शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे मेगाहाल

By नामदेव मोरे | Updated: July 8, 2024 17:49 IST

रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी : प्रवाशांना बेस्टसह एनएमएमटीचा आधार: हजारो प्रवाशांची अर्ध्यातूनच घरवापसी

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे मेगा हाल झाले. रेल्वेसेवा बंद असल्यामुळे बेस्ट व एनएमएमटी बस थांब्यावरही प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. हजारो प्रवाशांना कार्यालयात पोहचताच आले नाही. अनेकांनी अर्ध्या रस्त्यातून घरवापसी करणे पसंत केले. बसने प्रवास करणारांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान वाहतूक सुरळीत होती. परंतु वाशीवरून मुंबईकडे जाणारी सेवा सकाळी बंद करण्यात आली होती. यामुळे वाशी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. लोकलसुरळीत होत नसल्यामुळे प्रवाशांनी महामार्गावर जावून एसटी, बेस्ट व एनएमएमटी बसेसचा आधार घेतला. सर्व बसेसमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. मुंबईतील सर्व मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी असल्यामुळे बसेस वेळेत पोहचत नव्हत्या. अनेक प्रवाशांनी अर्ध्या रस्त्यामधूनच घरी जाणे पसंत केले.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ३७० बसेस नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबीवली या मार्गावर धावत होत्या. मुंबईत जास्त बसेस पाठविण्याचे नियोजन केले होते. पण वाहतूक कोंडीमुळे जास्त बसेस पाठविणे शक्य झाले नाही. नवी मुंबई महानगरपालिका उपक्रमाची बस सकाळी साडेनऊ वाजता मंत्रालयाबाहेर पाेहचते. परंतु सोमवारी एक ते दिड तास उशीरा बसेस पोहचत असल्याची माहिती एनएमएमटी प्रशासनाने दिली.विरारवरून सानपाडामध्ये कार्यालयात येण्यासाठी सकाळीच निघालो होतो. बांद्रापर्यंत पोहचलो पण तेथून पुढे येण्यासाठी लोकल मिळाली नाही. यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केले. - चंद्रकांत दळवी, विरारवाशीपर्यंत लोकल सुरू होती. तेथून मुंबईत जाण्यासाठी लोकल मिळत नव्हती. बसची सुविधाही विस्कळीत झाली होती. यामुळे कार्यालयात पोहचता आले नाही. - सुधाकर माने, नेरूळकल्याणवरून नवी मुंबईत येतानाही तारेवरची कसरत करावी लागली. लोकल वेळेत धावत नव्हत्या. प्रचंड गर्दी होती. - विजय देशमुख,कल्याणएनएनएमटीच्या ३७० बसेस विविध मार्गांवर धावत होत्या. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे बसेस वेळेवर पोहचत नव्हत्या. प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी प्रयत्न केला. - योगेश कडूसकर, व्यवस्थापक एनएमएमटी

टॅग्स :Rainपाऊस