शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेडचा विळखा होणार शिथिल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 07:00 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सीआरझेड-२ क्षेत्रामुळे बाधित झालेल्या बांधकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे सीआरझेडच्या कचाट्यात सापडलेल्या शहरातील शेकडो बांधकामांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई  - राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सीआरझेड-२ क्षेत्रामुळे बाधित झालेल्या बांधकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे सीआरझेडच्या कचाट्यात सापडलेल्या शहरातील शेकडो बांधकामांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पामबीच मार्गासह शहराच्या विविध क्षेत्रात सुमारे ११९ इमारती, तसेच गाव-गावठाणातील शेकडो बांधकामांना त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.सिडकोने पामबीच मार्गावर निविदा काढून विकासकांना भूखंड दिले. या भूखंडांच्या विकासासाठी महापालिकेने नियमानुसार बांधकाम परवानगीही दिली. सध्या या इमारती बांधून पूर्ण झाल्या असून, त्यांचा रहिवासी निवासी वापर सुरू आहे. असे असले तरी २०११मध्ये सीआरझेड कायद्यात सुधारणा करून सागरी किनाºयाची मर्यादा वाढविल्याने या इमारती सीआरझेडच्या कात्रीत अडकल्या. त्यामुळे महापालिकेने या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दर्शविला. शहरात अशा प्रकारच्या ११९ इमारती आहेत. त्याशिवाय येथील मूळ २८ गावे सीआरझेड क्षेत्रात मोडतात. तसेच सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप केलेल्या भूखंडांना सीआरझेडचा विळखा पडला आहे. परिणामी, या इमारती अनधिकृत घोषित करण्यात आल्या आहेत. सिडको आणि महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या अनेक विकास प्रकल्पांना सीआरझेड कायद्याचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतून सीआरझेड कायदा शिथिल करावा, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्य सरकारकडे लावून धरली होती. यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अंशत: यश येताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.पर्यावरण अधिनियम १८५६ नुसार सिडकोने १९ फेब्रुवारी १९९१ रोजी जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये नवी मुंबई क्षेत्रातील समुद्राची उच्चतम भरतीरेषा अर्थात हाय टाइड लाइन (एचटीएल) जाहीर केली होती. त्यानंतर पामबीच मार्गाची निर्मिती करण्यात आली. या पामबीच मार्गाची पश्चिमेकडील बाजू खारफुटी व सीआरझेड क्षेत्रात मोडत असल्याने तेथे कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नाहीत. तर या मार्गाच्या अलीकडील बाजूस मात्र सिडकोने निविदा काढून भूखंडांची विक्री करून करोडो रुपये कमविले. त्या भूखंडावर बांधकाम परवानगी देऊन नवी मुंबई महापालिकेने विकास शुल्कापोटी कोट्यवधी रुपये वसूल केले, असे असताना अचानक सदर भूखंड सीआरझेड क्षेत्र-२मध्ये मोडत असल्याचे कारण सांगत, ११९ इमारतींना नोटिसा बजावून महापालिकेने विकासकांच्या मानगुटीवर एमसीझेडएमएचे भूत बसवून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. याबाबतची खरी परिस्थिती वारंवार राज्याच्या पर्यावरण विभागाच्या निदर्शनास आणूनदेखील पर्यावरण विभागाने अद्याप सीआरझेड क्लिअरन्स दिलेला नाही; परंतु राज्य सरकारनेच यासंदर्भात सकारात्मक पावले उचलल्याने दीर्घकाळ रखडलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महापालिका क्षेत्रातील सर्व गाव-गावठाणे खाडीकिनाºयावर आहेत. त्यामुळे या सर्व गावांचा समावेश सीआरझेडमध्ये येत असल्याने त्याचा फटका प्रकल्पग्रस्तांच्या विकास प्रक्रियेला बसला आहे. ही गावे सीआरझेडमधून वगळावीत, यासाठी मागील तीन वर्षांपासून आपला पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याने हा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- मंदा म्हात्रे,आमदार, बेलापूर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई