शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पालिकेकडून २०५० कोटींची विक्रमी वसुली

By admin | Updated: May 4, 2017 06:21 IST

रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच २०५० कोटी ९२ लाख रुपये उत्पन्नाचा

नवी मुंबई : रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच २०५० कोटी ९२ लाख रुपये उत्पन्नाचा टप्पा पूर्ण केला आहे. एलबीटी विभागाने जानेवारी ते मार्च महिन्याच्या अनुदानासह तब्बल १०२२ कोटी रुपये वसूल केले आहेत. ६४५ कोटी २७ लाख रुपये मालमत्ता कर वसूल झाला असून, पालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा २ हजार कोटींचा टप्पा पार करण्यास पालिकेला यश आले आहे. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई देशातील पहिली महानगरपालिका. १९९५-९६मध्ये ७९ कोटी ३४ लाख रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला; परंतु प्रत्यक्षामध्ये फक्त १८ कोटी ५८ लाख रुपये वसूल करण्यात यश आले. एवढे कमी उत्पन्न असलेली नवी मुंबई तेव्हा देशातील एकमेव महापालिका ठरली होती. पुढील दोन वर्षांमध्येही अनुक्रमे ३७ कोटी व ५५ कोटी एवढे उत्पन्न प्राप्त झाले. १९९८मध्ये पहिल्यांदा १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळविण्यात यश आले. यापूर्वी सेस व आता एलबीटी आणि मालमत्ता कराच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यावर विशेष लक्ष केंद्रित कण्यात आले. उत्पन्न वाढविण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत एमआयडीसी हाच राहिला; परंतु उद्योजकांनी कर भरण्यास नकार देऊन न्यायालयात धाव घेतली होती. महापालिका व उद्योजकांमध्ये अनेक वर्षे करवसुलीवरून संघर्ष सुरू होता. यामधून मार्ग काढत २०१०-११ या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक एक हजार कोटी रुपयांचा टप्पा पार करण्यात आला. २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल २०५० कोटी रुपये उत्पन्न करण्यात यश मिळविले आहे. महापालिकेने मागील आर्थिक वर्षात एलबीटी व मालमत्ता कर विभागाचा कारभार उमेश वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला. उत्पन्नाच्या दोन्ही प्रमुख विभागांचा कारभार एकाच अधिकाऱ्याकडे असल्याने उत्पन्न वाढविण्यामध्ये यश आले आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये ८७० कोटी रुपयांची वसुली झाली होती. २०१६-१७ या वर्षामध्ये त्यामध्ये वाढ करून ८८३ कोटी रुपये प्रत्यक्षात वसूल करण्यात आले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यांचे १३८ कोटी ९० लाख रुपये अनुदान ३१ मार्चला महापालिकेकडे वर्ग केले आहे. ३ एप्रिलला ते प्रत्यक्षात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. अनुदानाची रक्कम गृहित धरल्यास एलबीटीच्या माध्यमातून तब्बल १०२२ कोटी ४१ लाख रुपये वसूल करण्यात यश मिळाले आहे. शासनाने एलबीटी रद्द केल्यानंतरही नवी मुंबई महापालिकेने विक्रमी वसुली करण्यात यश मिळविले आहे. मालमत्ता कराचे उत्पन्नही ५९० कोटींवरून ६४५ कोटी रुपये झाले आहे. मूळ कराबरोबर मागील थकबाकी वसूल करण्यातही पालिकेला यश आले आहे. नोटाबंदीमुळे ५२ कोटींची वसुलीकेंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर ५०० व १ हजार रूपयांच्या नोटा देऊन मालमत्ता कर भरण्यास मुभा देण्यात आली होती. या योजनेचा चांगला फायदा झाला. ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ५३ दिवसांमध्ये तब्बल ५२ कोटी रूपये महसूल जमा झाला. यामुळे एकूण महसूल वाढविण्यात यश आले. एलबीटी विभागाचे यश २०१५-२०१६ या आर्थिक वर्षामध्ये एलबीटी विभागाकडून ८७० कोटी रूपये महसूल जमा झाला होता. २०१६-२०१७ या वर्षामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यांतील शासन अनुदान गृहित धरून तब्बल १०२२ कोटी ४१ लाख (अनुदान वगळून ८८३ कोटी) रूपयांचा महसूल संकलित झाला आहे. महसूल संकलनासाठी वर्षभरामध्ये तब्बल ११०० थकबाकीदारांची खाती गोठविण्यात आली आहेत. उपकराची जुनी ७० कोटी रूपयांची वसुली करण्यात आली आहे. जुने व्यापारी शोधून १६८०० कर निर्धारणा करण्यात आल्या आहेत.