शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

पावसाळ्यात पूरस्थिती येण्याची नागरिकांना भीती; सीईटीपीच्या वाहिन्यांसाठी कासाडी नदीत भराव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 10:01 IST

रोडपाली परिसरामध्ये पाणी कमी असल्याने येथे मशिनरी उभ्या करण्यासाठी एजन्सीकडून थेट कासाडी नदीमध्ये मोठा भराव टाकण्यात आला आहे.

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : तळोजा एमआयडीसीतील कारखान्यातून येणारे प्रक्रिया झालेले सांडपाणी वाहून नेण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रोडपाली परिसरामध्ये पाणी कमी असल्याने येथे मशिनरी उभ्या करण्यासाठी एजन्सीकडून थेट कासाडी नदीमध्ये मोठा भराव टाकण्यात आला आहे. मात्र हा भराव तात्पुरता असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले आहे.

तळोजा एमआयडीसीमधील कारखान्यातून बाहेर निघणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प आहे. सीईटीपीमध्ये नवीनीकरण करण्यात आले आहे. येथील यंत्र बदलण्यात आले आहेत. यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र प्रक्रिया झालेले एमआयडीसीचे सांडपाणी वाघिवली खाडीमध्ये बाहेर सोडले जाते. हे पाणी वाहून नेणारी पाइपलाइन ३० वर्षे जुनी झाली आहे. त्याला अनेक ठिकाणी लिकेज असल्याने हे पाणी कासाडी नदीमध्ये जाऊन पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये दुर्गंधी येऊन श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत आहे. तळोजा एमआयडीसीतील या प्रदूषणाबाबत माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. त्याचबरोबर नागरिकांकडून सुद्धा या विरोधात कायम आंदोलन करण्यात आले होते.

कासाडी नदीमध्ये मशीन उभ्या करण्यासाठी भराव टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी एमआयडीसीने सीआरझेड आणि मेरीटाईम बोर्डकडून परवानगी घेतली आहे. यामध्ये कांदळवनाचे नुकसान होणार नाही; याची खबरदारी घेण्यात आली आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून नदीचे पात्र पूर्वीसारखे करून देणार आहे.

- सुभाष कुंभार, सहायक अभियंता, एमआयडीसी तळोजा

३६  महिन्यांची एजन्सीला मुदत!

एकूण आठ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी एजन्सीला ३६  महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर रोडपाली पट्ट्यामध्ये मशीन उभ्या करण्यासाठी करण्यात आलेला भराव फक्त सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असणार असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले. त्या अगोदरच हे काम पूर्णत्वास येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रोडपाली भागात पाण्याची पातळी कमी

निविदा पद्धतीने हे काम एमईपीएल गॅन जेव्ही या कंपनीला देण्यात आले आहे. एकूण ६३०  व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. याअगोदर कामोठे खाडीत बोटीमध्ये मशिनरी ठेवून हे काम केले आहे.

मात्र रोडपाली भागात पाण्याची पातळी कमी आहे. ओहोटीमुळे पाणी खाडीत वाहून जाते, या कारणाने मशीन ठेवण्यासाठी या एजन्सीने साधारणपणे २०० मीटरचा भराव कासाडी नदीच्या मध्यभागी केला आहे. यामुळे पावसाचे पाणी येऊन पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हा भराव पाइपलाइन टाकण्यापुरता असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोणतीही आपत्ती होणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.