शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

आधी पुनर्वसन मगच चौथ्या बंदरांचा विस्तार : संतप्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 22:16 IST

सहा तास जहाज मालवाहतूक ठप्प: कोटींवधींचे नुकसान

मधुकर ठाकूर

उरण : वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे आधी पुनर्वसन करा त्यानंतर चौथ्या बंदरांचा विस्तार करा या मागणीसाठी शुक्रवारी (१) संध्याकाळी संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल रोखुन बंदराची जहाज मालवाहतूक बंद पाडली.ग्रामस्थांनी समुद्रात छोट्या मच्छीमार बोटी आडव्या टाकून अचानक समुद्र चॅनल बंद पाडल्याने जागतिक स्तरावरील जेएनपीए बंदरातील मालवाहू मागील सहा तास बंद पडल्याने खळबळ उडाली आहे.

जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी हनुमान कोळीवाडा गावाची जमीन संपादन करून त्याचे उरण येथील बोरी येथे पुनर्वसन केले आहे.१७ ऐवजी फक्त २ हेक्टर क्षेत्रातच २५६ कुटुंबाचे ३८ वर्षांपूर्वी पुनर्वसन करण्यात आले आहे.मात्र हनुमान कोळीवाडा गावातील २५६ घरांनाच नव्हे तर संपूर्ण गावाला वाळवीने पोखरले आहे.त्यामुळे १७ हेक्टर क्षेत्रावरच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मागील ३८ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.या ३८ वर्षात ५०० हून अधिक बैठका झाल्या मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्याने ग्रामस्थांचा जेएनपीए विरोधात संघर्षच सुरुच आहे. दरम्यान जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पुनर्वसनासाठी विकासित १०.५० हेक्टर जमीन जेएनपीए कामगार वसाहती नजीक देण्याचे मान्य केले आहे.त्याची कार्यवाही सुरू असुन केंद्र सरकारकडे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित आहे.मात्र केंद्र सरकारने या बाबतीत ठोस निर्णय घेतला नसल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. शुक्रवारी (१) जेएनपीए कामगार वसाहतीत चौथ्या बंदरांच्या विस्तारित जेट्टीबाबत जनसुनावणी घेण्यात आली.मात्र पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत जनसुनावणी घेण्यात येऊ नये अशी भूमिका हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली.मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी २० मच्छीमार बोटींच्या सहाय्याने जेएनपीए बंदराचे समुद्र चॅनल रोखुन ठेवले.

या आंदोलनात सुमारे ५०ते ६० ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.समुद्र चॅनलच बंद केल्याने जागतिक स्तरावरील जेएनपीए बंदरातुन कंटेनर मालाची जहाज मालवाहतूक मागील सहा तासांपासून ठप्प झाली आहे.हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन करा त्यानंतर चौथ्या बंदरांचा विस्तार करा अशी ताठर भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.लेखी आश्वासनाखेरीज आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी लोकमतला सांगितले.

आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली.मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली.यामुळे मात्र जेएनपीए अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

टॅग्स :uran-acउरण