शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शकक्तिशाली सॅटेलाईट
3
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
4
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
5
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
6
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
7
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
8
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
9
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
10
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
11
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
12
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
14
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
15
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
16
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
17
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
18
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
19
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
20
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

निवडणूक यंत्रणा सज्ज, कर्मचाऱ्यांच्या वाहनांना जीपीएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:51 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्यानंतर निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचालींना गती मिळाली आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्यानंतर निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचालींना गती मिळाली आहे. त्यानुसार रविवारी सकाळी सर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व मतपेट्या पोहोचणार आहेत, यानुसार त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर शनिवारी संध्याकाळी थंडावल्या. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी ऐरोली विधानसभा क्षेत्रात ७१ केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यामधील ४५२ बूथवर मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्येक बूथवर एक हजार ते १२०० मतदारांचे नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, अनेक बूथवरील मतदारांचा आकडा दीड हजारांच्या वर जात आहे. त्यामुळे मूळ ४३३ बूथमध्ये अधिक १९ बूथची भर पडलेली आहे. त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ऐरोली विधानसभा क्षेत्रातील या कर्मचाऱ्यांना ऐरोलीतील सरस्वती विद्यालयाच्या आवारातून निश्चित मतदान केंद्राकडे पोलीस सुरक्षेत मतपेट्यांसह रविवारी सकाळी रवाना केले जाणार आहे.

त्यानुसार शनिवारी रात्रीपासूनच सर्व मतदान केंद्रांच्या इमारतीभोवती पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान कर्मचाºयांवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाऊ नये, या उद्देशाने त्यांच्या वाहनांमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहेत. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकाºयाच्या वापरासाठी असलेल्या कारसह कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या बसचाही समावेश आहे.

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी दुपारी ऐरोली विधानसभा क्षेत्रातील या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. या दरम्यान निवडणूक अधिकारी नीलिमा सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर टेबल-खुर्चींसह इतर आवश्यक साहित्य पुरवण्यात आले असून, काही ठिकाणी मतदारांना सावलीसाठी मंडप उभारण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. महिन्याभरात अनेक कोम्बिंग ऑपरेशनद्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सराईत गुन्हेगारांना तडीपार करणे, अवैध शस्त्र जप्ती अशा कारवाया केल्या आहेत. मतदानाच्या दिवशीही शहरात चोख बंदोबस्त राहणार आहे.

मतदान केंद्राच्या आवारात १०० मीटरवर प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्या ठिकाणी केवळ निवडणूक अधिकारी व कर्मचारी, मतदार, उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी गस्ती पथकेही सक्रिय राहणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग