शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

उल्हास नदीचे पाणी चिल्हार नदीत सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 04:29 IST

देवेंद्र साटम यांची मागणी : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले निवेदन

नेरळ : कर्जत तालुक्यातील टाटा पॉवरचे पाणी उल्हास नदीत सोडले जाते त्यापैकी काही पाणी चिल्हार नदीत सोडण्यात यावे, या संदर्भातले निवेदन भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र साटम यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मंत्रालयात दिले.

साटम यांनी निवेदनात, कर्जत तालुक्यातील टाटा भिवपुरी पॉवर हाउसचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी उल्हास नदीत सोडण्यात येते. यापैकी काही पाणी कालव्याद्वारे अथवा पंपिंग करून तालुक्यातील चिल्हार नदीत सोडल्याने, संपूर्ण आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत येण्यास किमान साठ ते सत्तर गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल. तसेच जनावरांना व शेतीलादेखील मुबलक पाणी मिळू शकेल. या भागात मार्चनंतर पाण्याची तीव्र टंचाई असते. त्यामुळे बहुसंख्य आदिवासी लोकसंख्या असलेली गावे शासनाने ट्रायबल झोन म्हणून विशेष योजनांचा लाभ दिलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या कामी चिल्हार जोडनदी प्रकल्पाबाबत दिल्लीत नितीन गडकरी यांच्या सोबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आल्याचा संदर्भ निवेदनात करण्यात आला आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदन स्वीकारून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन साटम यांना दिले.

टॅग्स :riverनदीRaigadरायगड