शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

धर्म, मंदिराच्या राजकारणाने देशात चिंतेचे वातावरण; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 01:39 IST

देशात धर्म, जात व मंदिराच्या नावाखाली शंका व चिंतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे; परंतु देशाची सूत्रे हातात असणाऱ्यांनी चार वर्षांपासून सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने सुरू केला आहे.

कळंबोली : देशात धर्म, जात व मंदिराच्या नावाखाली शंका व चिंतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे; परंतु देशाची सूत्रे हातात असणाऱ्यांनी चार वर्षांपासून सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने सुरू केला आहे. उदात्त भावनेने काम करण्याची सरकारची मनस्थिती नसून, त्यांच्या विरोधात पुरोगारी विचाराच्या सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, धर्म ही वैयक्तिक बाब आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. घराबाहेर आपण वावरतो, तेव्हा भारतीय म्हणून विचार करण्याची गरज आहे. देशात अनेक जाती, धर्माचे लोक राहतात त्या सर्वांना आधार देण्याचे काम सरकारने केले पाहिजे. सरकारने लोकांची सेवा करण्याची भूमिका घेतली पाहिजे; परंतु सद्यस्थितीमध्ये देशाची सूत्रे हातात असणारे उदात्त भावनेने काम करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जात आहे. देशातील बेरोजगारीच्या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. या शक्तीविरोधात पुरोगावी विचारांच्या सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. बाळाराम पाटील यांना त्यांचे वडील दिवंगत शेकापनेते दत्ता पाटील यांचा वारसा मिळाला आहे. दत्ता यांनी लोकहिताच्या प्रश्नावर कधीही तडतोड केली नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. सुनील तटकरे यांनीही बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून पुरोगामी विचार कोकणात पोहोचला असल्याचे मत व्यक्त केले. आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार विवेक पाटील व शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कामोठेमध्ये झालेल्या या कार्यक्रमास आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रेय सावंत, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रवादीचे सतीश पाटील, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, सभापती काशिनाथ पाटील, चंद्रकांत राऊत, कामगार नेते महेंद्र घरत, बबन पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.५५ लाखांचा निधी झोपडपट्टीधारकांसाठी- शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाळाराम पाटील यांना ५५ लाखांचा धनादेश देऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले.- या निधीचा वापर झोपडपट्टीधारकांना पंतप्रधान योजनेंतर्गत जे पैसे शासनाला द्यायचे आहेत, त्याकरिता केला जाणार असल्याचे माजी आमदार विवेक पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार