शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

खंडित विजेमुळे नागरिकांमध्ये संताप

By admin | Updated: July 16, 2016 02:01 IST

चिरनेर परिसरात रात्री-अपरात्री वारंवार आणि तासन्तास विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

उरण : चिरनेर परिसरात रात्री-अपरात्री वारंवार आणि तासन्तास विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या खेळखंडोब्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सेनेचे तालुका संपर्क प्रमुख संतोष ठाकूर, उरण पं. स. चे सभापती भास्कर मोकल यांच्या नेतृत्वाखाली उरण येथील महावितरण कार्यालयावरच धडक दिली. आठ दिवसांत वीज मंडळाच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.उरण परिसरात वीज गायब होण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात गलथान कारभार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे वीज वाहिन्या तुटल्याचे, तसेच वीज खांब कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. चिरनेर, कोप्रोली आणि ग्रामीण भागातील जीर्ण झालेल्या विद्युत तारा तत्काळ बदलण्यात याव्या, चिरनेरसाठी २५ नवीन विद्युत पोल उपलब्ध करून द्यावेत आणि विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा, याशिवाय जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या व वीज खांब तत्काळ बदलण्यात यावेत, अशा मागण्याही उपस्थित अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. आठ दिवसात वीज मंडळाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास आणि मागण्यांची पूर्तता न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. (वार्ताहर)पनवेल : देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७० वर्षे होत आली असली तरी पनवेल तालुक्यातील १० आदिवासी वाड्यांमध्ये अद्याप वीज पोहचू शकलेली नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या तालुक्यातील काही आदिवासी वाड्या आजही अंधारात चाचपडत आहेत. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शेकडो आदिवासी वाड्या आहेत. पैकी सागवाडी, वाघाचीवाडी, नेताली मानपाडा, करवली वाडी, पेंधर आदिवासीवाडी, वलप आदिवासीवाडी, वावंजा आदिवासीवाडी, सांबरमाल,कामतवाडी, कुंडेवहाळ कातकरवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये आजतागायत वीज पोहोचलेली नाही. करवलीवाडीत ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला आहे. मात्र त्यास वनखात्याकडून हरकत घेण्यात आल्याने काम पूर्ण होऊ शकलेले नाही.