शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तींशी लढण्यासाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: July 5, 2015 03:52 IST

पावसाळ्यामध्ये आपत्तींशी सामना करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. शहरात ११ ठिकाणी पुराचे पाणी शिरण्याची भीती आहे. ८ झोपडपट्ट्यांमध्ये भूस्खलन

नामदेव मोरे, नवी मुंबईपावसाळ्यामध्ये आपत्तींशी सामना करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. शहरात ११ ठिकाणी पुराचे पाणी शिरण्याची भीती आहे. ८ झोपडपट्ट्यांमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असून संबंधितांना खबरदारीची सूचना देण्यात आली आहे. धोकादायक ठिकाणच्या बेघरांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले असून आपत्तीशी लढण्यासाठी नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये २६ जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर नवी मुंबईतील जनजीवन सर्वात प्रथम पूर्वपदावर आले होते. शहराच्या नैसर्गिक रचनेप्रमाणेच महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेमुळे हे शक्य झाले होते. तेव्हापासून महापालिकादर वर्षी पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करते. यावर्षीही आराखडा तयार केला आहे. शहरात ११ ठिकाणी पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. सानपाडा व इतर ठिकाणी पाणी साचणाऱ्या ठिकाणी बेघर नागरिक तंबू टाकून राहत होते. त्यांना तेथून हलविण्यात आले असून उंचावर जागा पाहून राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. २६ जुलैच्या अतिवृष्टीमध्ये व गतवर्षी दरड कोसळून अपघात झाल्याने काही जणांचा मृत्यू झाला होता. पालिका प्रशासनाने मे महिन्यामध्येच दगडखाणीमधील रहिवाशांना संभाव्य धोक्याची सूचना दिली आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे, तेथील नागरिकांना इतरत्र स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील ४९ झोपडपट्ट्यांमध्येही घरे कोसळणे व इतर अपघात होण्याची भीती आहे. विभाग कार्यालयांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. ठाणे-बेलापूर रोड, पामबीच रोड, सायन - पनवेल महामार्ग, एमआयडीसी, उरण जंक्शन व महामार्गावर सीबीडीमध्ये अपघातजन्य ठिकाण घोषित करण्यात आले आहे. मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय व सर्व प्रमुख कार्यालये हॉटलाईनने जोडण्यात आली आहेत. बेलापूर, नेरूळ, वाशी व ऐरोली अग्निशमन केंद्रांमध्ये व सर्व विभाग कार्यालयांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत. सर्व नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहेत. पालिकेने दोन शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार केले आहेत. आपत्कालीन काळात संपर्क साधण्याची यंत्रणाटोल फ्री नंबर १८००२२२३०९ / १८००२२२३१०, तत्काळ कृती केंद्र - २७५६७०६० / ६१/ ६२, बेलापूर अग्निशमन केंद्र - २७५७२१११, नेरूळ अग्निशमन केंद्र - २७७०७१०१, वाशी अग्निशमन केंद्र - २७६६०१०१, ऐरोली अग्निशमन केंद्र - २७७९६६००, नियंत्रण कक्ष परिमंडळ १ - २७८९४८०० / २७८९५९००, नियंत्रण कक्ष परिमंडळ २ - २७७९२४०० / २७७९५२००भूस्खलन होण्याची शक्यता असलेली ठिकाणेप्रभाग - ठिकाणबेलापूर - दुर्गामाता झोपडपट्टी नेरूळ - महात्मा गांधी झोपडपट्टी, रमेश मेटल क्वॉरीतुर्भे - इंदिरानगर झोपडपट्टीघणसोली - रबाडे भीमनगर, अश्विन क्वॉरी, आंबेडकर नगर झोपडपट्टीदिघा - इलठाणपाडा झोपडपट्टीपावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्यांना इतर ठिकाणी हलविले आहे. भूस्खलन होण्याची शक्यता असणाऱ्यांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे. आपत्कालीन नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी सर्व साधनसामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. - जगन्नाथ सिन्नरकर, उपआयुक्त, आपत्ती व्यवस्थापन आपत्कालीन यंत्रणेवर आयुक्तांचे लक्ष महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. शहरातील पोलीस, सिडको, एमआयडीसी, उद्योजक संघटना, एनजीओ सर्वांच्या बैठका घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. दुर्घटना होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. आपत्ती घडलीच तर तत्काळ मदत उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या असून सर्व गोष्टींवर स्वत: आयुक्त लक्ष देत असल्याने कर्मचारीही दक्ष आहेत.