शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

उल्हास नदीचे पाणी चिल्हार नदीत सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 04:29 IST

देवेंद्र साटम यांची मागणी : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले निवेदन

नेरळ : कर्जत तालुक्यातील टाटा पॉवरचे पाणी उल्हास नदीत सोडले जाते त्यापैकी काही पाणी चिल्हार नदीत सोडण्यात यावे, या संदर्भातले निवेदन भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र साटम यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मंत्रालयात दिले.

साटम यांनी निवेदनात, कर्जत तालुक्यातील टाटा भिवपुरी पॉवर हाउसचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी उल्हास नदीत सोडण्यात येते. यापैकी काही पाणी कालव्याद्वारे अथवा पंपिंग करून तालुक्यातील चिल्हार नदीत सोडल्याने, संपूर्ण आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत येण्यास किमान साठ ते सत्तर गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल. तसेच जनावरांना व शेतीलादेखील मुबलक पाणी मिळू शकेल. या भागात मार्चनंतर पाण्याची तीव्र टंचाई असते. त्यामुळे बहुसंख्य आदिवासी लोकसंख्या असलेली गावे शासनाने ट्रायबल झोन म्हणून विशेष योजनांचा लाभ दिलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या कामी चिल्हार जोडनदी प्रकल्पाबाबत दिल्लीत नितीन गडकरी यांच्या सोबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आल्याचा संदर्भ निवेदनात करण्यात आला आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदन स्वीकारून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन साटम यांना दिले.

टॅग्स :riverनदीRaigadरायगड