शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

प्रक्रिया केलेल्या पाण्याचे मार्केटिंग

By admin | Updated: August 24, 2015 02:40 IST

सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्यास महापालिका प्रशासनाला ्रपूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले १९० एमएलडी

नवी मुंबई : सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्यास महापालिका प्रशासनाला ्रपूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले १९० एमएलडी पाणी समुद्रात सोडावे लागत आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वाया जाणाऱ्या या पाण्याच्या विक्रीसाठी नव्याने मार्केटिंग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्या दृष्टीने चाचपणीही सुरू करण्यात आली आहे.पावसाने दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. मोठ्या शहरांसमोर पिण्याच्या पाण्याचा आतापासूनच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबईकर मात्र याबाबतीत सुदैवी ठरले आहेत. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात पुढील सात महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील उन्हाळ्यात शहरवासीयांवर पाणीबाणी लादली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करून महापालिकेने अत्याधुनिक दर्जाचे सहा सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून दिवसाला प्रक्रिया केलेले २०० एमएलडी शुद्ध पाणी तयार होते. या पाण्याचा वापर उद्याने, बांधकाम आणि इतर प्रयोजनासाठी करता येऊ शकतो. विशेष म्हणजे या पाण्याच्या विक्रीतून वर्षाला १५० कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असे महापालिकेने गृहीत धरले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत या पाण्याच्या खरेदीसाठी कोणीही पुढे आलेले नाही. किंबहुना त्याच्या मार्केटिंगसाठी प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न झालेले नाही. त्यामुळे या केंद्रांत तयार होणारे पाणी खाडीत सोडून देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. परंतु भविष्यात ओढावणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वाया जाणाऱ्या या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांत तयार होणाऱ्या एकूण पाण्यापैकी सध्या १० एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे. रस्त्याच्या दुभाजकावरील झाडांसाठी महापालिका या पाण्याचा वापर करते. तर काही गृहनिर्माण सोसायट्या उद्याने आणि साफसफाईसाठी या पाण्याचा वापर करतात. उर्वरित १९० एमएलडी पाण्याचा सुध्दा अशाच प्रकारे वापर व्हावा, अशी प्रशासनाची योजना आहे. त्यानुसार या पाण्याच्या विक्रीसाठी येत्या काळात जोरदार मार्केटिंग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)