शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळकरांच्या भावनांची रावतेंकडून खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:21 IST

आरटीओच्या कार्यालयाचे भूमिपूजन : शुकशुकाटामध्ये जिवंतपणा येणार असल्याचे केले वक्तव्य

नवी मुंबई : आरटीओच्या नेरुळ येथील प्रस्तावित इमारतीच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या हस्ते करण्यात आले; परंतु रहिवासी भागात आरटीओचे कार्यालय झाल्यास शांतता भंग होण्याच्या भीतीने रहिवाशांनी या कामास विरोध दर्शवला आहे. अशातच ‘आरटीओच्या कार्यालयामुळे परिसरातील शुकशुकाटामध्ये जिवंतपणा येईल’ अशा प्रकारचे वक्तव्य करून रावते यांनी नेरुळकरांच्या भावना दुखावल्या आहेत.

नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला स्वत:ची जागा नसल्याने गेली अनेक वर्षांपासून एपीएमसीमधील भाडेतत्त्वावरील जागेत कार्यालय चालवले जात आहे. त्याठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने विविध कामानिमित्ताने येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. तर ब्रेक टेस्ट, ड्रायव्हिंग टेस्ट यासाठी देखील आरटीओकडे प्रशस्त जागा नाही. यामुळे नवी मुंबई आरटीओसाठी स्वतंत्र जागा मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर सिडकोने नेरुळ सेक्टर १३ येथील ८ व ९ क्रमांकाचा भूखंड आरटीओसाठी दिला आहे. परिणामी त्याभोवतीची दोन सुसज्ज उद्याने तसेच सेक्टर १३, १७ व १९ या रहिवासी भागातली शांतता भंग होणार आहे. यामुळे आरटीओला भूखंड वितरित झाल्यापासून स्थानिकांचा विरोध आहे. यानंतरही मंगळवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आरटीओच्या प्रस्तावित इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याकरिता परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यानंतरही नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी रहिवाशांसह कार्यक्रमस्थळी निषेध नोंदवला. त्यांच्या शिष्टमंडळाने रावते यांची भेट घेऊन आरटीओच्या कार्यालयामुळे भविष्यात उद्भवणाºया समस्यांची माहिती दिली. तसेच रहिवासी क्षेत्रापासून लांब अथवा औद्योगिक क्षेत्रात आरटीओचे प्रस्तावित कार्यालय हलवण्याची मागणी केली.

आरटीओच्या जागेविरोधात काही दिवसात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रहिवासी भागात आरटीओचे कार्यालय झाल्यास तिथे मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी वाढणार आहे, तर परिसरात सार्वजनिक वाहनांच्या पार्किंगचीही सोय नाही. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या ९ मीटरच्या रस्त्यावर वाहतूककोंडी होऊन पार्किंगचीही समस्या भेडसावणार आहे. त्याशिवाय परिसरातील ध्वनी व वायुप्रदूषणातही वाढ होणार आहे. यापैकी कोणत्याच बाबींचा आढावा न घेता चुकीच्या पद्धतीने नेरुळच्या रहिवासी भागात आरटीओच्या कार्यालयासाठी जागा देण्यात आल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.यापूर्वी ठरावीक कार्यालयांचाच विकास झालामाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केवळ कराडमधीलच आरटीओ कार्यालयाचा सुधार केला, तर बारामतीचेही आरटीओ कार्यालयही सुसज्ज बनवण्यात आले आहे. त्यामुळे ठरावीक कार्यालये वगळता दुर्लक्षित झालेल्या इतर सर्वच आरटीओ कार्यालयांचा मागील पाच वर्षांत विकास झाला असल्याचा टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काँग्रेस सरकारला मारला. तसेच परिवहन खात्यातून येणारा महसूल गतीने वाढत असून, त्यातून विविध विकासकामे केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय आॅनलाइनमुळे कामकाजात पारदर्शकता आली असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी कार्यक्रमास शिवसेना उपनेते विजय नाहटा, परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, विठ्ठल मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले आदी उपस्थित होते.आरटीओच्या जागेचे भूमिपूजन केल्यानंतर त्यापासून काही अंतरावरील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सभेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यांच्याकडून मुलांना शाळेत सोडण्यासाठी अथवा नेण्यासाठी आलेल्या पालकांनाही थांबण्यास मज्जाव घातला जात होता. याचा पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे शाळा सुरू असताना शाळेच्या आवारात कार्यक्रम घेतलाच कसा असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.