शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

राजनाला कालव्यात १५ डिसेंबरला पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:50 IST

पाटबंधारे खात्याचा निर्णय; ४५ गावांतील शेती ओलिताखाली येणार

कर्जत : कर्जत तालुक्याच्या पूर्व भागात ४५ गावातील शेती ओलिताखाली आणणाऱ्या राजनाला कालव्यात १५ डिसेंबर रोजी शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. राजनाला भागातील शेतकºयांना पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी साशंक होते. मात्र, शेतकºयांच्या मागणीचा विचार करून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. १५ डिसेंबरला राजनाला कालव्याच्या मुख्य कालव्यात पाणी सोडले जाणार असून, तशी माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता भरत काजळे यांनी दिली आहे.कर्जत तालुक्यातील शेतकरी राजनाला कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी शेती करतात. मागील काही वर्षे राजनाला कालव्याचे दुरु स्तीचे काम सुरू असून शेतकºयांना अनेक वर्षे शेतीसाठी पाणी सोडले जात नव्हते. मागील वर्षी शेतीसाठी पाणी सोडण्यात आले; परंतु ते पूर्ण क्षमतेने नसल्याने सर्व भागात पुरवठा होऊ शकला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पाण्याअभावी खराब झाली होती. त्यामुळे यंदा शेतीसाठी पाणी सोडणार असाल, तर ते सर्व ४५ गावांतील शेतीसाठी आणि पूर्ण क्षमतेने सोडले जावे, यासाठी राजनाला भागातील शेतकरी आक्र मक होते. मात्र, कालव्याच्या दुरु स्तीची कामे आजही अपूर्ण असल्याने पाटबंधारे विभाग त्याबाबत निरु त्तर होता. मात्र, शेतकºयांनी आग्रही भूमिकेने राजनालाचे पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.राजनाल्यात पाणी सोडल्याने उन्हाळी हंगामात जास्तीत जास्त भागातील शेतीला पाणी पोहोचेलमुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर ते पाणी डावा कालवा, उजवा कालवा, पाली पोटल कालवा येथून ४५ गावांतील किमान २००० हेक्टर जमिनीत पोहोचेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाला आहे; पण किती शेतकरी भातशेती करण्यासाठी पाणी वापरणार? याचे उत्तर पाटबंधारे खात्याकडे नाही. कालव्यात सोडले जाणारे पाणी शेतीसाठी आवश्यक आहे तेवढे मिळेलच याची खात्री शेतकºयांना नाही आणि पाणी मिळाले नाही तर शेती फुकट जाऊन नुकसान होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे १५ डिसेंबर रोजी पाणी मुख्य कालव्यात सोडल्यानंतर आपल्या जमिनीत कधी येणार यावर शेती करण्याचे नियोजन अवलंबून असणार आहे.१५ डिसेंबर रोजी राजनाला कालव्यात पाणी सोडले जाणार आहे. मुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर ते शेवटच्या गावात २० डिसेंबरपर्यंत पोहोचणार आहे. तर राजनाला कालव्यात पाणी सोडणे १४ एप्रिल २०१९ पासून बंद केले जाणार आहे.- भरत काजळे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई