शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

अर्धवट कामांमुळे समस्या जैसे थे; खोदकामांमध्ये नियोजनाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 23:24 IST

डांबरीकरणानंतर पुन्हा सुरू आहेत रस्त्यांची खोदकामे

नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खोदकामांमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदल्यानंतर ते मातीने बुजवण्यात आले आहेत. यामुळे त्यावरून वाहतुकीला अडथळा होत असल्याने उर्वरित अपुऱ्या मार्गातूनच दोन्ही दिशेची वाहने चालत असून, त्यामध्ये अपघाताचा धोका उद्भवत आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये गटार दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती, रेलिंग बसवणे या कामांचा समावेश आहे. अशातच काही ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्या बदलण्याचे अथवा इतर कामांसाठी रस्त्याची खोदकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यानंतर पदपथ, गटारे, रेलिंग तसेच इतर खोदकामे केली जात आहेत. यामुळे रस्त्यांच्या डांबरीकरणावर झालेला खर्च व्यर्थ ठरून पुन्हा त्या ठिकाणी डांबरीकरणाची गरज निर्माण झाली आहे. तर अशा प्रकारांमधून रस्त्यांच्या खोदकामात अथवा इतर कामांमध्ये प्रशासन व संबंधित विभागांच्या नियोजनाचा अभाव असल्याचे उघड दिसून येत आहे. तसेच रस्त्यांची दुबार खोदकामे झाल्यानंतर अद्यापही बºयाच ठिकाणी केवळ माती व खडीचा भराव टाकून रस्ते बुजवण्यात आले आहेत. त्यामध्ये रस्त्याची पूर्णपणे एक लेन व्यापली गेली आहे. त्यावरून चारचाकी अथवा दुचाकी चालवणे धोक्याचे ठरत आहे. यामुळे उर्वरित एका लेनमधूनच दोन्ही दिशेची वाहतूक सुरू आहे.

यामध्ये सकाळ व संध्याकाळच्या वेळी अशा ठिकाणी मोठी वाहतूककोंडी होत आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांसह वाहतूक पोलिसांना सहन करावा लागत आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानक ते घणसोली रेल्वे स्थानक दरम्यानच्या मार्गावरही हे दृश्य पाहायला मिळत आहे. त्याशिवाय नोड अंतर्गतच रस्त्यांवरही खोदकामे झाल्यानंतर त्यावर डांबरीकरण न करता मातीचा भराव टाकून खोदकामे तात्पुरती बुजवल्याचे दिसून येत आहे. यामुळे हवेसोबत हे धूलिकण परिसरात पसरत असल्याने तिथल्या हवेच्या प्रदूषणातही भर पडत आहे. तर एखादे मोठे वाहन त्या ठिकाणावरून वेगात गेल्यास उडणारी धूळ दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जाऊन अपघातांना कारणीभूत ठरत आहे.तर एकदा रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर पुन्हा काही दिवसांतच झालेल्या खोदकामामुळे त्या ठिकाणी पुन्हा डांबरीकरणावर खर्च करावा लागणार आहे. यामध्ये निधीचा अपव्यय होत असल्याचा संताप सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.नागरिकांची होतेय गैरसोयरस्त्यांचे खोदकाम झाल्यानंतर डांबरीकरणावेळी पॅच बुजवताना रस्ता समांतर करण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे एकाच रस्त्यावर जागोजागी चढउतार तयार होत आहेत. यामध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.रस्त्यांचे डांबरीकरण करण्यापूर्वीच तिथली आवश्यक कामे उरकली जाणे आवश्यक आहे. परंतु संबंधित प्रशासनांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका