शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

उल्हास नदीचे पाणी चिल्हार नदीत सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 04:29 IST

देवेंद्र साटम यांची मागणी : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले निवेदन

नेरळ : कर्जत तालुक्यातील टाटा पॉवरचे पाणी उल्हास नदीत सोडले जाते त्यापैकी काही पाणी चिल्हार नदीत सोडण्यात यावे, या संदर्भातले निवेदन भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र साटम यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मंत्रालयात दिले.

साटम यांनी निवेदनात, कर्जत तालुक्यातील टाटा भिवपुरी पॉवर हाउसचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी उल्हास नदीत सोडण्यात येते. यापैकी काही पाणी कालव्याद्वारे अथवा पंपिंग करून तालुक्यातील चिल्हार नदीत सोडल्याने, संपूर्ण आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत येण्यास किमान साठ ते सत्तर गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल. तसेच जनावरांना व शेतीलादेखील मुबलक पाणी मिळू शकेल. या भागात मार्चनंतर पाण्याची तीव्र टंचाई असते. त्यामुळे बहुसंख्य आदिवासी लोकसंख्या असलेली गावे शासनाने ट्रायबल झोन म्हणून विशेष योजनांचा लाभ दिलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या कामी चिल्हार जोडनदी प्रकल्पाबाबत दिल्लीत नितीन गडकरी यांच्या सोबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आल्याचा संदर्भ निवेदनात करण्यात आला आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदन स्वीकारून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन साटम यांना दिले.

टॅग्स :riverनदीRaigadरायगड