शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

नवी मुंबईत बोगस मतदारांची नोंदणी; शिवसेनेची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 00:29 IST

बेलापूरमधील याद्यांमध्येही घोळ कायम

नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांमधील घोळ समोर आला आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये जवळपास १२ हजार बोगस नावे नोंदविण्यात आली असून बेलापूरमधील याद्यांमधून अनेक नावे गायब झाली आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप होऊ लागला आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये जवळपास १२ हजार बोगस नावे घुसविण्यात आली आहेत. ज्या चाळींमध्ये १०० ते २०० नागरिकही वास्तव्य करत नाहीत, त्या ठिकाणी ७०० ते ८०० मतदारांची नोंद आहे. यामध्ये शहराबाहेरील नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. बोगस नावे वगळण्याची मागणी केली आहे.

बेलापूर मतदारसंघामध्ये नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान नागरिकांनी मतदार नोंदणी केली होती. या मतदारांची नावे यादीमध्ये आलेली नाहीत. याशिवाय अनेक मतदार राहत असलेल्या वार्डमध्ये त्यांची नावे नसून इतर वॉर्डमध्ये गेली आहेत. मतदार याद्यांमधील या घोळाविषयी नागरिक व लोकप्रतिनिधींमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर कराव्या. बोगस नावे वगळण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत असून निवडणूक विभाग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ऐरोली मतदारसंघामध्ये १० ते १२ हजार बोगस नावांची नोंदणी झाली आहे. आम्ही याविषयी निवडणूक विभागाकडे तक्रार केली असून बोगस नावे वगळण्याची मागणी केली आहे. - विजय नाहटा, उपनेते, शिवसेना

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाShiv Senaशिवसेना