शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधील रिक्षाचालकांना आरटीओची कारणे दाखवा नोटीस, २० दिवसांपासून रिक्षा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:22 IST

खारघर शहरात गेल्या २० दिवसांपासून तळोजा व खारघर येथील संघटनेच्या वादामुळे एकता रिक्षा संघटनेने आपल्या रिक्षा बंद ठेवल्या आहेत.

पनवेल : खारघर शहरात गेल्या २० दिवसांपासून तळोजा व खारघर येथील संघटनेच्या वादामुळे एकता रिक्षा संघटनेने आपल्या रिक्षा बंद ठेवल्या आहेत. या प्रकरणात प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी ७२ रिक्षा चालकांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. परवाने का रद्द करू नयेत? असा प्रश्न या नोटीसमध्ये रिक्षा चालकांना विचारण्यात आला आहे.खारघर शहरात एकता रिक्षा संघटनेच्या माध्यमातून १६ वर्षांपासून शेकडो रिक्षा चालक याठिकाणी व्यवसाय करीत आहेत. या संघटनेचे ८०० पेक्षा जास्त रिक्षाचालक शहरात व्यवसाय करीत आहेत . मात्र, अचानक तळोजा येथील रिक्षा संघटनेने शहरातील विविध रिक्षा थांब्यांवर ताबा मिळविला असल्याचा आरोप एकता रिक्षा संघटनेने केला आहे. याच कारणावरून दोन्ही संघटनेच्या पदाधिकाºयांमध्ये हाणामारी झाली होती.या प्रकरणानंतर एकता रिक्षा संघटनेने आपल्या रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आमच्यावर उपासमारीची वेळ येत असल्याने तळोजा येथील रिक्षाचालकांना आवरा, अशी या रिक्षाचालकांची मागणी आहे. या प्रकरणात प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक पोलीस आयुक्त, आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील बैठक घेतली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तोडगा निघाला नाही. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी शुक्रवारी खारघरमधील रिक्षा चालकांना नोटिसा बजावल्या आहेत.