शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

पुन्हा एकदा पेटणार क्रांतीची मशाल

By admin | Updated: February 21, 2017 06:36 IST

शहर वसविण्यासाठी आम्हाला भूमिहीन केले व आता आमची घरे अनधिकृत ठरवून डोक्यावरील छप्पर हिरावून घेण्याचे

नामदेव मोरे /नवी मुंबई शहर वसविण्यासाठी आम्हाला भूमिहीन केले व आता आमची घरे अनधिकृत ठरवून डोक्यावरील छप्पर हिरावून घेण्याचे षड्यंत्र सुरू आहे. अन्याय भूमिपुत्रांनी कधीच सहन केला नाही व संघर्ष केल्याशिवाय सरकारनेही काही दिले नाही. पोकळ आश्वासने आता बास झाली. जोपर्यंत संपूर्ण पुनर्वसन केले जात नाही तोपर्यंत पुन्हा एकदा क्रांतीची मशाल तेवत ठेवली पाहिजे. नवी मुंबईत जर इथल्या भूमिपुत्रांना सुखाने जगता येत नसेल तर सरकारलाही सुखाने राहू दिले जाणार नाही, असा इशारा प्रकल्पग्रस्त तरुणांनी दिला आहे. सिडको व सरकारविरोधात निर्वाणीचा लढा उभारण्यासाठी आगरी कोळी युथ फाऊंडेशनने प्रत्येक गावांमध्ये बैठकांचे आयोजन सुरू केले आहे. रविवारी नेरूळ व शिरवणे गावामध्ये जाऊन भूमिपुत्रांशी संवाद साधण्यात आला. आंदोलनामागील भूमिका समजावून सांगितली जात आहे. सरकारवर दबाव आणल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नसल्याचे स्पष्ट केले जात आहे. आंदोलन केल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. गप्प बसलो तर सिडको, महापालिका व शासनकर्ते घरावरील छप्पर हिरावल्याशिवाय राहणार नाहीत. आता सर्वांनी पेटून उठले पाहिजे. आपण कोणाकडे भिक मागत नाही, आपला हक्क मागतोय. आपल्याच भूमीत आपल्याला सुखाने राहण्याची मागणी करतोय; पण जवळपास पाच दशकांपासून सरकारी यंत्रणा फक्त आश्वासनांवर बोळवण करत आहे. १९७०मध्ये जमीन घेतली; पण अद्याप शंभर टक्के प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला दिलेला नाही. १९९०मध्ये साडेबारा टक्के योजना देण्याचे निश्चीत झाले; पण अद्याप त्याचे पूर्ण वितरण होऊ शकले नाही. नवी मुंबईचे नियोजन करताना गावठाणांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले. भूमिपुत्रांना अत्यावश्यक सुविधाही दिलेल्या नाहीत. ग्रामदेवतांच्या मंदिरांना अनधिकृत ठरविण्यात आले. देवांच्या अस्तित्वाचेही पुरावे मागितले जात आहेत. जमीन घेताना येथील उद्योग, सरकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते; पण प्रत्यक्षात नोकऱ्या मिळाल्या नाहीत. नवी मुंबईमध्ये गावे आहेत; पण गावांमध्ये नवी मुंबई नाही. सिडकोने साडेचार दशकांमध्ये गावठाण विस्तार केला नाही. कुटुंबांचा विस्तार झाल्याने व जुनी घरे मोडकळीस आल्याने भूमिपुत्रांनी नवीन घरे बांधली; पण या घरांना अनधिकृत ठरविले जात आहे. सीबीडी ते दिघापर्यंत १ हजार एकरापेक्षा जास्त जमिनीवर अतिक्रमण करून झोपड्या व व्यवसाय करणाऱ्यांची बांधकामे नियमित करण्यासाठी व त्यांना सुविधा देण्यासाठी सर्व धडपडत आहेत; पण प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर बुल्डोजर फिरविला जात आहे. या अन्याविरोधात आवाज उठविला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान सीबीडीमध्ये बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त भूमिपुत्रांनी सहभागी होऊन सरकारवरील दबाव वाढवावा, असे आवाहन गाव बैठकांमधून केले जात आहे. सामाजिक सुविधांचे भूखंड सिडकोने प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेचे वाटप करताना ३.७५ टक्के भूखंड सामाजिक सुविधांसाठी राखून ठेवले आहेत; परंतु प्रत्यक्षात त्या सुविधा प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या नाहीत. त्या सुविधा देण्यात याव्यात. एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना महामंडळाचे २००६चे धोरण आणि पुनर्वसन आणि पुनर्बहाली धोरण २००९ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाकडील मागण्या च्गावठाण व विस्तारित गावठाणांलगतच्या जमिनींचे सर्वेक्षण करणेशोतकऱ्यांना मालकीतत्त्वावर त्यांच्या व्याप्तक्षेत्राचा अधिकार सनद स्वरूपात देणे गावठाणांमधील घरे नियमित करून वाढीव चटईक्षेत्रासह पुनर्विकास करणे  ९५ गावांमधील विद्यार्थ्यांना विद्यावेतनाची तरतूद कायम असावीप्रकल्पक्षेत्रातील सरकारी व खासगी उद्योगक्षेत्रात नोकरीमध्ये प्राधान्य शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेशामध्ये आरक्षण देण्यात यावेसिडकोने उभारलेली घरे, गाळे व विविध व्यावसायिक परवानेवाटपामध्ये आरक्षण ठेवणेप्रकल्पग्रस्तांना कौशल्य विकास आणि प्रशिक्षणासाठी भरीव तरतूद असावीआश्वासने नको कृती हवी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले की सरकार आश्वासने देते; पण प्रत्यक्षात कृती केली जात नाही. २००७पासून गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचे आश्वासन दिले जात आहे; पण प्रत्यक्षात एकही घर नियमित केलेले नाही. सिडको व महापालिका प्रकल्पग्रस्तांवर बुल्डोजर फिरवत आहे. यामुळे आता कोरडे आश्वासन नको, दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.