शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

प्रक्रि या केलेले पाणी कारखान्यांना !

By admin | Updated: May 11, 2016 02:18 IST

पाण्याअभावी तळोजा एमआयडीसीतील अनेक कारखाने सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. धरणात पाणी नसल्याने आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात केली जात आहे

कळंबोली : पाण्याअभावी तळोजा एमआयडीसीतील अनेक कारखाने सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. धरणात पाणी नसल्याने आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात केली जात आहे. पाण्यावाचून येथील उद्योग डबघाईला आले असून, त्यावर तोडगा म्हणून एमआयडीसीतील कारखान्यांना प्रक्रिया केलेले पाणी देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पाण्याचा अपव्यय तर टळलेच त्याचबरोबर पाणी टंचाई व कपातीवर तोडगा निघेल, असा विश्वास सिडको आणि एमआयडीसीकडून व्यक्त होत आहे.तळोजातील एकूण ९०७ हेक्टर जागेवर एमआयडीसी वसविण्यात आली आहे. या ठिकाणी आजमितीस ८२३ छोटेमोठे कारखाने आहेत. कोट्यवधींची उलाढाल होत असताना येथे पायाभूत सुविधांबरोबरच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा सूर उमटत होता. बारवी व शहाड या दोन पाणीपुरवठा केंद्रांतून तळोजा एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी ३८ एमएलडी पाणी रोज दिले जाते. पाणीपुरवठा विभागाने कारखानदारांसाठी ३० टक्के पाणीकपात सहा महिन्यांपूर्वीच सुरू केली आहे. गुरुवार व शुक्र वार हे दोन दिवस पाणीकपात करण्यात येते. जलशुद्धीकरण केंद्रातून आठवड्यातून ४८ तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शनिवारी सुध्दा कमी दाबाने पाणी होत असल्याने तीन दिवस एमआयडीसीतील कारखान्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे गुरुवार, शुक्र वार आणि शनिवारी एमआयडीसीचा घसा कोरडा पडत आहे. नेरूळ येथील सीईडीपी प्लाटमधून तळोजा एमआयडीसीला पाणी दिले तर पाणीटंचाई दूर होईल, हा उपाय मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत सुचविण्यात आला होता. याखेरीज बाजूला असलेल्या सिडको वसाहतीतून जवळपास ५५ एमएलडी पाणी प्रक्रि या होऊन बाहेर पडते. त्यापैकी आठ एमएलडी पाणी गोल्फ कोर्स आणि उद्यानाकरिता वापरण्यात येते. उर्वरित पाणी खाडीला जाऊन मिळते. हे पाणी उरण येथील महाजनको कंपनीला वीजनिर्मितीकरिता देण्याचा प्रस्तावही पूर्वी होता, मात्र त्याबाबत फारशा हालचाली झाल्या नाहीत. म्हणून नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर या वसाहतीतील मलनिस्सारण केंद्रात प्रक्रिया झालेले पाणी तळोजा एमआयडीसीतील कारखान्याला देण्याच्या दृष्टीने सिडकोने सकारात्मक भूमिका घेतली आहे. प्रशासन याबाबत सकारात्मक असून, विशेष म्हणजे याकरिता जादा पैसे मोजण्याची सुध्दा गरज भासणार नाही. (वार्ताहर)