शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

रिमोटवर चालणारी विदेशी सिग्नल यंत्रणा निरुपयोगी; वाहतूक पोलिसांवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:12 IST

सिग्नल यंत्रणा अद्ययावत करत शहरात सात ठिकाणी विदेशी तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र हे सिग्नल पादचाऱ्यांच्या इशाºयावर चालत नसल्याने हात दाखवून रस्ता ओलांडा या देशी पध्दतीवरच त्याठिकाणी रस्ता ओलांडला जात आहे

नवी मुंबई : सिग्नल यंत्रणा अद्ययावत करत शहरात सात ठिकाणी विदेशी तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र हे सिग्नल पादचाऱ्यांच्या इशाºयावर चालत नसल्याने हात दाखवून रस्ता ओलांडा या देशी पध्दतीवरच त्याठिकाणी रस्ता ओलांडला जात आहे, तर काही ठिकाणी ही अद्ययावत यंत्रणा बसवल्याचे माहीतच नसल्याचे विदेशी सिग्नल यंत्रणा निरुपयोगी ठरत आहे.महापालिकेने पादचाºयांच्या सोयीसाठी विदेशी संकल्पनेनुसार शहरात अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसवण्याला सुरवात केली आहे. त्यानुसार मार्च महिन्यात प्राथमिक स्वरूपात सात ठिकाणी ही यंत्रणा अवगत करण्यात आली. त्याठिकाणी सिग्नलचा रिमोट पादचाºयांच्या हाती देण्यात आलेला आहे. पादचाºयांकडून तिथले बटण दाबले गेल्यास ठरावीक वेळानंतर सिग्नल लागून त्यांना रस्ता ओलांडण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी त्यामागची संकल्पना आहे. मात्र सातपैकी बहुतांश ठिकाणची ही विदेशी सिग्नल यंत्रणा कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापैकी ऐरोली व ठाणे-बेलापूर मार्गावरील यंत्रणा पुलाच्या कामादरम्यान वाहतूककोंडी टाळण्यासाठी बंद ठेवल्याचे सांगितले जात आहे. तर नुकतेच पूल वापरासाठी खुले झाल्याने तिथले विदेशी तंत्रज्ञानावरील सिग्नल सुरू केले जातील, असेही अधिकाºयांकडून सांगितले जात आहे.परंतु सिग्नलचा रिमोट पादचाºयांच्या हाती देवूनही त्याचा उपयोग होत नसल्याची खंत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. याकरिता बेशिस्त चालकांची मानसिकता कारणीभूत असल्याचाही आरोप केला जात आहे.दुबई, सिंगापूर, मलेशिया आदी देशांमधील सिग्नल यंत्रणेचे तंत्रज्ञान वापरुन नवी मुंबई महापालिकेनेही पादचाºयांची काळजी घेण्याला सुरवात केली आहे.त्याकरिता कोपरखैरणेतील डी मार्ट चौक, स्वामी विवेकानंद चौक, ऐरोलीतील पुरुषोत्तम खेडकर चौक, स्वामी समर्थ चौक तसेच ठाणे -बेलापूर मार्गावर मुकुंद कंपनीसमोर, भारत बिजली चौक आणि रबाळे जंक्शन याठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञानावरील सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र सिग्नल लागलेला असतानाही पादचाºयांना रस्ता ओलांडण्याची संधी न देता वाहने पळवण्याची शहरातील बहुतांश चालकांची मानसिकता दिसून येत आहे. यामुळे रस्ता ओलांडण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत पादचाºयांना थांबावे लागत आहे.पर्यायी सिग्नल लागलेला आहे की सुरू याचा विचार न करता देशी पध्दतीनेच येणाºया वाहनाला हात दाखवून रस्ता ओलांडण्याचा मार्ग अवलंबावा लागत आहे. त्यामुळे पालिकेकडून सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्चव्यर्थ जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.शहरात बसवलेली विदेशी पद्धतीची सिग्नल यंत्रणा सुस्थितीत असल्याचा आढावा शनिवारीच घेण्यात आलेला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलाच्या कामादरम्यान तिथली यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. लवकरच ती पुन्हा सुरु केली जाईल.- प्रवीण गाडे, पालिका अभियंता

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई