शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

धोक्याची घंटा : खासगी रुग्णालयांत रुग्ण सुरक्षा वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 04:33 IST

शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. तर अशा रुग्णालयांना अग्निशमन विभागामार्फत नोटिसा बजावून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचा अधिका-यांचा आरोप आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. तर अशा रुग्णालयांना अग्निशमन विभागामार्फत नोटिसा बजावून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचा अधिकाºयांचा आरोप आहे. यामुळे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.शुक्रवारी पहाटे नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात आग लागल्याच्या घटनेमुळे शहरातील इतरही खासगी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. शहरातील बहुतांश रुग्णालये रहिवासी जागेत अथवा व्यावसायिक गाळ्यांमध्ये चालवली जात आहेत. यामुळे त्याठिकाणी रुग्णांच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे असतानाही त्यास बगल दिली जाते. अनेकदा रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा देखील अद्ययावत केली जात नाही. यामुळे भविष्यात अशा एखाद्या रुग्णालयात आगीची घटना घडल्यास मोठी जीवितहानी घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने पालिकेच्या अग्निशमन दलाने अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाºया काही रुग्णालयांना नोटिसा देखील बजावलेल्या आहेत. परंतु त्या रुग्णालय व्यवस्थापनांनी अग्निशमन विभागाच्या नोटिसांना केराची टोपली दाखवलेली आहे. त्याशिवाय संघटनेच्या माध्यमातून पालिका आयुक्तांची भेट घेवून संभाव्य कारवाई टाळण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या प्रकारातून रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात अनेकांनी यापूर्वी संबंधित अधिकाºयांकडे तक्रारी देखील केल्या आहेत. त्यानंतरही रुग्णालय व्यवस्थापनांकडून रुग्णालयाच्या जागेत अग्निरोधक यंत्रणा बसवून ती अद्ययावत करून घेतलेली नाही.रुग्णांच्या सुरक्षेसाठी सुटसुटीत जागेत रुग्णालय चालवणे जाणे आवश्यक आहे. यानंतरही बहुतांश रुग्णालये रहिवासी इमारतीच्या पहिल्या अथवा दुसºया मजल्यावर अडचणीच्या जागी चालवली जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. यामुळे त्यांना परवानग्या मिळतातच कशा असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. तर जिन्याखाली, बाल्कनीच्या जागी खाटा टाकून अ‍ॅडमिट करून घेण्याची क्षमता वाढवली जात आहे. शहरातील शेकडोच्या वर रुग्णालयांंमध्ये अशाच प्रकारे मूळ जागेत फेरबदल करण्यात आलेले आहेत. ही बाब पालिकेच्या आरोग्य विभागाच्या नजरेतून सुटते कशी याबाबतही साशंकता आहे. परंतु हा निष्काळजीपणा भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो.डी. वाय. पाटील रुग्णालयात आगनवी मुंबई : नेरुळ येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास तिथल्या उपचाराच्या उपकरणाने पेट घेतला. यामुळे उपचार कक्षात आग पसरली असता, ती विझवताना अग्निशमन विभागाचे दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत.शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील उपचार कक्षात ही घटना घडली. त्याठिकाणच्या रुग्णांवर उपचार करण्याच्या उपकरणाने पहाटेच्या सुमारास पेट घेतला. काही क्षणात ही आग संपूर्ण उपचार कक्षात पसरली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही रुग्णाला दुखापत झाली नाही. या आगीची माहिती मिळताच नेरुळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सुमारे अर्धा तासात आग आटोक्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते. यावेळी तिथे वापरल्या जाणाºया रासायनिक द्रवावर पाण्याचा फवारा उडाला. त्यामुळे आगीचा भडका होवून आगीच्या ज्वालांनी अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. एन. ए. रोगडे व जी. एन. पाटील अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी रोगडे यांना उपचाराअंती घरी सोडून देण्यात आले. परंतु पाटील यांच्या चेहºयावर तसेच हाताला भाजल्याने जखम झाली आहे. यामुळे त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल