शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

हुसेनी इमारतीच्या पुनरावृत्तीचा धसका, प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:30 IST

मुंबईतील जे. जे. मार्गावर असलेली हुसेनी ही सुमारे शंभर वर्षे जुनी इमारत गुरुवारी कोसळली. या अपघातात २१ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

नवी मुंबई : मुंबईतील जे. जे. मार्गावर असलेली हुसेनी ही सुमारे शंभर वर्षे जुनी इमारत गुरुवारी कोसळली. या अपघातात २१ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, हुसेनी इमारतीच्या दुर्घटनेनंतर नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. चाळीस वर्षांत धोकादायक बनलेल्या अनेक इमारतींतून हजारो रहिवासी जीव मुठीत घेवून जगत आहेत. गुरुवारच्या दुर्घटनेनंतर या रहिवाशांनी चांगलाच धसका घेतला आहे.महापालिकेने ३१५ इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. यात सर्वाधिक सिडकोनिर्मित इमारतींचा समावेश आहेत. या इमारती राहण्यास धोकादायक बनल्या आहेत. नियमानुसार या इमारती रिकाम्या करणे आवश्यक असते. परंतु वर्षानुवर्षे धोकादायक जाहीर होवूनही आजही या इमारतींचा निवासी वापर सुरू असल्याचे दिसून आले आहे. जवळपास दोन लाख रहिवासी अशा मोडकळीस आलेल्या इमारतींतून वास्तव्य करीत असल्याचा ढोबळ अंदाज आहे.हुसेनी इमारतीच्या दुर्घटनेनंतर या रहिवाशांनी चांगलाच धसका घेतला आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीबरोबरच निकृष्ट दर्जाच्या अनधिकृत बांधकामांचाही प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.प्रकल्पग्रस्तांनी गाव-गावठाणात गरजेपोटी मोठ्या प्रमाणात बांधकामे उभारली आहेत. काहींनी फिफ्टी-फिफ्टी तत्त्वावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. ही बांधकामे अनियंत्रित व निकृष्ट दर्जाचे असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विशेष म्हणजे दाटीवाटीने उभारलेल्या या बांधकामांमुळे एखादा अपघात घडल्यास बचाव कार्य करताना संबंधित यंत्रणांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे या बांधकामांचा समूह विकासातून पुनर्विकास करण्याचा मुद्दा मध्यंतरी चर्चेला आला होता. परंतु काही प्रकल्पग्रस्त नेत्यांनी त्याला विरोध करीत बांधकामे आहेत, त्या स्थितीत कायम करण्याची मागणी केली. त्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले.प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याच्या मुद्द्यावर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत चर्चा घडवून आणली. या सर्व परिस्थितीचा सकारात्मक विचार करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २0१५ पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेत तसा कायदाही पारित केला.त्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या जवळपास २५ हजार बांधकामांना अभय मिळाले. परंतु हा कायदा करून सहा महिने उलटून गेले तरी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संभ्रमात पडले आहेत. कारण बांधकामे नियमित करण्याचे निकष व अटी काय असतील हे अद्यापि गुलदस्त्यात आहे. याबाबतच्या आराखडा तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना आपल्या जुन्या बांधकामांची डागडुजीही करता येत नाही.अशा परिस्थितीत हुसेनी इमारतीप्रमाणे एखादी दुर्घटना घडलीच तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महापालिकेची उदासीनतासिडकोनिर्मित जुन्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआयचा निर्णय झाला आहे. परंतु विविध कारणांमुळे या प्रक्रियेला खीळ बसली आहे. विशेष म्हणजे इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर ती रिकामी करण्याचे काम महापाालिकेचे आहे. परंतु मागील दहा वर्षांपासून धोकादायक इमारतीच्या यादीत समावेश असूनही त्या रिकाम्या करण्यासंदर्भात संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अशा इमारतीतून राहणाºया जवळपास दोन लाख रहिवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.