शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बंदी झुगारून पांडवकडा धबधब्यावर धांगडधिंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:51 IST

पांडवकडा या सुप्रसिद्ध धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणांवरून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बंदी घातली आहे.

- वैभव गायकर पनवेल : पांडवकडा या सुप्रसिद्ध धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणांवरून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बंदी घातली आहे. येथील धोकादायक परिस्थितीमुळे आजवर शेकडो पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील बंदी झुगारून पर्यटक या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. शनिवारी अशाच प्रकारे प्रवेश करून धिंगाणा घालणाऱ्या आठ पर्यटकांवर खारघर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात दोन पर्यटक मुंबई येथील रहिवासी आहेत.खारघर येथील पांडवकडा धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण आहे. नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील पर्यटक येथे येतात; परंतु सुरक्षिततेच्या ठोस उपाययोजनांअभावी या ठिकाणी दरवर्षी अपघात होतात. आतापर्यंत यात अनेक जणांचा बळी गेला आहे, त्यामुळे मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात या धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना अटकाव करण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे असले तरी उत्साही पर्यटक पर्यायी मार्गाचा अवलंब करीत धबधब्यावर प्रवेश करीत असल्याचे दिसून आले आहे. बंदी झुगारून पर्यायी मार्गाने धबधब्यावर जाणाºया पर्यटकांच्या विरोधात आता खारघर पोलिसांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी आठ पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अशाप्रकारे पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुन्हे दाखल झालेल्यात पाच जण मुंबईचे, तर उर्वरित तीन जण नवी मुंबईतील रहिवासी आहेत.खारघर पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार मागील दहा वर्षांत १० ते १५ पर्यटकांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे, त्यामुळेच पावसाळ्यात या धबधब्यावर मागील काही वर्षांपासून पर्यटकांना निर्बंध घालण्यात आले आहेत. पांडवकडा धबधब्यावर जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून या ठिकाणावर जाणारा रस्ता धोकादायक आहे. या मार्गातूनच पांडवकडा धबधब्याचे पाणी वाहते. या पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने यात वाहून अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.>पर्यटन क्षेत्र घोषित करण्याची मागणीपांडवकडा धबधबा परिसर एक पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. तशा प्रकारचे पत्रव्यवहारही ठाकूर यांनी संबंधित खात्याला केले आहेत. या परिसराचा विकास करून सुंदर पर्यटनस्थळ निर्माण केल्यास रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. असे पत्र त्यांनी दोन वर्षांपूर्वी लिहिले होते. नगरसेविका लीना गरड यांनीही बंदी उठविण्यासाठी वनाधिकाºयांची भेट घेतली होती.>जीवितहानीटाळण्यासाठीच कारवाईया परिसरात पर्यटकांच्या जिवाचा धोका लक्षात घेऊनच वनविभागाने पर्यटकांना बंदी घातली आहे, तरीदेखील पर्यटक बंदी झुगारून या ठिकाणी धिंगाणा घालत असतात. या वर्षीही पाच जणांचा जीव धोक्यात आलेला होता. मात्र सुदैवाने ते बचावले. बंदी झुगारणाºया पर्यटकांना कायद्याचा धाक बसावा, या हेतूने शनिवारी आठ पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.- प्रदीप तिदार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक

टॅग्स :panvelपनवेल