शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:08 IST

एपीएमसीमध्ये १२७३ वाहनांमधून आवक : १६,४४८ टन कृषिमाल विक्रीसाठी उपलब्ध

नवी मुंबई : व्यापाऱ्यांसह माथाडी कामगारांनी संप मागे घेताच, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत झाले आहेत. गुरुवारी १२७३ वाहनांमधून १६,४४८ टन कृषिमाल विक्रीसाठी आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यामुळे मुंबईसह नवी मुंबईकरांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.

राज्य शासनाने विधेयक मागे घेतल्यानंतर बुधवारी सायंकाळी कामगारांसह व्यापाऱ्यांनीही संप मागे घेतल्याची घोषणा केली. मध्यरात्रीपासून भाजी व फळ मार्केट सुरू करण्यात आले. पहाटेपर्यंत भाजी मार्केटमध्ये राज्याच्या विविध भागांमधून ५१३ ट्रक व टेम्पोमधून आवक झाली होती. रविवारी मार्केट बंद, सोमवारी कमी झालेली आवक व पुढील दोन दिवस असलेल्या बंदमुळे किरकोळ मार्केटही ओस पडली होती. एपीएमसीमध्ये पहाटेच किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दिवसभरात १८९० टन कांदा, ८८० टन बटाटा व ९६ टन लसूनही विक्रीसाठी आल्याची नोंद आहे.

बंदमुळे फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मार्केटमध्ये विक्री न झालेली फळे फेकून द्यावी लागली होती. मार्केट सुरू झाल्यानंतरही पहिल्या दिवशी फक्त १४५ टन मालच विक्रीसाठी आला होता. धान्य व मसाला मार्केटमधील व्यवहारही सुरळीत सुरू झाले असून, शुक्रवारी व शनिवारी आवक वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई