शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा : खासगी रुग्णालयांत रुग्ण सुरक्षा वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 04:33 IST

शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. तर अशा रुग्णालयांना अग्निशमन विभागामार्फत नोटिसा बजावून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचा अधिका-यांचा आरोप आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. तर अशा रुग्णालयांना अग्निशमन विभागामार्फत नोटिसा बजावून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचा अधिकाºयांचा आरोप आहे. यामुळे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.शुक्रवारी पहाटे नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात आग लागल्याच्या घटनेमुळे शहरातील इतरही खासगी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. शहरातील बहुतांश रुग्णालये रहिवासी जागेत अथवा व्यावसायिक गाळ्यांमध्ये चालवली जात आहेत. यामुळे त्याठिकाणी रुग्णांच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे असतानाही त्यास बगल दिली जाते. अनेकदा रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा देखील अद्ययावत केली जात नाही. यामुळे भविष्यात अशा एखाद्या रुग्णालयात आगीची घटना घडल्यास मोठी जीवितहानी घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने पालिकेच्या अग्निशमन दलाने अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाºया काही रुग्णालयांना नोटिसा देखील बजावलेल्या आहेत. परंतु त्या रुग्णालय व्यवस्थापनांनी अग्निशमन विभागाच्या नोटिसांना केराची टोपली दाखवलेली आहे. त्याशिवाय संघटनेच्या माध्यमातून पालिका आयुक्तांची भेट घेवून संभाव्य कारवाई टाळण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या प्रकारातून रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात अनेकांनी यापूर्वी संबंधित अधिकाºयांकडे तक्रारी देखील केल्या आहेत. त्यानंतरही रुग्णालय व्यवस्थापनांकडून रुग्णालयाच्या जागेत अग्निरोधक यंत्रणा बसवून ती अद्ययावत करून घेतलेली नाही.रुग्णांच्या सुरक्षेसाठी सुटसुटीत जागेत रुग्णालय चालवणे जाणे आवश्यक आहे. यानंतरही बहुतांश रुग्णालये रहिवासी इमारतीच्या पहिल्या अथवा दुसºया मजल्यावर अडचणीच्या जागी चालवली जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. यामुळे त्यांना परवानग्या मिळतातच कशा असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. तर जिन्याखाली, बाल्कनीच्या जागी खाटा टाकून अ‍ॅडमिट करून घेण्याची क्षमता वाढवली जात आहे. शहरातील शेकडोच्या वर रुग्णालयांंमध्ये अशाच प्रकारे मूळ जागेत फेरबदल करण्यात आलेले आहेत. ही बाब पालिकेच्या आरोग्य विभागाच्या नजरेतून सुटते कशी याबाबतही साशंकता आहे. परंतु हा निष्काळजीपणा भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो.डी. वाय. पाटील रुग्णालयात आगनवी मुंबई : नेरुळ येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास तिथल्या उपचाराच्या उपकरणाने पेट घेतला. यामुळे उपचार कक्षात आग पसरली असता, ती विझवताना अग्निशमन विभागाचे दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत.शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील उपचार कक्षात ही घटना घडली. त्याठिकाणच्या रुग्णांवर उपचार करण्याच्या उपकरणाने पहाटेच्या सुमारास पेट घेतला. काही क्षणात ही आग संपूर्ण उपचार कक्षात पसरली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही रुग्णाला दुखापत झाली नाही. या आगीची माहिती मिळताच नेरुळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सुमारे अर्धा तासात आग आटोक्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते. यावेळी तिथे वापरल्या जाणाºया रासायनिक द्रवावर पाण्याचा फवारा उडाला. त्यामुळे आगीचा भडका होवून आगीच्या ज्वालांनी अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. एन. ए. रोगडे व जी. एन. पाटील अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी रोगडे यांना उपचाराअंती घरी सोडून देण्यात आले. परंतु पाटील यांच्या चेहºयावर तसेच हाताला भाजल्याने जखम झाली आहे. यामुळे त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल