शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

निवडणूक यंत्रणा सज्ज, कर्मचाऱ्यांच्या वाहनांना जीपीएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:51 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्यानंतर निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचालींना गती मिळाली आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्यानंतर निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचालींना गती मिळाली आहे. त्यानुसार रविवारी सकाळी सर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व मतपेट्या पोहोचणार आहेत, यानुसार त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर शनिवारी संध्याकाळी थंडावल्या. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी ऐरोली विधानसभा क्षेत्रात ७१ केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यामधील ४५२ बूथवर मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्येक बूथवर एक हजार ते १२०० मतदारांचे नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, अनेक बूथवरील मतदारांचा आकडा दीड हजारांच्या वर जात आहे. त्यामुळे मूळ ४३३ बूथमध्ये अधिक १९ बूथची भर पडलेली आहे. त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ऐरोली विधानसभा क्षेत्रातील या कर्मचाऱ्यांना ऐरोलीतील सरस्वती विद्यालयाच्या आवारातून निश्चित मतदान केंद्राकडे पोलीस सुरक्षेत मतपेट्यांसह रविवारी सकाळी रवाना केले जाणार आहे.

त्यानुसार शनिवारी रात्रीपासूनच सर्व मतदान केंद्रांच्या इमारतीभोवती पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान कर्मचाºयांवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाऊ नये, या उद्देशाने त्यांच्या वाहनांमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहेत. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकाºयाच्या वापरासाठी असलेल्या कारसह कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या बसचाही समावेश आहे.

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी दुपारी ऐरोली विधानसभा क्षेत्रातील या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. या दरम्यान निवडणूक अधिकारी नीलिमा सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर टेबल-खुर्चींसह इतर आवश्यक साहित्य पुरवण्यात आले असून, काही ठिकाणी मतदारांना सावलीसाठी मंडप उभारण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. महिन्याभरात अनेक कोम्बिंग ऑपरेशनद्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सराईत गुन्हेगारांना तडीपार करणे, अवैध शस्त्र जप्ती अशा कारवाया केल्या आहेत. मतदानाच्या दिवशीही शहरात चोख बंदोबस्त राहणार आहे.

मतदान केंद्राच्या आवारात १०० मीटरवर प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्या ठिकाणी केवळ निवडणूक अधिकारी व कर्मचारी, मतदार, उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी गस्ती पथकेही सक्रिय राहणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग