शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गांचे स्थायीत पडसाद, पालिकेचे पैसे व्यर्थ गेल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:45 IST

प्रशासनाला धरले धारेवर : पालिकेचे पैसे व्यर्थ गेल्याने नाराजी

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथील चारही भुयारी मार्गांची दुरवस्था झाली असून, या भुयारी मार्गांचा गैरवापर होत असल्याची बातमी शुक्र वार, १४ जून रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. या बातमीचे पडसाद स्थायी समिती सभेत उमटले, तसेच बातमीच्या माध्यमातून समोर आलेल्या गांभीर्याची दखल घेत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले.

सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाच्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात टाळण्यासाठी नेरु ळ एलपी येथे २, नेरु ळ एसबीआय कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविला होता. भुयारी मार्गांचे काम अपूर्ण असल्याने भुयारी मार्गांची दुरवस्था झाली होती. या भुयारी मार्गांचा वापर व्हावा तसेच या भागात स्वच्छता राहावी यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अर्धवट असलेल्या भुयारी मार्गांचे काम महापालिकेने सुमारे ४३ लाख रुपये खर्च करून पूर्ण केले होते.भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून सांडपाणी देखील साचले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. पामबीच मार्गावरील भुयारी मार्गाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत चर्चेसाठी आल्यावर नगरसेविका सरोज पाटील यांनी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत प्रशासनाला धारेवर धरले. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भुयारी मार्गांजवळ सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली.शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी यावर निवेदन करताना भुयारी मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधले असल्याचे सांगत त्याची देखभाल देखील त्या विभागाने करायची असल्याचे सांगितले. यावर सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी प्रशासन चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करीत भुयारी मार्गांच्या दुरु स्तीसाठी ५0 लाख रु पये खर्च केले मग नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे महापालिकेची जबाबदारी असल्याचे सांगितले. जर भुयारी मार्ग बंद ठेवायचे होते तर खर्च का केला, असा सवाल इथापे यांनी उपस्थित केला. नगरसेवक रंगनाथ औटी यांनी प्रशासन दिशाभूल करीत असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन काय करत आहे असा प्रश्न उपस्थित केला.भुयारी मार्ग स्वच्छ करण्याचे सभापतींचे आदेशच्नगरसेवक बहादूर बिष्ट यांनी नागरिकांच्या वापरासाठी खर्च केल्यावर नागरिकांना त्याचा वापर करता येत नसेल तर त्याचा काय उपयोग, भुयारी मार्गांच्या दुरवस्थेबाबत वर्तमानपत्रात बातमी येते त्यानंतर एखादी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा सवाल उपस्थित केला.च्अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी याबाबत आयुक्तांशी चर्चा करून सुरक्षारक्षक नेमण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सभापती नवीन गवते यांनी हा गंभीर प्रकार असल्याचे सांगत भुयारी मार्गाची स्वच्छता करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक नेमावेत असे आदेश प्रशासनाला दिले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई