शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

माथाडींच्या गृहप्रकल्पातील अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 02:43 IST

माथाडी कामगारांच्या वडाळा येथील गृहप्रकल्पासाठी गठीत करण्यात आलेल्या संस्थेची नोंदणी धोक्यात आली आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या वडाळा येथील गृहप्रकल्पासाठी गठीत करण्यात आलेल्या संस्थेची नोंदणी धोक्यात आली आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे ही गृहनिर्माण संस्था गठीत झाली असून त्यामध्ये अपात्र व्यक्तींना सभासदत्व दिले असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे सुमारे तीस वर्षांपासून रखडलेल्या माथाडी कामगारांच्या या गृहप्रकल्पाच्या अडचणीत वाढ होऊन तो रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शासनाने १९८८ साली वडाळा येथील सुमारे ६.५ हेक्टरचा भूखंड माथाडी गृहनिर्माण संस्थेला मंजूर केला होता. यावेळी वडाळा ट्रक टर्मिनलमधील माथाडी कामगारांनाच त्याठिकाणी घरे द्यावीत असेही शासनाने नमूद केले होते. परंतु भूखंड मंजूर झाल्यापासून माथाडी कामगार गृहनिर्माण संस्थेकडून शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. शासनाने लादलेल्या अनेक अटी व शर्तीचा त्यांच्याकडून भंग झालेला आहे. त्यानुसार संस्थेची नोंदणी रद्द करून अर्धवट स्थितीतला प्रकल्प म्हाडामार्फत पूर्ण व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातची लेखी तक्रार संतोष चव्हाण यांनी बेलापूर येथील सहकारी संस्था नोंदणी कार्यालयाच्या सहायक निबंधकाकडे केली आहे. त्यामुळे सुमारे तीस वर्षांपासून घरघर लागलेल्या माथाडी कामगारांच्या वडाळा येथील गृहप्रकल्पाच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.सदर भूखंडासाठी अडीच एफएसआय देण्याची शासनाची तयारी असतानाही, चार एफएसआयची मागणी करण्यात आलेली. त्याकरिता संबंधितांकडून पाठपुरावा होऊनही शासनाने जादा एफएसआय देण्यास नकार दिला होता. या प्रक्रियेत अनेक वर्षे गेल्यानंतर पर्यायी संस्थेला १.३३ एफएसआय मिळाला. त्यानंतर प्रत्यक्षात २००६ साली भूखंडाचा ताबा मिळाल्यानंतर २०१० साली त्याठिकाणी कामाला सुरवात झाली. परंतु अद्यापही बांधकाम अपूर्ण स्थितीत आहे. दरम्यानच्या कालावधीत संस्थेची नोंदणी झालेली नसतानाही सुमारे दोन हजार सभासदांची नोंदणी करून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने प्रत्येकी ३ ते ४ लाख रुपये घेण्यात आले. शिवाय केवळ ट्रक टर्मिनलच्या माथाडी कामगारांनाच घरे देण्याची अट असतानाही, सभासदांमध्ये नवी मुंबईतील माथाडी कामगारांसह बिगर माथाडी, डॉक्टर, पतपेढीचे कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला. शिवाय विकासकासोबत बांधकामाचे दोन करार करून १६ कोटी रुपये देण्यात आले. परंतु तक्रारकर्ते संतोष चव्हाण यांनी माहिती अधिकारातून मागवलेल्या पत्रांवरून माथाडी गृहनिर्माण संस्थेची नोंदणीच खोट्या कागदपत्राद्वारे झाल्याचे समोर आले आहे.संस्थेच्या कार्यकारिणीवर माथाडी कामगारच आवश्यक असतानाही त्याठिकाणी आमदार, पतपेढी कर्मचारी तसेच नातलग यांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु त्यापैकी अनेकांनी खोटे उत्पन्न दाखवल्याचाही आरोप आहे. मात्र १९८८ पासून शासनाने सभासदांच्या कागदपत्राची मागणी करूनही २००३ पर्यंत त्याची पूर्तता झालेली नव्हती. अखेर २००४ साली अपूर्ण कागदपत्रांसह सभासदांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्याचाही आरोप होत आहे.माथाडी गृहनिर्माण संस्थेची संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या अटी व शर्तीनुसार होत आहे. या नियमांनुसारच गरजू माथाडींना घराचे वाटप केले जाणार आहे. जे आजीवन सभासद आहेत त्यांना घरे देण्याचा निर्णय झालेला नाही, तर संस्थेबाबत केली गेलेली तक्रार त्रयस्थ व्यक्तींकडून संस्थेच्या बदनामीच्या प्रयत्नातून झाली असावी.- पोपटराव देशमुख,जनसंपर्क अधिकारी,माथाडी गृहनिर्माण संस्था>शासनाने वडाळा येथील भूखंड केवळ ट्रक टर्मिनलच्या माथाडी कामगारांच्या घरासाठी दिलेला आहे. यानंतरही तिथली घरे नवी मुंबईतल्या माथाडी कामगारांसह बिगर माथाडी अथवा इतर व्यक्तींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता शासनाचे नियम व अटी डावलून माथाडी गृहनिर्माण संस्थेवर सभासद घेण्यात आलेत. यामुळे संस्थेची नोंदणी रद्द करण्याची मागणी सहकारी संस्था निबंधकाकडे करण्यात आली आहे.- संतोष चव्हाण,तक्रारदार