शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
3
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
4
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
5
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
6
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
7
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
8
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
9
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
10
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
11
आरोग्य विमा होणार स्वस्त? प्रीमियमच्या मनमानी वाढीला लगाम लागणार; सरकार उचलणार 'ही' मोठी पाऊले!
12
महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला
13
VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
14
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
15
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
16
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
17
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
18
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
19
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
20
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातात २४७ प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:19 IST

ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर गोवंडीपर्यंत वर्षभरात घडलेल्या अपघातांमध्ये २४७ प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर गोवंडीपर्यंत वर्षभरात घडलेल्या अपघातांमध्ये २४७ प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू रेल्वेरूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात झाले असून, त्यामध्ये गोवंडी ते मानखुर्द दरम्यानच्या ठिकाणांचा समावेश आहे. रेल्वेरुळ ओलांडण्यावर प्रतिबंध असतानाही शॉर्टकटच्या प्रयत्नात प्रवाशांकडून जीव मुठीत धरून रूळ ओलांडले जात आहेत.नवी मुंबईत ट्रान्स हार्बर तसेच हार्बर रेल्वेमार्गाभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून अधांतरीच आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकाऱ्यांची उदासिनताही दिसून येत आहे. परिणामी, जागोजागी रेल्वेरूळ ओलांडण्याचे शॉर्टकट तयार झाले आहेत. स्थानकाचा प्रवेशद्वारमार्ग न वापरता थेट फलाटावर ये-जा करण्यासाठी अथवा रुळाच्या एका बाजूने दुसºया बाजूला जाण्यासाठी जीव धोक्यात घातला जात आहे. अशा ठिकाणावरून रेल्वेप्रवाशांकडून दिवसरात्र रूळ ओलांडले जात आहेत. अशा वेळी वेगवान रेल्वेची धडक लागून प्रवासी मृत्यू पावण्याचे अथवा जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यानुसार सन २०१९ मध्ये वाशी व पनवेल रेल्वे पोलिसांच्या हद्दीत एकूण २४७ रेल्वेप्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यापैकी ७८ प्राणांतिक अपघात पनवेल रेल्वेपोलिसांच्या हद्दीत बेलापूर ते पनवेल व पनवेल ते कळंबोली दरम्यान घडले आहेत. तर उर्वरित १६९ मृत्यू हार्बर मार्गावर वाशी रेल्वेपोलिसांच्या हद्दीत सीवूड ते गोवंडी व वाशी ते ऐरोली दरम्यानचे आहेत. त्यामध्ये बहुतांश अपघात मानखुर्द ते गोवंडी दरम्यान रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांसोबत घडलेले आहेत.रेल्वेप्रवाशांकडून रूळ ओलांडला जाऊ नये, याकरिता त्यांच्यात जनजागृतीच्या उद्देशाने रेल्वेपोलिसांकडून अनेकदा जनजागृती केली जाते. यानंतरही घाईमध्ये रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात थेट फलाटावर जाण्यासाठी रेल्वेप्रवाशांकडून शॉर्टकट वापरला जातो. अशा वेळी वेगवान रेल्वेची धडक बसून त्यांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. तर त्यातून बचावलेल्यांपैकी काहींना शरीराचा एखादा अवयव निकामी झाल्याने कायमचे अपंगत्व पत्करावे लागत आहे. वाशी व पनवेल रेल्वेपोलीस ठाणेच्या हद्दीत दोन वर्षांत ४९८ जणांना रेल्वेअपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेअपघातामध्ये जखमी होणाºयांचीही संख्या अधिक आहे. वाशी रेल्वेपोलिसांच्या हद्दीत २०१९ मध्ये १५५ प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वेअपघातांमध्ये जखमींची ही संख्या २०१८ च्या तुलनेत गतवर्षी २६ ने अधिक आहे. रेल्वेअपघातामध्ये मृत पावलेल्यांमध्ये रूळ ओलांडणाºयांपाठोपाठ रेल्वेतून पडून मृत पावणाºयांचीही संख्या दखलपात्र आहे. गर्दीच्या वेळी दरवाजात उभे राहिल्याने अथवा स्टंटबाजी करण्यासाठी दरवाजाला लटकल्याने पडून त्यांच्यासोबत अपघात झाले आहेत. त्यानुसार वाशी रेल्वेपोलिसांच्या हद्दीत २०१९ मध्ये ६४ जणांचा तर २०१८ मध्ये ७५ जणांचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला आहे. सातत्याने असे अपघात घडत असतानाही रेल्वेच्या दरवाजात लटकणाºयांना आवर घालण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.>संरक्षण भितींनाही भगदाडप्रवाशांकडून रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात होणाºया अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वेमार्गाभोवती तारेचे कुंपण अथवा भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी तशी भिंत उभारण्यातही आलेली; परंतु प्रवाशांकडून पुन्हा अशा ठिकाणी भगदाड पाडून शॉर्टकट तयार केले जात आहेत. सद्यस्थितीला बहुतांश रेल्वे स्थानकालगत तसेच लोकवस्तीच्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असे शॉर्टकट पाहायला मिळत आहेत.>रेल्वे प्रवाशांकडून जीव धोक्यात घालून रूळ ओलांडले जात आहेत. त्यानुसार गतवर्षात वाशी रेल्वेपोलीस ठाण्याच्या हद्दीत ७७ प्रवाशांना रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात प्राण गमवावे लागले आहेत. तर ६४ प्रवासी रेल्वेतून पडल्याने मृत पावले आहेत. रेल्वे रूळ ओलांडू नये याबाबत जनजागृती करूनही घाईमध्ये मारलेला शॉर्टकट त्यांच्या जीवावर बेतत आहे.- नंदकिशोर सस्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी रेल्वे