शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महावितरणच्या दरवाढीने शीतगृह उद्योग संकटात दरवाढ मागे घेण्याची मागणी : पुण्यात घेतली बैठक

By नारायण जाधव | Updated: May 5, 2023 18:04 IST

राज्यभरातील शीतगृहांच्या वीजबिलांत महावितरण कंपनीने एक एप्रिलपासून 40 टक्क्यांपर्यंत दरवाढ केली.

नवी मुंबई :राज्यभरातील शीतगृहांच्या वीजबिलांत महावितरण कंपनीने एक एप्रिलपासून 40 टक्क्यांपर्यंत दरवाढ केली असून, पुढील वर्षी एक एप्रिलपासून 50 टक्क्यांपर्यंत दरवाढ प्रस्तावित केली आहे. यामुळे शीतगृहांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. 

राज्यातील अन्न साठवणूक व अन्न प्रक्रिया उद्योगावरही याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी महा कोल्ड स्टोरेज असोसिएशनने केली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शीतगृह मालकांच्या मागणीची दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती महा कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे अध्यक्ष राजकिशोर केंडे व नवी मुंबई कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे अध्यक्ष लालजी सावला यांनी केली आहे.

अन्न साठवणूक आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी शीतगृह हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल, भाजीपाला, फळे, सुकामेवा, कडधान्ये, बियाणे, दूध व दुग्धजन्य पदार्थ आदींची गुणवत्ता राखून या सर्व घटकांची साठवणूक राज्यभरातील शीतगृहांतून केली जाते. एकट्या पुणे जिल्ह्यात तीसहून अधिक, तर राज्यभरात अडीचशेहून अधिक शीतगृहे आजमितीस आपली सेवा शेतकरी व संबंधित घटकांना देत आहेत. 

कोरोनाच्या काळातही राज्यभरातील शीतगृहांनी चोवीस तास, विना सवलत अखंडित सेवा दिली आहे. राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना लाभदायक ठरणाऱ्या या शीतगृहांपुढे एप्रिलपासून वीजदरवाढीचे संकट उभे ठाकले आहे.

महावितरणच्या मल्टी इयर टेरिफ ऑर्डरनुसार शीतगृहांसाठीच्या वीजदरात दरवर्षी वाढ केली जाते. मात्र, मध्यंतरी महावितरणने वीज दरवाढीबाबत राज्य वीज आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. यावर महा कोल्ड स्टोरेज असोसिएशनने 23 फेब्रुवारी 2023 रोजी आयोगापुढे आपली भूमिका मांडली होती. मल्टी इय़र टेरिफ ऑर्डरनुसार 2023-24  आणि 2024- 25 मध्ये शीतगृहांसाठीच्या वीजदरात वाढ केली जावी, अशी संघटनेची भूमिका आहे. महावितरणने प्रस्तावित केलेल्या दरवाढीपेक्षा अधिक दरवाढ वीज नियामक आयोगाने केली आहे.

अत्यावश्यक सेवा या सदरात शीतगृहे मोडतात. वातानुकुल यंत्रणेवर चालणाऱ्या शीतगृहांच्या एकूण खर्चापैकी निम्म्याहून अधिक खर्च विजेवरच होतो, ही बाब लक्षात घेता महावितरणने केलेली दरवाढ शीतगृहांच्या अर्थकारणावर मोठाच परिणाम करणारी आहे. राज्यभरातील लाखो शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या उद्योगांनाही याचा फटका बसणार आहे. तसेच, राज्यभरातील नागरिकांनाही याचा अप्रत्यक्ष फटका बसणार आहे. त्यामुळेच ही दरवाढ मागे घेतली जावी, अशी मागणी राजकिशोर केंडे व लालजी सावला यांनी केली आहे. 

फेरविचार अर्ज सादर

या दरवाढीविरोधात संघटनेने वीज नियामक आयोगाकडे धाव घेतली असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारा अर्ज आयोगाकडे सादर केला आहे. अन्न सुरक्षेतील महत्त्वाचा घटक असलेल्या शीतगृहांसाठीच्या वीजदरात केली गेलेली वाढ शेतकरी, शेतीपूरक उद्योग आणि शेवटी ग्राहकांवरच परिणाम करणारी ठरणार आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी. तसेच, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची दखल घेऊन वीज दरवाढीचा प्रश्न मार्गी लावावा व शीतगृह उद्योगाला दिलासा द्यावा, असे मागणी श्केंडे व सावला यांनी म्हटले आहे.