शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-ठाण्याहून खारघर गाठा 30 मिनिटांत! तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करणार सिडको

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 06:43 IST

मुंबई-ठाण्याहून खारघर केवळ ३० मिनिटांत गाठता येणार आहे.

नवी मुंबई/पनवेल : महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे-बेलापूररोड, पामबीच आणि शीव-पनवेल या प्रमुख मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी करण्याच्या दृष्टीने सिडको महामंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुर्भे-खारघर दरम्यान लिंकरोड तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित केला आहे. यासाठी २,१९५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा  सिडकोने निर्धार केला आहे. यामुळे मुंबई-ठाण्याहून खारघर केवळ ३० मिनिटांत गाठता येणार आहे.

सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी नवी मुंबईतील दळणवळण यंत्रणेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण आणि आवश्यक पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. तुर्भे ते खारघर हा जवळपास सहा किलोमीटर लांबीचा चौपदरी मार्ग हा याच नियोजनाचा भाग आहे. याअंतर्गत  तुर्भे  येथून  खारघरमधील प्रस्तावित इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटीसाठी एलिव्हेटेड किंवा ग्रेड-लेव्हल पद्धतीने लिंकरोड तयार करण्याचा सिडकोचा मानस आहे.

५.४९ किमीचा मार्ग

नियोजित तुर्भे-खारघर लिंकरोड हा चौपदरी आणि ५.४९ किमी लांबीचा असेल, तर यात १.७६ किमी लांबीचा बोगदा असणार आहे. संबंधित विभागांच्या आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. साधारणपणे पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याची योजना असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

ताण कमी होणार

भूसंपादन  करून वनविभाग आणि पर्यावरण विभागाची  परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.  शीव-पनवेल या महामार्गावर  दिवसाला दोन लाखांपेक्षा जास्त वाहने धावतात. भरधाव वाहनांमुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. शिवाय वाहतूककोंडीही होत आहे. त्यामुळे हा मार्ग पूर्ण झाल्यास शीव-पनवेल महामार्गावरील ताण कमी होणार आहे.

विकास आराखडाही सादर

एमएसआरडीसीने या प्रकल्पाचा विकास आराखडाही तयार केला होता. मात्र स्ते महामंडळाला हा प्रकल्प व्यवहार्य वाटला नाही. त्यामुळे यातून माघार घेतली. परिणामी गेल्या पाच वर्षांपासून कागदावरच सीमित राहिलेला हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी राज्याने सिडकोवर टाकली आहे. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई