शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

मुंबई-ठाण्याहून खारघर गाठा 30 मिनिटांत! तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करणार सिडको

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 06:43 IST

मुंबई-ठाण्याहून खारघर केवळ ३० मिनिटांत गाठता येणार आहे.

नवी मुंबई/पनवेल : महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे-बेलापूररोड, पामबीच आणि शीव-पनवेल या प्रमुख मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी करण्याच्या दृष्टीने सिडको महामंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुर्भे-खारघर दरम्यान लिंकरोड तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित केला आहे. यासाठी २,१९५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा  सिडकोने निर्धार केला आहे. यामुळे मुंबई-ठाण्याहून खारघर केवळ ३० मिनिटांत गाठता येणार आहे.

सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी नवी मुंबईतील दळणवळण यंत्रणेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण आणि आवश्यक पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. तुर्भे ते खारघर हा जवळपास सहा किलोमीटर लांबीचा चौपदरी मार्ग हा याच नियोजनाचा भाग आहे. याअंतर्गत  तुर्भे  येथून  खारघरमधील प्रस्तावित इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटीसाठी एलिव्हेटेड किंवा ग्रेड-लेव्हल पद्धतीने लिंकरोड तयार करण्याचा सिडकोचा मानस आहे.

५.४९ किमीचा मार्ग

नियोजित तुर्भे-खारघर लिंकरोड हा चौपदरी आणि ५.४९ किमी लांबीचा असेल, तर यात १.७६ किमी लांबीचा बोगदा असणार आहे. संबंधित विभागांच्या आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. साधारणपणे पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याची योजना असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

ताण कमी होणार

भूसंपादन  करून वनविभाग आणि पर्यावरण विभागाची  परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.  शीव-पनवेल या महामार्गावर  दिवसाला दोन लाखांपेक्षा जास्त वाहने धावतात. भरधाव वाहनांमुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. शिवाय वाहतूककोंडीही होत आहे. त्यामुळे हा मार्ग पूर्ण झाल्यास शीव-पनवेल महामार्गावरील ताण कमी होणार आहे.

विकास आराखडाही सादर

एमएसआरडीसीने या प्रकल्पाचा विकास आराखडाही तयार केला होता. मात्र स्ते महामंडळाला हा प्रकल्प व्यवहार्य वाटला नाही. त्यामुळे यातून माघार घेतली. परिणामी गेल्या पाच वर्षांपासून कागदावरच सीमित राहिलेला हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी राज्याने सिडकोवर टाकली आहे. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई