शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

धर्म, मंदिराच्या राजकारणाने देशात चिंतेचे वातावरण; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 01:39 IST

देशात धर्म, जात व मंदिराच्या नावाखाली शंका व चिंतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे; परंतु देशाची सूत्रे हातात असणाऱ्यांनी चार वर्षांपासून सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने सुरू केला आहे.

कळंबोली : देशात धर्म, जात व मंदिराच्या नावाखाली शंका व चिंतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे; परंतु देशाची सूत्रे हातात असणाऱ्यांनी चार वर्षांपासून सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने सुरू केला आहे. उदात्त भावनेने काम करण्याची सरकारची मनस्थिती नसून, त्यांच्या विरोधात पुरोगारी विचाराच्या सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, धर्म ही वैयक्तिक बाब आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. घराबाहेर आपण वावरतो, तेव्हा भारतीय म्हणून विचार करण्याची गरज आहे. देशात अनेक जाती, धर्माचे लोक राहतात त्या सर्वांना आधार देण्याचे काम सरकारने केले पाहिजे. सरकारने लोकांची सेवा करण्याची भूमिका घेतली पाहिजे; परंतु सद्यस्थितीमध्ये देशाची सूत्रे हातात असणारे उदात्त भावनेने काम करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जात आहे. देशातील बेरोजगारीच्या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. या शक्तीविरोधात पुरोगावी विचारांच्या सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. बाळाराम पाटील यांना त्यांचे वडील दिवंगत शेकापनेते दत्ता पाटील यांचा वारसा मिळाला आहे. दत्ता यांनी लोकहिताच्या प्रश्नावर कधीही तडतोड केली नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. सुनील तटकरे यांनीही बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून पुरोगामी विचार कोकणात पोहोचला असल्याचे मत व्यक्त केले. आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार विवेक पाटील व शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कामोठेमध्ये झालेल्या या कार्यक्रमास आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रेय सावंत, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रवादीचे सतीश पाटील, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, सभापती काशिनाथ पाटील, चंद्रकांत राऊत, कामगार नेते महेंद्र घरत, बबन पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.५५ लाखांचा निधी झोपडपट्टीधारकांसाठी- शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाळाराम पाटील यांना ५५ लाखांचा धनादेश देऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले.- या निधीचा वापर झोपडपट्टीधारकांना पंतप्रधान योजनेंतर्गत जे पैसे शासनाला द्यायचे आहेत, त्याकरिता केला जाणार असल्याचे माजी आमदार विवेक पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार