शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘ओखी’चा वातावरणावर परिणाम, नवी मुंबईसह पनवेल परिसरात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:37 IST

‘ओखी’ चक्रिवादळामुळे सोमवारपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळपासून अनेक भागात रिपरिप पावसाची सुरुवात झाली.

नवी मुंबई : ‘ओखी’ चक्रिवादळामुळे सोमवारपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळपासून अनेक भागात रिपरिप पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली, तर शहरातील सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला नाही.मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाºयासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून महावितरण विभागाच्या वतीने दुपारी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या पावसाचा फटका रेल्वे प्रवाशांनाही बसला असून, ट्रान्स हार्बर तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य दिसून आले. चक्रिवादळाच्या इशाºयामुळे कामानिमित्त मुंबईत जाणाºया नोकरदारवर्गाने मंगळवारी घरी राहणेच पसंत केले. दुपारी ४ वाजल्यानंतर नवी मुंबई परिसरात पावसाने विश्रांती घेतली. आठवडाभरापूर्वी उच्चांक गाठणारा ३५ अंशावरील तापमानाचा पारा २७ अंशावर आला असून, वातावरणातील गारवा वाढला आहे. वातावरणात बदल झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे. आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात कुठेही नुकसान झालेले नाही.‘ओखी’ वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत शिक्षण उपसंचालक, मुंबई विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केली होती. विद्यार्थ्यांचे हाल झाले नाहीत. मंगळवारी नवी मुंबईमधील सर्व खासगी तसेच महापालिका शाळांना बंद ठेवण्यात आल्या होत्या. अचानक सुट्टी जाहीर झाल्याने ज्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नव्हती, असे विद्यार्थी शाळेबाहेरील फलकावरील सुट्टीची सूचना पाहून परत फिरले. मंगळवारी सकाळी ८.३० ते ५.३० या कालावधीत बेलापूर विभागात १४ मि.मी., नेरुळ विभागात १२ मि.मी., वाशीत १०.५ मि.मी., ऐरोली विभागात १२मि.मी. अशा सरासरी १२.१२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे ठाणे-बेलापूर तसेच महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पावसामुळे वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ