शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून २०५० कोटींची विक्रमी वसुली

By admin | Updated: May 4, 2017 06:21 IST

रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच २०५० कोटी ९२ लाख रुपये उत्पन्नाचा

नवी मुंबई : रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच २०५० कोटी ९२ लाख रुपये उत्पन्नाचा टप्पा पूर्ण केला आहे. एलबीटी विभागाने जानेवारी ते मार्च महिन्याच्या अनुदानासह तब्बल १०२२ कोटी रुपये वसूल केले आहेत. ६४५ कोटी २७ लाख रुपये मालमत्ता कर वसूल झाला असून, पालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा २ हजार कोटींचा टप्पा पार करण्यास पालिकेला यश आले आहे. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई देशातील पहिली महानगरपालिका. १९९५-९६मध्ये ७९ कोटी ३४ लाख रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला; परंतु प्रत्यक्षामध्ये फक्त १८ कोटी ५८ लाख रुपये वसूल करण्यात यश आले. एवढे कमी उत्पन्न असलेली नवी मुंबई तेव्हा देशातील एकमेव महापालिका ठरली होती. पुढील दोन वर्षांमध्येही अनुक्रमे ३७ कोटी व ५५ कोटी एवढे उत्पन्न प्राप्त झाले. १९९८मध्ये पहिल्यांदा १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळविण्यात यश आले. यापूर्वी सेस व आता एलबीटी आणि मालमत्ता कराच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यावर विशेष लक्ष केंद्रित कण्यात आले. उत्पन्न वाढविण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत एमआयडीसी हाच राहिला; परंतु उद्योजकांनी कर भरण्यास नकार देऊन न्यायालयात धाव घेतली होती. महापालिका व उद्योजकांमध्ये अनेक वर्षे करवसुलीवरून संघर्ष सुरू होता. यामधून मार्ग काढत २०१०-११ या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक एक हजार कोटी रुपयांचा टप्पा पार करण्यात आला. २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल २०५० कोटी रुपये उत्पन्न करण्यात यश मिळविले आहे. महापालिकेने मागील आर्थिक वर्षात एलबीटी व मालमत्ता कर विभागाचा कारभार उमेश वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला. उत्पन्नाच्या दोन्ही प्रमुख विभागांचा कारभार एकाच अधिकाऱ्याकडे असल्याने उत्पन्न वाढविण्यामध्ये यश आले आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये ८७० कोटी रुपयांची वसुली झाली होती. २०१६-१७ या वर्षामध्ये त्यामध्ये वाढ करून ८८३ कोटी रुपये प्रत्यक्षात वसूल करण्यात आले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यांचे १३८ कोटी ९० लाख रुपये अनुदान ३१ मार्चला महापालिकेकडे वर्ग केले आहे. ३ एप्रिलला ते प्रत्यक्षात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. अनुदानाची रक्कम गृहित धरल्यास एलबीटीच्या माध्यमातून तब्बल १०२२ कोटी ४१ लाख रुपये वसूल करण्यात यश मिळाले आहे. शासनाने एलबीटी रद्द केल्यानंतरही नवी मुंबई महापालिकेने विक्रमी वसुली करण्यात यश मिळविले आहे. मालमत्ता कराचे उत्पन्नही ५९० कोटींवरून ६४५ कोटी रुपये झाले आहे. मूळ कराबरोबर मागील थकबाकी वसूल करण्यातही पालिकेला यश आले आहे. नोटाबंदीमुळे ५२ कोटींची वसुलीकेंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर ५०० व १ हजार रूपयांच्या नोटा देऊन मालमत्ता कर भरण्यास मुभा देण्यात आली होती. या योजनेचा चांगला फायदा झाला. ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ५३ दिवसांमध्ये तब्बल ५२ कोटी रूपये महसूल जमा झाला. यामुळे एकूण महसूल वाढविण्यात यश आले. एलबीटी विभागाचे यश २०१५-२०१६ या आर्थिक वर्षामध्ये एलबीटी विभागाकडून ८७० कोटी रूपये महसूल जमा झाला होता. २०१६-२०१७ या वर्षामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यांतील शासन अनुदान गृहित धरून तब्बल १०२२ कोटी ४१ लाख (अनुदान वगळून ८८३ कोटी) रूपयांचा महसूल संकलित झाला आहे. महसूल संकलनासाठी वर्षभरामध्ये तब्बल ११०० थकबाकीदारांची खाती गोठविण्यात आली आहेत. उपकराची जुनी ७० कोटी रूपयांची वसुली करण्यात आली आहे. जुने व्यापारी शोधून १६८०० कर निर्धारणा करण्यात आल्या आहेत.