शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

राजनाला कालव्यात १५ डिसेंबरला पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:50 IST

पाटबंधारे खात्याचा निर्णय; ४५ गावांतील शेती ओलिताखाली येणार

कर्जत : कर्जत तालुक्याच्या पूर्व भागात ४५ गावातील शेती ओलिताखाली आणणाऱ्या राजनाला कालव्यात १५ डिसेंबर रोजी शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. राजनाला भागातील शेतकºयांना पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी साशंक होते. मात्र, शेतकºयांच्या मागणीचा विचार करून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. १५ डिसेंबरला राजनाला कालव्याच्या मुख्य कालव्यात पाणी सोडले जाणार असून, तशी माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता भरत काजळे यांनी दिली आहे.कर्जत तालुक्यातील शेतकरी राजनाला कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी शेती करतात. मागील काही वर्षे राजनाला कालव्याचे दुरु स्तीचे काम सुरू असून शेतकºयांना अनेक वर्षे शेतीसाठी पाणी सोडले जात नव्हते. मागील वर्षी शेतीसाठी पाणी सोडण्यात आले; परंतु ते पूर्ण क्षमतेने नसल्याने सर्व भागात पुरवठा होऊ शकला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पाण्याअभावी खराब झाली होती. त्यामुळे यंदा शेतीसाठी पाणी सोडणार असाल, तर ते सर्व ४५ गावांतील शेतीसाठी आणि पूर्ण क्षमतेने सोडले जावे, यासाठी राजनाला भागातील शेतकरी आक्र मक होते. मात्र, कालव्याच्या दुरु स्तीची कामे आजही अपूर्ण असल्याने पाटबंधारे विभाग त्याबाबत निरु त्तर होता. मात्र, शेतकºयांनी आग्रही भूमिकेने राजनालाचे पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.राजनाल्यात पाणी सोडल्याने उन्हाळी हंगामात जास्तीत जास्त भागातील शेतीला पाणी पोहोचेलमुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर ते पाणी डावा कालवा, उजवा कालवा, पाली पोटल कालवा येथून ४५ गावांतील किमान २००० हेक्टर जमिनीत पोहोचेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाला आहे; पण किती शेतकरी भातशेती करण्यासाठी पाणी वापरणार? याचे उत्तर पाटबंधारे खात्याकडे नाही. कालव्यात सोडले जाणारे पाणी शेतीसाठी आवश्यक आहे तेवढे मिळेलच याची खात्री शेतकºयांना नाही आणि पाणी मिळाले नाही तर शेती फुकट जाऊन नुकसान होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे १५ डिसेंबर रोजी पाणी मुख्य कालव्यात सोडल्यानंतर आपल्या जमिनीत कधी येणार यावर शेती करण्याचे नियोजन अवलंबून असणार आहे.१५ डिसेंबर रोजी राजनाला कालव्यात पाणी सोडले जाणार आहे. मुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर ते शेवटच्या गावात २० डिसेंबरपर्यंत पोहोचणार आहे. तर राजनाला कालव्यात पाणी सोडणे १४ एप्रिल २०१९ पासून बंद केले जाणार आहे.- भरत काजळे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई