शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

निवडणूक यंत्रणा सज्ज, कर्मचाऱ्यांच्या वाहनांना जीपीएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:51 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्यानंतर निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचालींना गती मिळाली आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्यानंतर निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचालींना गती मिळाली आहे. त्यानुसार रविवारी सकाळी सर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व मतपेट्या पोहोचणार आहेत, यानुसार त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर शनिवारी संध्याकाळी थंडावल्या. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी ऐरोली विधानसभा क्षेत्रात ७१ केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यामधील ४५२ बूथवर मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्येक बूथवर एक हजार ते १२०० मतदारांचे नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, अनेक बूथवरील मतदारांचा आकडा दीड हजारांच्या वर जात आहे. त्यामुळे मूळ ४३३ बूथमध्ये अधिक १९ बूथची भर पडलेली आहे. त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ऐरोली विधानसभा क्षेत्रातील या कर्मचाऱ्यांना ऐरोलीतील सरस्वती विद्यालयाच्या आवारातून निश्चित मतदान केंद्राकडे पोलीस सुरक्षेत मतपेट्यांसह रविवारी सकाळी रवाना केले जाणार आहे.

त्यानुसार शनिवारी रात्रीपासूनच सर्व मतदान केंद्रांच्या इमारतीभोवती पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान कर्मचाºयांवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाऊ नये, या उद्देशाने त्यांच्या वाहनांमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहेत. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकाºयाच्या वापरासाठी असलेल्या कारसह कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या बसचाही समावेश आहे.

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी दुपारी ऐरोली विधानसभा क्षेत्रातील या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. या दरम्यान निवडणूक अधिकारी नीलिमा सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर टेबल-खुर्चींसह इतर आवश्यक साहित्य पुरवण्यात आले असून, काही ठिकाणी मतदारांना सावलीसाठी मंडप उभारण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. महिन्याभरात अनेक कोम्बिंग ऑपरेशनद्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सराईत गुन्हेगारांना तडीपार करणे, अवैध शस्त्र जप्ती अशा कारवाया केल्या आहेत. मतदानाच्या दिवशीही शहरात चोख बंदोबस्त राहणार आहे.

मतदान केंद्राच्या आवारात १०० मीटरवर प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्या ठिकाणी केवळ निवडणूक अधिकारी व कर्मचारी, मतदार, उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी गस्ती पथकेही सक्रिय राहणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग