शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

विमानतळाच्या भरावाचे काम प्रकल्पग्रस्तांनी थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 03:28 IST

विमानतळ परिसरामधील कोल्ही व पारगाव येथील शेतकऱ्यांनी विमानतळासाठीच्या भरावाचे काम बुधवारी थांबविले. टाटा पॉवरलाइनखालील जमिनीचा मोबदला मिळावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

नवी मुंबई : विमानतळ परिसरामधील कोल्ही व पारगाव येथील शेतकऱ्यांनी विमानतळासाठीच्या भरावाचे काम बुधवारी थांबविले. टाटा पॉवरलाइनखालील जमिनीचा मोबदला मिळावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामधील कोल्ही व पारगावमधील ५० पेक्षा जास्त शेतकºयांची १७ हेक्टर जमीन टाटा पॉवरलाइन खाली आहे. या जमिनीचा मोबदला मिळावा व त्या जमिनीच्या मोबदल्यात साडेबावीस टक्के मोबदला मिळावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. पुनर्वसन विकास समितीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी टाटा पॉवरलाइनखाली सुरू असलेल्या भरावाचे काम थांबविले. या आंदोलनामुळे दिवसभर काम बंद पडले आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. स्थानिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुढील दोन दिवस काम बंद ठेवण्याचे व या दरम्यान सिडकोबरोबर चर्चा करण्याची सूचना पोलिसांनीही केली आहे. सिडको पुनर्वसन विकास समितीचे अध्यक्ष अविनाश नाईक, नंदकुमार भोईर यांच्यासह अनेकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता.विमानतळाच्या कामाला विरोध नाही; परंतु टाटा पॉवरलाइनखालील जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवला जाणार असल्याची माहिती अविनाश नाईक यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई