शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सीएएच्या समर्थनार्थ नेरळमध्ये रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:40 IST

नागरिकांचा उत्स्फू र्त सहभाग : नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत जनजागृती

नेरळ : भारत देशाच्या संसदेत नागरिकत्व संशोधन कायदा हा दोन्ही सभागृहांत पारित झालेला आहे. हा कायदा मुळात भारतातील नागरिकांचे नागरिकत्व याला धक्का न लावता भारतात जे आश्रित, शरणार्थी आहेत त्यांना नागरिकत्व देऊन त्यांचे हक्क त्यांना परत देण्यासाठी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राजेश कुंटे यांनी नेरळ येथे केले. नागरिकत्व संशोधन कायदा सीएएच्या समर्थनार्थ रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कुंटे बोलत होते.

सध्या देशात सीएए, एनआरसी व कॅब या कायद्यांवरून रणकंदन माजले आहे. जनता रस्त्यावर उतरत आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणात नेरळमध्ये या कायद्याला विरोध करण्यासाठी रॅली काढण्यात आली होती. तर आता सीएए या कायद्याला समर्थन दर्शविण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. नेरळ येथील मारुती मंदिरापासून या रॅलीची सुरुवात झाली. विसपोर्ट सीएए, वंदे मातरम्, भारतमाता की जय अशा घोषणा देत मोठ्या संख्येने नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. तर ‘पढाई करो पत्थरबाजी नही’, ‘जाती का भेद तोडो कॅब के साथ नाता जोडो’, ‘हमे अब्दुल कसाब नही, अब्दुल कलाम चाहिये’, ‘से येस तो सीएए’ अशा प्रकारचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मारुती मंदिरापासून पुढे बाजारपेठ, जयहिंद नाका, तेथून परत छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जुनी बाजारपेठ करून छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सभा घेण्यात आली. त्या वेळी व्यासपीठावर विनायक चितळे, बजरंग दलाचे महाराष्ट्र सह गोवा प्रांत अध्यक्ष दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.

या रॅलीत कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, कोकण धर्म प्रसारक जिल्हा अध्यक्ष साईनाथ श्रीखंडे आदींसह नागरिक सहभागी झाले होते. भाजप कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या पुढाकाराने सीएएच्या समर्थणार्थ रॅली व सभा आयोजित करण्यात आली होती. तालुकाध्यक्ष हा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच म्हसकर यांनी त्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केले. अत्यंत शिस्तबद्ध व भव्य स्वरूपाच्या या रॅलीने नागरिकता संशोधन कायदा सीएएचे महत्त्व पटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई