आहे. - रमजान मुजावर, रहिवाशी, कोपरखैरणेक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, तसेच इतर कारणांनी गतवर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ७९ बसेसवरदेखील कारवाई केली आहे. यापुढेही अशा स्वरूपाच्या कारवाया सुरू राहणार आहेत, परंतु कारवाईसाठी एकच पथक असल्याने तीव्र स्वरूपाची मोहीम राबविण्यात अडथळा निर्माण होत आहे. - दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा