शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

पनवेलचा शहराचा सुधारित आराखडा रखडला

By admin | Updated: August 11, 2015 03:29 IST

पनवेल शहराचा नियोजन आराखडा (टीपी स्कीम) मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आली आहेत. तरीही ही योजना पनवेल नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही.

- वैभव गायकर,  पनवेल

पनवेल शहराचा नियोजन आराखडा (टीपी स्कीम) मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आली आहेत. तरीही ही योजना पनवेल नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही. नगरविकास विभागाकडे या योजनेची फाईल व अधिसूचना धूळखात पडली आहे. गेल्या तीन वर्षांपासून यासंदर्भातील सुधारित आराखडा रखडला आहे. याकरिता पालिकेने जवळपास ८५ लाख रुपये खर्च केले असून आतापर्यंत केवळ वीस टक्के काम पूर्ण झाले आहे. वाढत्या लोकसंख्येचा ताण पनवेलच्या पायाभूत सुविधांवर सध्या पडत असून रस्ते, गटारे यासारख्या सुविधांचा विस्तार आणि विकास करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता नवीन टीपी स्कीम योजनेबाबत प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. नगरविकास विभागाने १३ आॅगस्ट २००९ रोजी अधिसूचना काढली. मात्र गेल्या सहा वर्षांत ही योजना केवळ कागदावरच आहे.सुधारित आराखडा अद्याप तयार नसल्याने शहरात सुविधांची वानवा असून अनेक भूखंडाची मोजणीही झाली नाही. काही भूखंडावरील नियोजित प्रकल्प ही रखडले आहेत. पनवेल नगरपालिकेत एकूण ५३८ मूळ भूखंड असून त्यापैकी ३२५ भूखंडांचेच रेकॉर्ड पालिका आणि भूमापन विभागाकडे आहे. उर्वरित जागेची मोजणी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मूळ भूखंडाचे अंतिम भूखंडात रूपांतर करण्याकरिता टीपी स्कीम अमलात येणे आवश्यक आहे. अंतिम भूखंड असल्याशिवाय बांधकाम परवानगी मिळत नसल्याने बांधकाम व्यावसायिकही टीपी स्कीमच्या प्रतीक्षेत आहेत. भूखंड अंतिम करताना पायाभूत सुविधांचा विचार केला जातो. मात्र हेही काम रखडल्याने रस्ता रुंदीकरण, ड्रेनेज आदी समस्या जैसे थे आहेत. मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण होत असून शहरातील झोपड्या वाढत आहेत. नोव्हेंबर २०१२ पासून काम सुरूआराखड्याचे काम नोव्हेंबर २०१२ मध्ये हाती घेण्यात आले असून नगरचनाकार श्रीकांत देव यांच्या नेतृत्वाखाली अनुपमा कुमवणी, तेजल सुताडे, अरुण सुरवसे असे एकूण चार जण त्यावर काम करीत आहेत. मात्र ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. याकरीता आतापर्यंत एकूण ८५ लाख खर्च झाला आहे. मुंबई महापालिकेचा सुधारित आराखडा सुध्दा या मंडळींनी आहे.सुधारित आराखडा तयार करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. यावर जवळपास ८५ लाख रुपये खर्च झाले आहे. शहर नियोजनासाठी पैसे खर्च होऊ द्या, पण त्या बदल्यात कामही झाले पाहिजे. आजमितीस केवळ १० ते २० टक्के काम झाल्याचा आरोप नगरसेवक जयंत पगडे यांनी केला आहे. काम अतिशय संथ गतीने सुरू असून ही चारही मंडळी काय काम करतात, किती काम झाले यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचा आरोप नगरसेवक जयंत पगडे यांनी केला आहे.