शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट कामांमुळे समस्या जैसे थे; खोदकामांमध्ये नियोजनाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 23:24 IST

डांबरीकरणानंतर पुन्हा सुरू आहेत रस्त्यांची खोदकामे

नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खोदकामांमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदल्यानंतर ते मातीने बुजवण्यात आले आहेत. यामुळे त्यावरून वाहतुकीला अडथळा होत असल्याने उर्वरित अपुऱ्या मार्गातूनच दोन्ही दिशेची वाहने चालत असून, त्यामध्ये अपघाताचा धोका उद्भवत आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये गटार दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती, रेलिंग बसवणे या कामांचा समावेश आहे. अशातच काही ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्या बदलण्याचे अथवा इतर कामांसाठी रस्त्याची खोदकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यानंतर पदपथ, गटारे, रेलिंग तसेच इतर खोदकामे केली जात आहेत. यामुळे रस्त्यांच्या डांबरीकरणावर झालेला खर्च व्यर्थ ठरून पुन्हा त्या ठिकाणी डांबरीकरणाची गरज निर्माण झाली आहे. तर अशा प्रकारांमधून रस्त्यांच्या खोदकामात अथवा इतर कामांमध्ये प्रशासन व संबंधित विभागांच्या नियोजनाचा अभाव असल्याचे उघड दिसून येत आहे. तसेच रस्त्यांची दुबार खोदकामे झाल्यानंतर अद्यापही बºयाच ठिकाणी केवळ माती व खडीचा भराव टाकून रस्ते बुजवण्यात आले आहेत. त्यामध्ये रस्त्याची पूर्णपणे एक लेन व्यापली गेली आहे. त्यावरून चारचाकी अथवा दुचाकी चालवणे धोक्याचे ठरत आहे. यामुळे उर्वरित एका लेनमधूनच दोन्ही दिशेची वाहतूक सुरू आहे.

यामध्ये सकाळ व संध्याकाळच्या वेळी अशा ठिकाणी मोठी वाहतूककोंडी होत आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांसह वाहतूक पोलिसांना सहन करावा लागत आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानक ते घणसोली रेल्वे स्थानक दरम्यानच्या मार्गावरही हे दृश्य पाहायला मिळत आहे. त्याशिवाय नोड अंतर्गतच रस्त्यांवरही खोदकामे झाल्यानंतर त्यावर डांबरीकरण न करता मातीचा भराव टाकून खोदकामे तात्पुरती बुजवल्याचे दिसून येत आहे. यामुळे हवेसोबत हे धूलिकण परिसरात पसरत असल्याने तिथल्या हवेच्या प्रदूषणातही भर पडत आहे. तर एखादे मोठे वाहन त्या ठिकाणावरून वेगात गेल्यास उडणारी धूळ दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जाऊन अपघातांना कारणीभूत ठरत आहे.तर एकदा रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर पुन्हा काही दिवसांतच झालेल्या खोदकामामुळे त्या ठिकाणी पुन्हा डांबरीकरणावर खर्च करावा लागणार आहे. यामध्ये निधीचा अपव्यय होत असल्याचा संताप सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.नागरिकांची होतेय गैरसोयरस्त्यांचे खोदकाम झाल्यानंतर डांबरीकरणावेळी पॅच बुजवताना रस्ता समांतर करण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे एकाच रस्त्यावर जागोजागी चढउतार तयार होत आहेत. यामध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.रस्त्यांचे डांबरीकरण करण्यापूर्वीच तिथली आवश्यक कामे उरकली जाणे आवश्यक आहे. परंतु संबंधित प्रशासनांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका