शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

१९८५ सालचा व्यापारी जहाज वाहतूक कायदा केला रद्द; नवीन विधेयकासाठी मागवल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 07:13 IST

भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेचे सर्व आधुनिक संकेत आणि नियम या नव्या २०२० कायद्याच्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

 मधुकर ठाकूरउरण : बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने व्यापारी जहाज वाहतूक कायदा १९८५ आणि १८३८ किनारी जहाज कायदा रद्द करून सार्वजनिक सल्लामसलतीसाठी व्यापारी जहाज वाहतूक विधेयक २०२० चा मसुदा प्रसारित केला आहे. दोन्ही कायदे रद्द करण्यामागे नवा कायदा स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे.

व्यापारी जहाज वाहतूक विधेयक २०२० चा मसुदा हा भारतीय नौवहन उद्योगात अमेरिका, जपान, यूके, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित राष्ट्रांमधील उत्तमोत्तम पद्धतींचा अवलंब करून सागरी व्यवसाय क्षेत्राचा विकास करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आला आहे. भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेचे सर्व आधुनिक संकेत आणि नियम या नव्या २०२० कायद्याच्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. जहाजांची सुरक्षितता आणि संरक्षण, समुद्रावर जीवनाचे संरक्षण, सागरी प्रदूषणाला आळा, सागरी प्रवासातील उत्तरदायित्व व भरपाई यांची तरतूद आणि आंतरराष्ट्रीय संकेत पाळून सर्वसमावेशक स्वीकाराची हमी यासाठी पुरेशा तरतुदीही केलेल्या आहेत.

या तरतुदींमुळे अनेक फायदे मिळणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन-कायद्यानुसार भारतीय जहाजांना सर्वसामान्य व्यापार परवाना घेण्याची आवश्यकता भासणार नाही. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार व नोंदणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धत, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक परवाने, प्रमाणपत्रे आणि पेमेंट यासोबतच इलेक्ट्रॉनिक करार, रेकॉर्डस् आणि लॉग बुक्सना वैधानिक अधिकृत मान्यता मिळणार आहे. माल नेण्याच्या क्षमतेत वाढ आणि जहाजाला व्यापारी मिळकत म्हणून मान्यता, जहाजाच्या मालकी हक्कासंबंधीच्या पात्रता निकषांना शिथिलता देऊन जहाजाची मालकी मूळ कंपनीला हस्तांतरित करण्यासाठी (बेअरबोट चार्टर कम डिमाईस) नोंदणी या तरतुदींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अधिक संधी निर्माण होणार आहेत. भारतात बँकेबल शिपिंग कार्यक्षेत्र आणि अडचणींच्या परिस्थितीला अटकाव प्रस्तावित विधेयक हे सागरी घटनांसाठी तत्काळ प्रतिसाद निर्धारित करण्यासाठी हा नवा कायदा पहिल्यावहिल्या अधिकृत चौकटीला आकार देणारा ठरणार आहे. या तरतुदी प्रतिसाद यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीची सुविधा देत एखादी दुर्घटना वा इतर आपत्ती यापासून संरक्षण मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा दावाही संबंधित मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

काम सोडून दिलेल्या जहाजावरील खलाश्यांचे पुनर्वसन करण्याची तरतूद या नव्या कायद्यात सुधारणा केली आहे. तसेच जहाजावरील खलाशांचे पुनर्वसन, जहाजांची सुरक्षा, निर्णय आणि दाव्यांच्या अंदाजाचे बळकटीकरण करणेही शक्य होणार आहे. समुद्रात जहाजाच्या टकरीच्या घटनांचा तपास आणि निवाडा यासंबंधीचे दाव्यांना बळकटी येण्यासाठी, उच्च न्यायालयाकडून मूल्यांकनकर्त्यांना प्रत्येक जहाजाच्या दोषाचे मापन करण्याची मुभा देण्याची सोय या नव्या कायद्याच्या मसुद्यात केली आहे.

मसुद्यावर जनतेकडून मागविल्या २४ डिसेंबरपर्यंत इमेलद्वारे सूचना

भारत हे सक्रिय अंमलबजावणी कार्यक्षेत्र बनणार आहे. त्यामुळे असुरक्षित तसेच समुद्रात जीविताला धोका उत्पन्न करणाऱ्या जहाजांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालकांना देण्याचे आणि ते ताब्यात घेण्याच्या आदेशावर अपील करण्याचे अधिकार कायद्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. व्यापारी जहाज वाहतूक कायदा १९८५ आणि १८३८ किनारी जहाज कायदा रद्द करून सार्वजनिक सल्लामसलतीसाठी व्यापारी जहाज वाहतूक विधेयक २०२० चा मसुदा प्रसारित केला आहे. . नागरिकांना  त्यांच्या  सूचना msbill2020@gmail.com या इमेल आयडीवर २४ डिसेंबर २०२० पर्यंत पाठवता येतील.