शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

‘ओखी’चा वातावरणावर परिणाम, नवी मुंबईसह पनवेल परिसरात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:37 IST

‘ओखी’ चक्रिवादळामुळे सोमवारपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळपासून अनेक भागात रिपरिप पावसाची सुरुवात झाली.

नवी मुंबई : ‘ओखी’ चक्रिवादळामुळे सोमवारपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळपासून अनेक भागात रिपरिप पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली, तर शहरातील सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला नाही.मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाºयासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून महावितरण विभागाच्या वतीने दुपारी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या पावसाचा फटका रेल्वे प्रवाशांनाही बसला असून, ट्रान्स हार्बर तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य दिसून आले. चक्रिवादळाच्या इशाºयामुळे कामानिमित्त मुंबईत जाणाºया नोकरदारवर्गाने मंगळवारी घरी राहणेच पसंत केले. दुपारी ४ वाजल्यानंतर नवी मुंबई परिसरात पावसाने विश्रांती घेतली. आठवडाभरापूर्वी उच्चांक गाठणारा ३५ अंशावरील तापमानाचा पारा २७ अंशावर आला असून, वातावरणातील गारवा वाढला आहे. वातावरणात बदल झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे. आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात कुठेही नुकसान झालेले नाही.‘ओखी’ वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत शिक्षण उपसंचालक, मुंबई विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केली होती. विद्यार्थ्यांचे हाल झाले नाहीत. मंगळवारी नवी मुंबईमधील सर्व खासगी तसेच महापालिका शाळांना बंद ठेवण्यात आल्या होत्या. अचानक सुट्टी जाहीर झाल्याने ज्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नव्हती, असे विद्यार्थी शाळेबाहेरील फलकावरील सुट्टीची सूचना पाहून परत फिरले. मंगळवारी सकाळी ८.३० ते ५.३० या कालावधीत बेलापूर विभागात १४ मि.मी., नेरुळ विभागात १२ मि.मी., वाशीत १०.५ मि.मी., ऐरोली विभागात १२मि.मी. अशा सरासरी १२.१२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे ठाणे-बेलापूर तसेच महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पावसामुळे वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ