शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

दिघा धरण हस्तांतराला हवे जाहीरनाम्यात प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 23:27 IST

नागरिकांची अपेक्षा : जलसाठ्याचा वापर न होणारे राज्यातील एकमेव धरण

- नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ब्रिटिशांनी १६० वर्षांपूर्वी बांधलेल्या दिघा धरणातील जलसाठ्याचा सद्यस्थितीमध्ये काहीही उपयोग होत नाही. धरण रेल्वेकडून महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यात या विषयाला प्राधान्य द्यावे व जे निवडून येतील, त्यांनी पाच वर्षांत हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. मतदार संघामधील प्रश्न सोडविण्याचे व विकासकामे करण्याची आश्वासने दिली जात आहेत. नागरिकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षांविषयी मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दिघा धरणाच्या हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हाच्या रेल्वे इंजिनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती. वर्षभर पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ब्रिटिशांनी दिघामध्ये धरण बांधले. १८.१० एकर जमिनीवर १८५ मीटर लांबीचे व १४.९५ मीटर उंचीचे हे धरण आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पाणीटंचाईची स्थिती आहे. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना अनेक किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. अनेक शहरामध्ये दोन दिवसांनी ते आठवड्यामधून एकदाच पाणीपुरवठा होत आहे; पण दिघा धरणामध्ये पाणीसाठा असताना त्याचा काहीच उपयोग होत नाही. राज्यात छोटी-मोठी १८२१ धरणे असून, त्यामधील जलसाठ्याचा वापर न होणारे दिघा हे एकमेव धरण आहे.

धरणाची मालकी रेल्वेकडे असल्यामुळे महापालिकेला त्याचा वापर करता येत नाही. रेल्वेला सद्यस्थितीमध्ये या पाण्याचा काहीही उपयोग नाही. यामुळे धरण महानगरपालिकेकडे हस्तांतर करावे. महापालिकेने या पाण्याचा वापर दिघा परिसरामधील नागरिकांसाठी करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पिण्यासाठी किंवा इतर कामांसाठी हे पाणी वापरता येऊ शकते. याशिवाय धरणाच्या परिसराचा विकास करून पर्यटनस्थळ विकसित करता येईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे; परंतु अनेक वर्षांपासून हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागत नाही. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने येथील पाण्याचा वापर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही.पर्यटनस्थळ होऊ शकतेदिघा धरण परिसरामध्ये उन्हाळा सुरू झाल्यानंतरही पुरेसा जलसाठा आहे. वर्षभर या परिसरामध्ये अनेक शहरवासी भटकंतीसाठी जात असतात. पावसाळी पर्यटनासाठीही या परिसराला पसंती दिली जाते. धरण हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागला तर येथील पाण्याचा वापर होईलच, शिवाय या परिसरामध्ये निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करणे शक्य होणार आहे. 

दिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर झाले, तरच त्यामधील पाण्याचा योग्य वापर करता येणार आहे. हा प्रश्न रेल्वेशी संबंधित असल्यामुळे लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यात त्याचा समावेश करावा व पुढील पाच वर्षांत हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.- महादेव मर्ढेकर,रहिवासी, ऐरोलीपावसाळ्यामध्ये व उन्हाळ्यामध्येही अनेक वेळा आम्ही दिघा धरण परिसरामध्ये भटकंती करण्यासाठी जात असतो. येथील पाण्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे पाहून खंत वाटते. या पाण्याचा वापर करता यावा, यासाठी हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागला असून सर्वच उमेदवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यात स्थान दिले पाहिजे.- किरण ढेबे, दक्ष नागरिक

टॅग्स :Mumbaiमुंबई