शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

उरणमधील वाहतूककोंडीची समस्या कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 00:06 IST

उरणकरांच्या वाहतूककोंडीची समस्या सोडविण्याचे आश्वासन सर्वच राजकीय पक्षांची प्रचारादरम्यान दिले आहे.

उरण : उरणकरांच्या वाहतूककोंडीची समस्या सोडविण्याचे आश्वासन सर्वच राजकीय पक्षांची प्रचारादरम्यान दिले आहे. मात्र, अनेक वर्षांपासून जनतेला भेडसावणाऱ्या या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे.

उरण-जेएनपीटी-आम्रमार्ग, उरण-पनवेल आणि गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावर दररोज प्रवास करणाºया हजारो प्रवाशांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढती रहदारी आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. वाहतूककोंडीच्या समस्येविरोधात मागील काही वर्षांत अनेक आंदोलनेही झाली आहेत. मात्र, अद्याप ही समस्या जैसे थे आहे.उरण परिसरातील वाहतूककोंडीची अनेक कारणे आहेत.

जेएनपीटीने एनएचआयच्या माध्यमातून तीन हजार कोटींची सुरू असलेले सात उड्डाणपूल, सहा-आठ लेनच्या रस्त्यांचीच कामे मुदतीनंतर अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. बेशिस्त कंटेनर वाहतूक आणि रस्तोरस्ती अवैधरीत्या पार्किंग करण्यात येत असलेल्या वाहनांवर पोलिसांचे नियंत्रण नाही. रस्तोरस्ती पडलेले मोठमोठे खड्डेही वाहतूककोंडीस कारणीभूत ठरत आहेत. येथील वाहतूकदार संघटनांवर जेएनपीटीचा कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. वाहतूकदारांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न केल्यास संघटित वाहतूकदार संपाचे हत्यार उपसतात.

परिसरातील अवैध कंटेनर यार्डमधून कंटेनर मालाची देशभरात वाहतूक केली जाते. अशा मालवाहू कंटेनरसाठी रस्तोरस्ती कट देण्यात आले आहेत. मात्र, यामुळे उरण-जेएनपीटी-आम्रमार्ग, गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावर वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते.जनतेला भेडसावत आलेली वाहतूककोंडीची समस्या आणि खड्डेमय रस्त्यांपासून विद्यार्थी, कामगारांची सुटका व्हावी, यासाठी काही दिवसांपूर्वी उरणमधील युवकांनीही पुढाकार घेऊन लक्षवेधी आंदोलन केले होते.

करळ फाटा येथील आंदोलनानंतर युवकांनी जेएनपीटी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन शेकडो स्वाक्षºया असलेले निवेदनही दिले होते. याची दखल घेत प्रशासनाने अध्यादेश जारी करीत दोन्ही मार्गावरील वाहतूक सकाळी ८ ते ११ तर संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान दररोज सहा तास अवजड वाहतूक बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही वाहतूककोंडीची समस्या सुटल्याचे दिसत नाही.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी