शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नवी मुंबईत बोगस मतदारांची नोंदणी; शिवसेनेची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 00:29 IST

बेलापूरमधील याद्यांमध्येही घोळ कायम

नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांमधील घोळ समोर आला आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये जवळपास १२ हजार बोगस नावे नोंदविण्यात आली असून बेलापूरमधील याद्यांमधून अनेक नावे गायब झाली आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप होऊ लागला आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये जवळपास १२ हजार बोगस नावे घुसविण्यात आली आहेत. ज्या चाळींमध्ये १०० ते २०० नागरिकही वास्तव्य करत नाहीत, त्या ठिकाणी ७०० ते ८०० मतदारांची नोंद आहे. यामध्ये शहराबाहेरील नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. बोगस नावे वगळण्याची मागणी केली आहे.

बेलापूर मतदारसंघामध्ये नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान नागरिकांनी मतदार नोंदणी केली होती. या मतदारांची नावे यादीमध्ये आलेली नाहीत. याशिवाय अनेक मतदार राहत असलेल्या वार्डमध्ये त्यांची नावे नसून इतर वॉर्डमध्ये गेली आहेत. मतदार याद्यांमधील या घोळाविषयी नागरिक व लोकप्रतिनिधींमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर कराव्या. बोगस नावे वगळण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत असून निवडणूक विभाग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ऐरोली मतदारसंघामध्ये १० ते १२ हजार बोगस नावांची नोंदणी झाली आहे. आम्ही याविषयी निवडणूक विभागाकडे तक्रार केली असून बोगस नावे वगळण्याची मागणी केली आहे. - विजय नाहटा, उपनेते, शिवसेना

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाShiv Senaशिवसेना