शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

धोक्याची घंटा : खासगी रुग्णालयांत रुग्ण सुरक्षा वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 04:33 IST

शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. तर अशा रुग्णालयांना अग्निशमन विभागामार्फत नोटिसा बजावून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचा अधिका-यांचा आरोप आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. तर अशा रुग्णालयांना अग्निशमन विभागामार्फत नोटिसा बजावून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचा अधिकाºयांचा आरोप आहे. यामुळे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.शुक्रवारी पहाटे नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात आग लागल्याच्या घटनेमुळे शहरातील इतरही खासगी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. शहरातील बहुतांश रुग्णालये रहिवासी जागेत अथवा व्यावसायिक गाळ्यांमध्ये चालवली जात आहेत. यामुळे त्याठिकाणी रुग्णांच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे असतानाही त्यास बगल दिली जाते. अनेकदा रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा देखील अद्ययावत केली जात नाही. यामुळे भविष्यात अशा एखाद्या रुग्णालयात आगीची घटना घडल्यास मोठी जीवितहानी घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने पालिकेच्या अग्निशमन दलाने अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाºया काही रुग्णालयांना नोटिसा देखील बजावलेल्या आहेत. परंतु त्या रुग्णालय व्यवस्थापनांनी अग्निशमन विभागाच्या नोटिसांना केराची टोपली दाखवलेली आहे. त्याशिवाय संघटनेच्या माध्यमातून पालिका आयुक्तांची भेट घेवून संभाव्य कारवाई टाळण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या प्रकारातून रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात अनेकांनी यापूर्वी संबंधित अधिकाºयांकडे तक्रारी देखील केल्या आहेत. त्यानंतरही रुग्णालय व्यवस्थापनांकडून रुग्णालयाच्या जागेत अग्निरोधक यंत्रणा बसवून ती अद्ययावत करून घेतलेली नाही.रुग्णांच्या सुरक्षेसाठी सुटसुटीत जागेत रुग्णालय चालवणे जाणे आवश्यक आहे. यानंतरही बहुतांश रुग्णालये रहिवासी इमारतीच्या पहिल्या अथवा दुसºया मजल्यावर अडचणीच्या जागी चालवली जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. यामुळे त्यांना परवानग्या मिळतातच कशा असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. तर जिन्याखाली, बाल्कनीच्या जागी खाटा टाकून अ‍ॅडमिट करून घेण्याची क्षमता वाढवली जात आहे. शहरातील शेकडोच्या वर रुग्णालयांंमध्ये अशाच प्रकारे मूळ जागेत फेरबदल करण्यात आलेले आहेत. ही बाब पालिकेच्या आरोग्य विभागाच्या नजरेतून सुटते कशी याबाबतही साशंकता आहे. परंतु हा निष्काळजीपणा भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो.डी. वाय. पाटील रुग्णालयात आगनवी मुंबई : नेरुळ येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास तिथल्या उपचाराच्या उपकरणाने पेट घेतला. यामुळे उपचार कक्षात आग पसरली असता, ती विझवताना अग्निशमन विभागाचे दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत.शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील उपचार कक्षात ही घटना घडली. त्याठिकाणच्या रुग्णांवर उपचार करण्याच्या उपकरणाने पहाटेच्या सुमारास पेट घेतला. काही क्षणात ही आग संपूर्ण उपचार कक्षात पसरली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही रुग्णाला दुखापत झाली नाही. या आगीची माहिती मिळताच नेरुळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सुमारे अर्धा तासात आग आटोक्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते. यावेळी तिथे वापरल्या जाणाºया रासायनिक द्रवावर पाण्याचा फवारा उडाला. त्यामुळे आगीचा भडका होवून आगीच्या ज्वालांनी अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. एन. ए. रोगडे व जी. एन. पाटील अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी रोगडे यांना उपचाराअंती घरी सोडून देण्यात आले. परंतु पाटील यांच्या चेहºयावर तसेच हाताला भाजल्याने जखम झाली आहे. यामुळे त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल