शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या दरवाढीने शीतगृह उद्योग संकटात दरवाढ मागे घेण्याची मागणी : पुण्यात घेतली बैठक

By नारायण जाधव | Updated: May 5, 2023 18:04 IST

राज्यभरातील शीतगृहांच्या वीजबिलांत महावितरण कंपनीने एक एप्रिलपासून 40 टक्क्यांपर्यंत दरवाढ केली.

नवी मुंबई :राज्यभरातील शीतगृहांच्या वीजबिलांत महावितरण कंपनीने एक एप्रिलपासून 40 टक्क्यांपर्यंत दरवाढ केली असून, पुढील वर्षी एक एप्रिलपासून 50 टक्क्यांपर्यंत दरवाढ प्रस्तावित केली आहे. यामुळे शीतगृहांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. 

राज्यातील अन्न साठवणूक व अन्न प्रक्रिया उद्योगावरही याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी महा कोल्ड स्टोरेज असोसिएशनने केली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शीतगृह मालकांच्या मागणीची दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती महा कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे अध्यक्ष राजकिशोर केंडे व नवी मुंबई कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे अध्यक्ष लालजी सावला यांनी केली आहे.

अन्न साठवणूक आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी शीतगृह हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल, भाजीपाला, फळे, सुकामेवा, कडधान्ये, बियाणे, दूध व दुग्धजन्य पदार्थ आदींची गुणवत्ता राखून या सर्व घटकांची साठवणूक राज्यभरातील शीतगृहांतून केली जाते. एकट्या पुणे जिल्ह्यात तीसहून अधिक, तर राज्यभरात अडीचशेहून अधिक शीतगृहे आजमितीस आपली सेवा शेतकरी व संबंधित घटकांना देत आहेत. 

कोरोनाच्या काळातही राज्यभरातील शीतगृहांनी चोवीस तास, विना सवलत अखंडित सेवा दिली आहे. राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना लाभदायक ठरणाऱ्या या शीतगृहांपुढे एप्रिलपासून वीजदरवाढीचे संकट उभे ठाकले आहे.

महावितरणच्या मल्टी इयर टेरिफ ऑर्डरनुसार शीतगृहांसाठीच्या वीजदरात दरवर्षी वाढ केली जाते. मात्र, मध्यंतरी महावितरणने वीज दरवाढीबाबत राज्य वीज आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. यावर महा कोल्ड स्टोरेज असोसिएशनने 23 फेब्रुवारी 2023 रोजी आयोगापुढे आपली भूमिका मांडली होती. मल्टी इय़र टेरिफ ऑर्डरनुसार 2023-24  आणि 2024- 25 मध्ये शीतगृहांसाठीच्या वीजदरात वाढ केली जावी, अशी संघटनेची भूमिका आहे. महावितरणने प्रस्तावित केलेल्या दरवाढीपेक्षा अधिक दरवाढ वीज नियामक आयोगाने केली आहे.

अत्यावश्यक सेवा या सदरात शीतगृहे मोडतात. वातानुकुल यंत्रणेवर चालणाऱ्या शीतगृहांच्या एकूण खर्चापैकी निम्म्याहून अधिक खर्च विजेवरच होतो, ही बाब लक्षात घेता महावितरणने केलेली दरवाढ शीतगृहांच्या अर्थकारणावर मोठाच परिणाम करणारी आहे. राज्यभरातील लाखो शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या उद्योगांनाही याचा फटका बसणार आहे. तसेच, राज्यभरातील नागरिकांनाही याचा अप्रत्यक्ष फटका बसणार आहे. त्यामुळेच ही दरवाढ मागे घेतली जावी, अशी मागणी राजकिशोर केंडे व लालजी सावला यांनी केली आहे. 

फेरविचार अर्ज सादर

या दरवाढीविरोधात संघटनेने वीज नियामक आयोगाकडे धाव घेतली असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारा अर्ज आयोगाकडे सादर केला आहे. अन्न सुरक्षेतील महत्त्वाचा घटक असलेल्या शीतगृहांसाठीच्या वीजदरात केली गेलेली वाढ शेतकरी, शेतीपूरक उद्योग आणि शेवटी ग्राहकांवरच परिणाम करणारी ठरणार आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी. तसेच, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची दखल घेऊन वीज दरवाढीचा प्रश्न मार्गी लावावा व शीतगृह उद्योगाला दिलासा द्यावा, असे मागणी श्केंडे व सावला यांनी म्हटले आहे.