शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित केली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 02:27 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रोरोचा पर्याय असल्याचे केले स्पष्ट

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गरजेपोटी घरांच्या बाबतीत शासनाने निर्णय घेतलेला आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी असून लवकरच शहरातील प्रकल्पग्रस्तांच्या घरासंदर्भात योग्य निर्णय घेवू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस दिले आहे.तळवली नाका व तुर्भेतील सविता केमिकल्स कंपनीसमोर उड्डाणपूल तर महापे येथे लोकमत प्रेससमोर भुयारी मार्गाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी एमएमआर क्षेत्रातली वाहतूककोंडी सोडवण्यासाठी रोरो सर्व्हिस महत्त्वाची ठरणार असून लवकरच त्याची सुरवात होणार असल्याचे सांगितले. सद्यस्थितीला मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या शहरांमध्ये वाहतूककोंडीची समस्या गंभीर असून, ट्रक व कंटेनरमुळे ती भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. यावर जलवाहतुकीला प्राधान्य देत रोरो (रोल आॅन, रोल आॅफ) सर्व्हिसच्या मदतीने हे कंटेनर बोटीतून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोचवले जातील, असेही ते म्हणाले. विदेशातून या रोरो बोटी मागवल्या असून काही दिवसातच त्या पोचतील, असेही ते म्हणाले. तर एमएमआर क्षेत्रात एकूण २५८ कि.मी. अंतराचे मेट्रोचे जाळे पसरवले जाणार आहे. त्याचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे एमएमआर क्षेत्रात असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.ठाणे-बेलापूर मार्गावर बांधून तयार असलेले पूल व भुयारी मार्ग लवकर वापरासाठी खुले करावेत, अशी मागणी स्थानिक आमदार संदीप नाईक यांच्यासह खासदार राजन विचारे यांनी केली होती. याची दखल घेत एमएमआरडीएने दोन पूल व एका भुयारी मार्गाच्या उद्घाटनाचा हा सोहळा उरकला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर जयवंत सुतार, खासदार राजन विचारे, आमदार सुभाष भोईर, संदीप नाईक, मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते.प्रकल्पग्रस्तांना दिलासामुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एमएमआरडीए क्षेत्रातील कामांविषयी माहिती दिली. अनेक दिवसांपासून सिडकोने घेतलेल्या भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमावस्था आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याचा संदर्भ देवून सांगितले की, मंदाताई तुम्ही काळजी करू नका, भूमिपुत्रांचे प्रश्न आम्ही सोडविल्याशिवाय राहणार नाही. प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडविले जातील असे स्पष्ट केले असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला.ऐरोली कटाई नाका रोडचे कामऐरोली कटाई नाका प्रकल्पामध्ये ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग ४ यांना जोडणारा रस्ता तयार केला जाणार आहे. ३.५७ किलोमीटर लांबीचा हा रोड असणार आहे. त्याची १.७० किलोमीटर लांबीचा बोगदा व १.८७ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाचाही समावेश असणार आहे. यासाठी तब्बल ३८२ कोटी रूपये खर्च होणार आहेत.

टॅग्स :Homeघर