शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

खंडित विजेमुळे नागरिकांमध्ये संताप

By admin | Updated: July 16, 2016 02:01 IST

चिरनेर परिसरात रात्री-अपरात्री वारंवार आणि तासन्तास विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

उरण : चिरनेर परिसरात रात्री-अपरात्री वारंवार आणि तासन्तास विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या खेळखंडोब्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सेनेचे तालुका संपर्क प्रमुख संतोष ठाकूर, उरण पं. स. चे सभापती भास्कर मोकल यांच्या नेतृत्वाखाली उरण येथील महावितरण कार्यालयावरच धडक दिली. आठ दिवसांत वीज मंडळाच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.उरण परिसरात वीज गायब होण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात गलथान कारभार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे वीज वाहिन्या तुटल्याचे, तसेच वीज खांब कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. चिरनेर, कोप्रोली आणि ग्रामीण भागातील जीर्ण झालेल्या विद्युत तारा तत्काळ बदलण्यात याव्या, चिरनेरसाठी २५ नवीन विद्युत पोल उपलब्ध करून द्यावेत आणि विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा, याशिवाय जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या व वीज खांब तत्काळ बदलण्यात यावेत, अशा मागण्याही उपस्थित अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. आठ दिवसात वीज मंडळाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास आणि मागण्यांची पूर्तता न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. (वार्ताहर)पनवेल : देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७० वर्षे होत आली असली तरी पनवेल तालुक्यातील १० आदिवासी वाड्यांमध्ये अद्याप वीज पोहचू शकलेली नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या तालुक्यातील काही आदिवासी वाड्या आजही अंधारात चाचपडत आहेत. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शेकडो आदिवासी वाड्या आहेत. पैकी सागवाडी, वाघाचीवाडी, नेताली मानपाडा, करवली वाडी, पेंधर आदिवासीवाडी, वलप आदिवासीवाडी, वावंजा आदिवासीवाडी, सांबरमाल,कामतवाडी, कुंडेवहाळ कातकरवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये आजतागायत वीज पोहोचलेली नाही. करवलीवाडीत ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला आहे. मात्र त्यास वनखात्याकडून हरकत घेण्यात आल्याने काम पूर्ण होऊ शकलेले नाही.