शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

दिघा धरण हस्तांतराला हवे जाहीरनाम्यात प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 23:27 IST

नागरिकांची अपेक्षा : जलसाठ्याचा वापर न होणारे राज्यातील एकमेव धरण

- नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ब्रिटिशांनी १६० वर्षांपूर्वी बांधलेल्या दिघा धरणातील जलसाठ्याचा सद्यस्थितीमध्ये काहीही उपयोग होत नाही. धरण रेल्वेकडून महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यात या विषयाला प्राधान्य द्यावे व जे निवडून येतील, त्यांनी पाच वर्षांत हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. मतदार संघामधील प्रश्न सोडविण्याचे व विकासकामे करण्याची आश्वासने दिली जात आहेत. नागरिकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षांविषयी मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दिघा धरणाच्या हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हाच्या रेल्वे इंजिनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती. वर्षभर पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ब्रिटिशांनी दिघामध्ये धरण बांधले. १८.१० एकर जमिनीवर १८५ मीटर लांबीचे व १४.९५ मीटर उंचीचे हे धरण आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पाणीटंचाईची स्थिती आहे. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना अनेक किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. अनेक शहरामध्ये दोन दिवसांनी ते आठवड्यामधून एकदाच पाणीपुरवठा होत आहे; पण दिघा धरणामध्ये पाणीसाठा असताना त्याचा काहीच उपयोग होत नाही. राज्यात छोटी-मोठी १८२१ धरणे असून, त्यामधील जलसाठ्याचा वापर न होणारे दिघा हे एकमेव धरण आहे.

धरणाची मालकी रेल्वेकडे असल्यामुळे महापालिकेला त्याचा वापर करता येत नाही. रेल्वेला सद्यस्थितीमध्ये या पाण्याचा काहीही उपयोग नाही. यामुळे धरण महानगरपालिकेकडे हस्तांतर करावे. महापालिकेने या पाण्याचा वापर दिघा परिसरामधील नागरिकांसाठी करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पिण्यासाठी किंवा इतर कामांसाठी हे पाणी वापरता येऊ शकते. याशिवाय धरणाच्या परिसराचा विकास करून पर्यटनस्थळ विकसित करता येईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे; परंतु अनेक वर्षांपासून हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागत नाही. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने येथील पाण्याचा वापर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही.पर्यटनस्थळ होऊ शकतेदिघा धरण परिसरामध्ये उन्हाळा सुरू झाल्यानंतरही पुरेसा जलसाठा आहे. वर्षभर या परिसरामध्ये अनेक शहरवासी भटकंतीसाठी जात असतात. पावसाळी पर्यटनासाठीही या परिसराला पसंती दिली जाते. धरण हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागला तर येथील पाण्याचा वापर होईलच, शिवाय या परिसरामध्ये निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करणे शक्य होणार आहे. 

दिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर झाले, तरच त्यामधील पाण्याचा योग्य वापर करता येणार आहे. हा प्रश्न रेल्वेशी संबंधित असल्यामुळे लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यात त्याचा समावेश करावा व पुढील पाच वर्षांत हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.- महादेव मर्ढेकर,रहिवासी, ऐरोलीपावसाळ्यामध्ये व उन्हाळ्यामध्येही अनेक वेळा आम्ही दिघा धरण परिसरामध्ये भटकंती करण्यासाठी जात असतो. येथील पाण्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे पाहून खंत वाटते. या पाण्याचा वापर करता यावा, यासाठी हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागला असून सर्वच उमेदवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यात स्थान दिले पाहिजे.- किरण ढेबे, दक्ष नागरिक

टॅग्स :Mumbaiमुंबई