शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

रिमोटवर चालणारी विदेशी सिग्नल यंत्रणा निरुपयोगी; वाहतूक पोलिसांवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:12 IST

सिग्नल यंत्रणा अद्ययावत करत शहरात सात ठिकाणी विदेशी तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र हे सिग्नल पादचाऱ्यांच्या इशाºयावर चालत नसल्याने हात दाखवून रस्ता ओलांडा या देशी पध्दतीवरच त्याठिकाणी रस्ता ओलांडला जात आहे

नवी मुंबई : सिग्नल यंत्रणा अद्ययावत करत शहरात सात ठिकाणी विदेशी तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र हे सिग्नल पादचाऱ्यांच्या इशाºयावर चालत नसल्याने हात दाखवून रस्ता ओलांडा या देशी पध्दतीवरच त्याठिकाणी रस्ता ओलांडला जात आहे, तर काही ठिकाणी ही अद्ययावत यंत्रणा बसवल्याचे माहीतच नसल्याचे विदेशी सिग्नल यंत्रणा निरुपयोगी ठरत आहे.महापालिकेने पादचाºयांच्या सोयीसाठी विदेशी संकल्पनेनुसार शहरात अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसवण्याला सुरवात केली आहे. त्यानुसार मार्च महिन्यात प्राथमिक स्वरूपात सात ठिकाणी ही यंत्रणा अवगत करण्यात आली. त्याठिकाणी सिग्नलचा रिमोट पादचाºयांच्या हाती देण्यात आलेला आहे. पादचाºयांकडून तिथले बटण दाबले गेल्यास ठरावीक वेळानंतर सिग्नल लागून त्यांना रस्ता ओलांडण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी त्यामागची संकल्पना आहे. मात्र सातपैकी बहुतांश ठिकाणची ही विदेशी सिग्नल यंत्रणा कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापैकी ऐरोली व ठाणे-बेलापूर मार्गावरील यंत्रणा पुलाच्या कामादरम्यान वाहतूककोंडी टाळण्यासाठी बंद ठेवल्याचे सांगितले जात आहे. तर नुकतेच पूल वापरासाठी खुले झाल्याने तिथले विदेशी तंत्रज्ञानावरील सिग्नल सुरू केले जातील, असेही अधिकाºयांकडून सांगितले जात आहे.परंतु सिग्नलचा रिमोट पादचाºयांच्या हाती देवूनही त्याचा उपयोग होत नसल्याची खंत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. याकरिता बेशिस्त चालकांची मानसिकता कारणीभूत असल्याचाही आरोप केला जात आहे.दुबई, सिंगापूर, मलेशिया आदी देशांमधील सिग्नल यंत्रणेचे तंत्रज्ञान वापरुन नवी मुंबई महापालिकेनेही पादचाºयांची काळजी घेण्याला सुरवात केली आहे.त्याकरिता कोपरखैरणेतील डी मार्ट चौक, स्वामी विवेकानंद चौक, ऐरोलीतील पुरुषोत्तम खेडकर चौक, स्वामी समर्थ चौक तसेच ठाणे -बेलापूर मार्गावर मुकुंद कंपनीसमोर, भारत बिजली चौक आणि रबाळे जंक्शन याठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञानावरील सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र सिग्नल लागलेला असतानाही पादचाºयांना रस्ता ओलांडण्याची संधी न देता वाहने पळवण्याची शहरातील बहुतांश चालकांची मानसिकता दिसून येत आहे. यामुळे रस्ता ओलांडण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत पादचाºयांना थांबावे लागत आहे.पर्यायी सिग्नल लागलेला आहे की सुरू याचा विचार न करता देशी पध्दतीनेच येणाºया वाहनाला हात दाखवून रस्ता ओलांडण्याचा मार्ग अवलंबावा लागत आहे. त्यामुळे पालिकेकडून सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्चव्यर्थ जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.शहरात बसवलेली विदेशी पद्धतीची सिग्नल यंत्रणा सुस्थितीत असल्याचा आढावा शनिवारीच घेण्यात आलेला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलाच्या कामादरम्यान तिथली यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. लवकरच ती पुन्हा सुरु केली जाईल.- प्रवीण गाडे, पालिका अभियंता

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई