शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नवी मुंबई पालिका निवडणुकीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:54 IST

अर्थसंकल्पात १६ कोटींची विशेष तरतूद

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रशासकीय खर्चासाठी १६ कोटी ३२ लाख रुपयांची अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून, या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची मुदत ७ मे २०२० ला संपत आहे. त्यापूर्वी निवडणुका घेण्यात येणार असून त्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या वर्षी पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने प्रभाग असणार आहेत. एक प्रभागामध्ये तीन किंवा पाच सदस्य असणार आहेत. यासाठी प्रभाग रचना करण्याचे काम सुरू करावे लागणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी लागणाऱ्या खर्चास सर्वसाधारण सभेची मंजुरी करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शासनाच्या या पूर्वीच्या आदेशाप्रमाणे एका मतदान केंद्रावर ७५० ते ८०० मतदार संख्या असणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनपा क्षेत्रामधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये आठ लाख ४७ हजार इतके मतदार असून, ८१९ मतदान केंद्र होती. मनपा निवडणुकीमध्ये जवळपास आठ लाख ५० हजार मतदार असण्याची शक्यता असून मतदान केंद्रांची संख्या ११०० होण्याची शक्यता आहे.यापूर्वी २०१७ मध्ये ठाणे महापालिकेची बहु-सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये ३३ प्रभाग होते. १२ लाख २८ हजार ६०६ मतदारांची नोंद झाली होती. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतिमतदार ९७ रुपये खर्च झाला होता. एकूण खर्च ११ कोटी ९५ लाख झाला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये पनवेलमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये २० प्रभाग होते. चार लाख २५ हजार ४५३ मतदारांची नोंद झाली होती. या निवडणुकीमध्ये प्रतिव्यक्ती १५० रुपये खर्च झाला होता. संपूर्ण निवडणुकीसाठी सहा लाख ३७ हजार रुपये ेखर्च झाला होता.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका