शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सीआरझेडचा विळखा होणार शिथिल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 07:00 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सीआरझेड-२ क्षेत्रामुळे बाधित झालेल्या बांधकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे सीआरझेडच्या कचाट्यात सापडलेल्या शहरातील शेकडो बांधकामांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई  - राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सीआरझेड-२ क्षेत्रामुळे बाधित झालेल्या बांधकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे सीआरझेडच्या कचाट्यात सापडलेल्या शहरातील शेकडो बांधकामांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पामबीच मार्गासह शहराच्या विविध क्षेत्रात सुमारे ११९ इमारती, तसेच गाव-गावठाणातील शेकडो बांधकामांना त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.सिडकोने पामबीच मार्गावर निविदा काढून विकासकांना भूखंड दिले. या भूखंडांच्या विकासासाठी महापालिकेने नियमानुसार बांधकाम परवानगीही दिली. सध्या या इमारती बांधून पूर्ण झाल्या असून, त्यांचा रहिवासी निवासी वापर सुरू आहे. असे असले तरी २०११मध्ये सीआरझेड कायद्यात सुधारणा करून सागरी किनाºयाची मर्यादा वाढविल्याने या इमारती सीआरझेडच्या कात्रीत अडकल्या. त्यामुळे महापालिकेने या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दर्शविला. शहरात अशा प्रकारच्या ११९ इमारती आहेत. त्याशिवाय येथील मूळ २८ गावे सीआरझेड क्षेत्रात मोडतात. तसेच सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप केलेल्या भूखंडांना सीआरझेडचा विळखा पडला आहे. परिणामी, या इमारती अनधिकृत घोषित करण्यात आल्या आहेत. सिडको आणि महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या अनेक विकास प्रकल्पांना सीआरझेड कायद्याचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतून सीआरझेड कायदा शिथिल करावा, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्य सरकारकडे लावून धरली होती. यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अंशत: यश येताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.पर्यावरण अधिनियम १८५६ नुसार सिडकोने १९ फेब्रुवारी १९९१ रोजी जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये नवी मुंबई क्षेत्रातील समुद्राची उच्चतम भरतीरेषा अर्थात हाय टाइड लाइन (एचटीएल) जाहीर केली होती. त्यानंतर पामबीच मार्गाची निर्मिती करण्यात आली. या पामबीच मार्गाची पश्चिमेकडील बाजू खारफुटी व सीआरझेड क्षेत्रात मोडत असल्याने तेथे कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नाहीत. तर या मार्गाच्या अलीकडील बाजूस मात्र सिडकोने निविदा काढून भूखंडांची विक्री करून करोडो रुपये कमविले. त्या भूखंडावर बांधकाम परवानगी देऊन नवी मुंबई महापालिकेने विकास शुल्कापोटी कोट्यवधी रुपये वसूल केले, असे असताना अचानक सदर भूखंड सीआरझेड क्षेत्र-२मध्ये मोडत असल्याचे कारण सांगत, ११९ इमारतींना नोटिसा बजावून महापालिकेने विकासकांच्या मानगुटीवर एमसीझेडएमएचे भूत बसवून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. याबाबतची खरी परिस्थिती वारंवार राज्याच्या पर्यावरण विभागाच्या निदर्शनास आणूनदेखील पर्यावरण विभागाने अद्याप सीआरझेड क्लिअरन्स दिलेला नाही; परंतु राज्य सरकारनेच यासंदर्भात सकारात्मक पावले उचलल्याने दीर्घकाळ रखडलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महापालिका क्षेत्रातील सर्व गाव-गावठाणे खाडीकिनाºयावर आहेत. त्यामुळे या सर्व गावांचा समावेश सीआरझेडमध्ये येत असल्याने त्याचा फटका प्रकल्पग्रस्तांच्या विकास प्रक्रियेला बसला आहे. ही गावे सीआरझेडमधून वगळावीत, यासाठी मागील तीन वर्षांपासून आपला पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याने हा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- मंदा म्हात्रे,आमदार, बेलापूर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई