शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

सौरऊर्जा प्रकल्पातून ८.५ लाख युनिटची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:03 IST

सरकारने २०२२ पर्यंत दोन लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केले आहे.

उरण : सरकारने २०२२ पर्यंत दोन लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केले आहे. पेट्रोल आणि डिझेल सारख्या प्रदूषणकारी इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी व पर्यावरण पूरक अशी शुद्ध ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे.जेएनपीटीने सौरऊर्जेच्या पॅनेलची जेएनपीटी वसाहत व व्यावसायिक ठिकाणीच्या विविध छतावर उभारणी केली आहे. ज्यामुळे सौरऊर्जेची निर्मिती होऊन पारंपरिक ऊर्जेवर कमीत कमी विसंबून राहता येणार आहे. यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (नवीन आणि नूतनीकरणक्षम मंत्रालय) कडून १५ टक्के अनुदान दिले जाते. प्रकल्पाची पूर्ण क्षमतेने ८२२ किलो वॅट ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे. जेएनपीटी हॉस्पिटल येथे बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा पॅनेलमधून सर्वाधिक २.७ युनिट, प्रशासन भवनावरील पॅनेलमधून १.७ युनिट, पोर्ट युजर इमारतीवरील पॅनेलमधून १.२ युनिट शॉपिंग कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स कार्यालयावरील पॅनेलमधून १.०६ युनिट अशी सर्व मिळून ८.५ लाख युनिट ऊर्जेची निर्मिती वर्ष २०१७-१८ मध्ये करण्यात आली आहे. ज्यामुळे १.२ कोटी रु पयांची बचत मार्च २०१८ पर्यंत झाली आहे. सौरऊर्जेचे प्रकल्प सेंट मेरी विद्यालय, आयईएस विद्यालय, पीयूबी, प्रशासन भवन, अधिकारी क्लब, स्टाफ क्लब, एमपी हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स कार्यालय आणि रुग्णालयात उभारण्यात आले.>शुद्ध ऊर्जा निर्मिती करणे व प्रदूषण करणाऱ्या ऊर्जेचा वापर कमी करणे ही काळाची गरज आहे. भारताला पर्यायी नैसर्गिक ऊर्जा निर्मितीची महत्त्वाची संधी प्राप्त झाली आहे. जेएनपीटी आपल्या मर्यादित वापरासाठी अधिकतम सौरऊर्जा निर्मितीसाठी उत्सुक असून पारंपरिक मर्यादित ऊर्जेवर विसंबून राहणे कमी करत आहे. जेएनपीटी ने अलीकडेच स्वच्छ पर्यावरण मोहिमेअंतर्गत मोबाइल पर्यावरण निरीक्षण वाहनाचा शुभारंभ केला आहे, ज्यामुळे हवेतील रिअल टाइम एअर क्वालिटीचे निरीक्षण करता येणार आहे. - नीरज बन्सल, अध्यक्ष, जेएनपीटी