शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातात २४७ प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:19 IST

ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर गोवंडीपर्यंत वर्षभरात घडलेल्या अपघातांमध्ये २४७ प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर गोवंडीपर्यंत वर्षभरात घडलेल्या अपघातांमध्ये २४७ प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू रेल्वेरूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात झाले असून, त्यामध्ये गोवंडी ते मानखुर्द दरम्यानच्या ठिकाणांचा समावेश आहे. रेल्वेरुळ ओलांडण्यावर प्रतिबंध असतानाही शॉर्टकटच्या प्रयत्नात प्रवाशांकडून जीव मुठीत धरून रूळ ओलांडले जात आहेत.नवी मुंबईत ट्रान्स हार्बर तसेच हार्बर रेल्वेमार्गाभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून अधांतरीच आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकाऱ्यांची उदासिनताही दिसून येत आहे. परिणामी, जागोजागी रेल्वेरूळ ओलांडण्याचे शॉर्टकट तयार झाले आहेत. स्थानकाचा प्रवेशद्वारमार्ग न वापरता थेट फलाटावर ये-जा करण्यासाठी अथवा रुळाच्या एका बाजूने दुसºया बाजूला जाण्यासाठी जीव धोक्यात घातला जात आहे. अशा ठिकाणावरून रेल्वेप्रवाशांकडून दिवसरात्र रूळ ओलांडले जात आहेत. अशा वेळी वेगवान रेल्वेची धडक लागून प्रवासी मृत्यू पावण्याचे अथवा जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यानुसार सन २०१९ मध्ये वाशी व पनवेल रेल्वे पोलिसांच्या हद्दीत एकूण २४७ रेल्वेप्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यापैकी ७८ प्राणांतिक अपघात पनवेल रेल्वेपोलिसांच्या हद्दीत बेलापूर ते पनवेल व पनवेल ते कळंबोली दरम्यान घडले आहेत. तर उर्वरित १६९ मृत्यू हार्बर मार्गावर वाशी रेल्वेपोलिसांच्या हद्दीत सीवूड ते गोवंडी व वाशी ते ऐरोली दरम्यानचे आहेत. त्यामध्ये बहुतांश अपघात मानखुर्द ते गोवंडी दरम्यान रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांसोबत घडलेले आहेत.रेल्वेप्रवाशांकडून रूळ ओलांडला जाऊ नये, याकरिता त्यांच्यात जनजागृतीच्या उद्देशाने रेल्वेपोलिसांकडून अनेकदा जनजागृती केली जाते. यानंतरही घाईमध्ये रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात थेट फलाटावर जाण्यासाठी रेल्वेप्रवाशांकडून शॉर्टकट वापरला जातो. अशा वेळी वेगवान रेल्वेची धडक बसून त्यांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. तर त्यातून बचावलेल्यांपैकी काहींना शरीराचा एखादा अवयव निकामी झाल्याने कायमचे अपंगत्व पत्करावे लागत आहे. वाशी व पनवेल रेल्वेपोलीस ठाणेच्या हद्दीत दोन वर्षांत ४९८ जणांना रेल्वेअपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेअपघातामध्ये जखमी होणाºयांचीही संख्या अधिक आहे. वाशी रेल्वेपोलिसांच्या हद्दीत २०१९ मध्ये १५५ प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वेअपघातांमध्ये जखमींची ही संख्या २०१८ च्या तुलनेत गतवर्षी २६ ने अधिक आहे. रेल्वेअपघातामध्ये मृत पावलेल्यांमध्ये रूळ ओलांडणाºयांपाठोपाठ रेल्वेतून पडून मृत पावणाºयांचीही संख्या दखलपात्र आहे. गर्दीच्या वेळी दरवाजात उभे राहिल्याने अथवा स्टंटबाजी करण्यासाठी दरवाजाला लटकल्याने पडून त्यांच्यासोबत अपघात झाले आहेत. त्यानुसार वाशी रेल्वेपोलिसांच्या हद्दीत २०१९ मध्ये ६४ जणांचा तर २०१८ मध्ये ७५ जणांचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला आहे. सातत्याने असे अपघात घडत असतानाही रेल्वेच्या दरवाजात लटकणाºयांना आवर घालण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.>संरक्षण भितींनाही भगदाडप्रवाशांकडून रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात होणाºया अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वेमार्गाभोवती तारेचे कुंपण अथवा भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी तशी भिंत उभारण्यातही आलेली; परंतु प्रवाशांकडून पुन्हा अशा ठिकाणी भगदाड पाडून शॉर्टकट तयार केले जात आहेत. सद्यस्थितीला बहुतांश रेल्वे स्थानकालगत तसेच लोकवस्तीच्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असे शॉर्टकट पाहायला मिळत आहेत.>रेल्वे प्रवाशांकडून जीव धोक्यात घालून रूळ ओलांडले जात आहेत. त्यानुसार गतवर्षात वाशी रेल्वेपोलीस ठाण्याच्या हद्दीत ७७ प्रवाशांना रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात प्राण गमवावे लागले आहेत. तर ६४ प्रवासी रेल्वेतून पडल्याने मृत पावले आहेत. रेल्वे रूळ ओलांडू नये याबाबत जनजागृती करूनही घाईमध्ये मारलेला शॉर्टकट त्यांच्या जीवावर बेतत आहे.- नंदकिशोर सस्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी रेल्वे